शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

RTE Admission: आरटीई प्रवेशाची शासनाकडे ६ वर्षांत तब्बल १८०० कोटींची थकबाकी; भुर्दंड पालकांच्या माथी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 11:44 IST

''आम्ही कारवाईला सामोरे जाऊ; पण आरटीई अंतर्गत प्रवेश देणार नाही'', मेस्टाच्या आक्रमक पवित्र्याने शिक्षणापासून मुले वंचित

पुणे : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) यंदाच्या वर्षातील २५ टक्के आरक्षित जागांसाठी ऑनलाइन लॉटरी काढण्यात आली. पण शासनाकडे आरटीई प्रवेशांतर्गत गेल्या सहा वर्षांची जवळपास १८०० कोटी रुपयांची थकबाकी असल्याने हा भुर्दंड पालकांच्या माथी मारला जाणार आहे.

थकबाकीची ही रक्कम देण्यास शासन टाळाटाळ करत असल्याने आता ही थकबाकी पालकांकडून वसूल करण्याचा इशारा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनकडून (मेस्टा) देण्यात आला आहे. आम्ही कारवाईला सामोरे जाऊ; पण आरटीई अंतर्गत प्रवेश देणार नाही, असा पवित्रा असोसिएशनने घेतला असल्याने शिक्षण हक्कापासून मुले वंचित राहाण्याची शक्यता आहे. शासनाने शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत २५ टक्के जागा मुलांसाठी राखीव ठेवल्या आहेत. या मुलांना खासगी इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जातो आणि त्यांचे शुल्क शासनाकडून भरले जाते. मात्र, गेल्या सहा वर्षांत शासनाकडे आरटीई प्रवेशांतर्गत जवळपास १८०० कोटी रुपयांची थकबाकी असल्याची बाब महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा)चे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजयराव तायडे-पाटील यांनी समोर आणली आहे.

आम्ही कारवाईला सामोरे जाऊ; पण आरटीई अंतर्गत प्रवेश देणार नाही

याविषयी ‘लोकमत’शी बोलताना ‘मेस्टा’चे तायडे-पाटील म्हणाले, ‘आमच्या संघटनेमध्ये राज्यातील १८ हजार शाळा समाविष्ट आहेत, त्यात पुण्यातील दीड हजार शाळांचा समावेश आहे. २०१७ मध्ये शासनाने केवळ ५० टक्के इतकीच रक्कम दिली. त्यानंतर १५ ते १७ टक्के व नंतर ७-८ टक्के रक्कम देण्यात आली. कोरोना काळात आरटीई प्रवेशांतर्गत जे १७ हजार ६७६ रुपये देण्याचे निश्चित केले होते, त्यातही कपात करून ही रक्कम ८ हजार रुपये इतकी करण्यात आली. कोरोना संपल्यानंतर २०२१-२२ ला ८ हजार रुपयेच दिले. पण वर्ष झाले तरी ८ हजार रुपयेदेखील शासनाने दिले नाहीत. आत्ताच्या अधिवेशनात शासनाने ८ हजार रुपये देण्याबाबतचा अध्यादेश काढला आहे.’

थकबाकी पालकांकडून वसूल करणार

गेल्या सहा वर्षांत शासनाकडे शाळांची १८०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. याबाबत आम्ही शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला, तर आमच्याकडे पैसेच नसल्याचे शासन सांगत आहे. तरीही प्रवेश द्यायचा अन्यथा कारवाई करू, असा इशारा शासनाकडून दिला जात आहे. आता आम्ही कारवाईला सामोरे जाऊ; पण आरटीई अंतर्गत प्रवेश देणार नाही. जी काही थकबाकी राहिली आहे ती आम्ही पालकांकडून वसूल करणार आहोत. पालकांनी सरकारशी भांडत बसावे. त्याला आमचा इलाज नाही. दरम्यान, या संदर्भात राज्याच्या शिक्षण आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, होऊ शकलेला नाही.

''राईट टू एज्युकेशन (आरटीई) ही राज्याची नव्हे तर केंद्र सरकारची योजना आहे. केंद्रांकडून राज्याला पैसे दिले जात आहेत, पण राज्य सरकार ते पैसे समग्र शिक्षा अभियानात टाकून खर्च करत आहे. - डॉ. संजयराव तायडे-पाटील, संस्थापक अध्यक्ष, मेस्टा''

''आरटीईअंतर्गत शाळांमध्ये प्रवेश देणार नाही, अशी भूमिका कोणत्याही शिक्षण संस्थाचालकांना घेता येणार नाही. शासनाचे पैसे कुठे जात नाहीत, थोडा-फार उशीर होऊ शकतो. पैसे देणे हे शासनाचे उत्तरदायित्व आहे. पगार मिळायलादेखील उशीर होतो; पण कुणी असं म्हणत नाही की पगार नाही तर काम नाही. मुळातच अशी भूमिका घेणे योग्य नाही. आरटीई ही सामाजिक आणि सामूहिक जबाबदारी आहे. त्याला पैशाशी निगडित करणे अपेक्षित नाही. शिक्षण संस्थाचालक इतर ७५ टक्के पालकांकडून रक्कम घेत असते. पैसे निश्चितपणे मिळतील, आपली शिक्षण देणारी संस्था आहे ती व्यावसायिक संस्था नाही याचे भान ठेवले पाहिजे. - सूरज मांढरे, राज्य शिक्षण आयुक्त'' 

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाTeacherशिक्षकStudentविद्यार्थीGovernmentसरकारMONEYपैसा