शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

माळशेज खोऱ्यात भात झोडणी अंतिम टप्प्यातच अवकाळीच्या झळा, ‘इंद्रायणी’ झाला काळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 16:06 IST

काही शेतकरी कापणी केलेल्या भात शेतीमध्ये आपल्या सर्जा-राजाच्या साथीने मशागत करून दुसऱ्या पिकासाठी शेती तयार करीत आहेत....

उदापूर (पुणे) : जुन्नर तालुक्याच्या उत्तरेकडील माळशेज पट्ट्यातील तळेरान, मढ, सांगनोरे, कोल्हेवाडी, खिरेश्वर, खुबी, पिंपळगाव जोगा, कोपरे, मांडवे, जांभुळशी, मुथाळणे या परिसरातील भात झोडणी ही अंतिम टप्प्यात आली आहे. आदिवासी शेतकरी भात झोडणी करून साळीला उन्हामध्ये ताप देत आहेत. तर काही शेतकरी कापणी केलेल्या भात शेतीमध्ये आपल्या सर्जा-राजाच्या साथीने मशागत करून दुसऱ्या पिकासाठी शेती तयार करीत आहेत.

माळशेज पट्ट्यातील आदिवासी शेतकऱ्यांचे मुख्य पीक म्हणून भात पिकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पिकावरच संपूर्ण वर्षाचे अर्थकारण, तसेच रोजीरोटीचा सवाल आदिवासी शेतकऱ्यांचा असतो. पावसाळा सुरू झाल्यापासून रोपे तयार करणे, भात लावणे, कापणी, झोडणी, साळी उन्हामध्ये तापवून त्याचा तांदूळ तयार करून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करणे अशा अनेक प्रक्रिया करीत खूप काबाडकष्ट घेऊन दोन पैशांची अपेक्षा ठेवतात; परंतु नुकत्याच पडलेल्या अवकाळी पावसामुळे तांदूळ या मुख्य पिकाला चांगलाच फटका बसल्यामुळे आदिवासी शेतकरी देखील हवालदिल झालेला पाहायला मिळत आहे.

आदिवासी भागात इंद्रायणी, कोलम, वाय.एस.आर. अशा विविध जातींचे भातपीक घेतले जाते. सध्या तांदळाला ५० ते ६० रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत आहे; परंतु जेव्हा पावसाची गरज होती तेव्हा पाऊस पडला नाही आणि कापणीच्या वेळेला मात्र अवकाळीने कहर केला. यामुळे उत्पन्नात तर घट झालीच शिवाय तांदूळही काळा पडला. त्यामुळे यावर्षी उत्पन्नात खूप मोठ्या प्रमाणात घट झाली असल्यामुळे आदिवासी शेतकऱ्याची खूप मोठी हानी झाली आहे. थोडाफार तांदूळ पदरी पडला; परंतु तोदेखील काळा असल्यामुळे मनासारखे बाजार भाव तर सोडूनच द्या; परंतु तांदळाला मागणी देखील कमी झाली आहे.

- संतोष मोरे, भात उत्पादक शेतकरी, सांगनोरे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड