शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

माळशेज खोऱ्यात भात झोडणी अंतिम टप्प्यातच अवकाळीच्या झळा, ‘इंद्रायणी’ झाला काळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 16:06 IST

काही शेतकरी कापणी केलेल्या भात शेतीमध्ये आपल्या सर्जा-राजाच्या साथीने मशागत करून दुसऱ्या पिकासाठी शेती तयार करीत आहेत....

उदापूर (पुणे) : जुन्नर तालुक्याच्या उत्तरेकडील माळशेज पट्ट्यातील तळेरान, मढ, सांगनोरे, कोल्हेवाडी, खिरेश्वर, खुबी, पिंपळगाव जोगा, कोपरे, मांडवे, जांभुळशी, मुथाळणे या परिसरातील भात झोडणी ही अंतिम टप्प्यात आली आहे. आदिवासी शेतकरी भात झोडणी करून साळीला उन्हामध्ये ताप देत आहेत. तर काही शेतकरी कापणी केलेल्या भात शेतीमध्ये आपल्या सर्जा-राजाच्या साथीने मशागत करून दुसऱ्या पिकासाठी शेती तयार करीत आहेत.

माळशेज पट्ट्यातील आदिवासी शेतकऱ्यांचे मुख्य पीक म्हणून भात पिकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पिकावरच संपूर्ण वर्षाचे अर्थकारण, तसेच रोजीरोटीचा सवाल आदिवासी शेतकऱ्यांचा असतो. पावसाळा सुरू झाल्यापासून रोपे तयार करणे, भात लावणे, कापणी, झोडणी, साळी उन्हामध्ये तापवून त्याचा तांदूळ तयार करून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करणे अशा अनेक प्रक्रिया करीत खूप काबाडकष्ट घेऊन दोन पैशांची अपेक्षा ठेवतात; परंतु नुकत्याच पडलेल्या अवकाळी पावसामुळे तांदूळ या मुख्य पिकाला चांगलाच फटका बसल्यामुळे आदिवासी शेतकरी देखील हवालदिल झालेला पाहायला मिळत आहे.

आदिवासी भागात इंद्रायणी, कोलम, वाय.एस.आर. अशा विविध जातींचे भातपीक घेतले जाते. सध्या तांदळाला ५० ते ६० रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत आहे; परंतु जेव्हा पावसाची गरज होती तेव्हा पाऊस पडला नाही आणि कापणीच्या वेळेला मात्र अवकाळीने कहर केला. यामुळे उत्पन्नात तर घट झालीच शिवाय तांदूळही काळा पडला. त्यामुळे यावर्षी उत्पन्नात खूप मोठ्या प्रमाणात घट झाली असल्यामुळे आदिवासी शेतकऱ्याची खूप मोठी हानी झाली आहे. थोडाफार तांदूळ पदरी पडला; परंतु तोदेखील काळा असल्यामुळे मनासारखे बाजार भाव तर सोडूनच द्या; परंतु तांदळाला मागणी देखील कमी झाली आहे.

- संतोष मोरे, भात उत्पादक शेतकरी, सांगनोरे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड