शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

माळशेज खोऱ्यात भात झोडणी अंतिम टप्प्यातच अवकाळीच्या झळा, ‘इंद्रायणी’ झाला काळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 16:06 IST

काही शेतकरी कापणी केलेल्या भात शेतीमध्ये आपल्या सर्जा-राजाच्या साथीने मशागत करून दुसऱ्या पिकासाठी शेती तयार करीत आहेत....

उदापूर (पुणे) : जुन्नर तालुक्याच्या उत्तरेकडील माळशेज पट्ट्यातील तळेरान, मढ, सांगनोरे, कोल्हेवाडी, खिरेश्वर, खुबी, पिंपळगाव जोगा, कोपरे, मांडवे, जांभुळशी, मुथाळणे या परिसरातील भात झोडणी ही अंतिम टप्प्यात आली आहे. आदिवासी शेतकरी भात झोडणी करून साळीला उन्हामध्ये ताप देत आहेत. तर काही शेतकरी कापणी केलेल्या भात शेतीमध्ये आपल्या सर्जा-राजाच्या साथीने मशागत करून दुसऱ्या पिकासाठी शेती तयार करीत आहेत.

माळशेज पट्ट्यातील आदिवासी शेतकऱ्यांचे मुख्य पीक म्हणून भात पिकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पिकावरच संपूर्ण वर्षाचे अर्थकारण, तसेच रोजीरोटीचा सवाल आदिवासी शेतकऱ्यांचा असतो. पावसाळा सुरू झाल्यापासून रोपे तयार करणे, भात लावणे, कापणी, झोडणी, साळी उन्हामध्ये तापवून त्याचा तांदूळ तयार करून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करणे अशा अनेक प्रक्रिया करीत खूप काबाडकष्ट घेऊन दोन पैशांची अपेक्षा ठेवतात; परंतु नुकत्याच पडलेल्या अवकाळी पावसामुळे तांदूळ या मुख्य पिकाला चांगलाच फटका बसल्यामुळे आदिवासी शेतकरी देखील हवालदिल झालेला पाहायला मिळत आहे.

आदिवासी भागात इंद्रायणी, कोलम, वाय.एस.आर. अशा विविध जातींचे भातपीक घेतले जाते. सध्या तांदळाला ५० ते ६० रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत आहे; परंतु जेव्हा पावसाची गरज होती तेव्हा पाऊस पडला नाही आणि कापणीच्या वेळेला मात्र अवकाळीने कहर केला. यामुळे उत्पन्नात तर घट झालीच शिवाय तांदूळही काळा पडला. त्यामुळे यावर्षी उत्पन्नात खूप मोठ्या प्रमाणात घट झाली असल्यामुळे आदिवासी शेतकऱ्याची खूप मोठी हानी झाली आहे. थोडाफार तांदूळ पदरी पडला; परंतु तोदेखील काळा असल्यामुळे मनासारखे बाजार भाव तर सोडूनच द्या; परंतु तांदळाला मागणी देखील कमी झाली आहे.

- संतोष मोरे, भात उत्पादक शेतकरी, सांगनोरे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड