शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
3
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
4
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
5
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
6
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
7
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
8
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
9
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
10
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
11
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
12
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
13
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
14
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
15
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
16
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
17
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
18
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
19
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
20
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक

Devendra Fadnavis: मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा, पण शरद पवार, ठाकरे, पटोले यांनी भूमिका स्पष्ट करावी - देवेंद्र फडणवीस

By श्रीकिशन काळे | Updated: July 21, 2024 14:22 IST

शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते, त्यांनी का नाही दिले आरक्षण? ते म्हणायचे मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही

पुणे : मराठा आरक्षण देण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. पण माझा सवाल मनोज जरांगे पाटील यांना नाही तर मी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नान पटोले यांना विचारू इच्छितो की, त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते, त्यांनी का नाही दिले आरक्षण? ते म्हणायचे मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही. मग आता भूमिका का मांडत नाहीत, त्यांनी त्यांचे मराठा आरक्षणाचे समर्थन सर्वांसमोर सांगावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  भाजपचे अधिवेशन पुण्यात सुरू आहे. त्यात फडणवीस यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली आणी विरोधकांना त्यांची भूमिका मांडण्याचे आवाहन केले. 

फडणवीस म्हणाले, समाजात आज दुफळी तयार झाली आहे. या राज्यात काही नेत्यांना वाटतं की, दुफळी करून आपल्याला फायदा मिळेल. ते पेट्रोल टाकण्याचे काम करत आहेत. निवडणुक येईल, जाईल. पण समाजातील दफळी भविष्यासाठी खूप नुकसान होईल.  मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. आमची तीच भूमिका आहे. १९८८ पासून अण्णासाहेब पाटील यांनी आरक्षण सुरू केले. त्यांचा बळी गेला पण तेव्हा आरक्षण दिले नाही. आपलं सरकार आलं आणि आरक्षण दिले. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते, त्यांनी का आरक्षण दिले नाही. त्यांनी सांगितले की मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही. पण आता मतांसाठी दुफळी निर्माण करत आहेत. सुप्रिम कोर्टात देखील आपण आरक्षण टिकवलं. पण ठाकरे सरकारने ते घालवलं. पण शिंदे सरकार आले आणि पुन्हा आरक्षण दिले. आज विविध खात्यात भरती होत आहे. 

आम्ही आण्णासाहेब पाटील महामंडळ तयार केले. त्यातून १ लाख उद्योजक तयार झाले आहेत.‌ आपल्या सरकारने सारथी सुरू केले. पण जे आंदोलन चालले आहे. माझा जरांगे पाटील यांना सवाल नाहीय. मी ठाकरे, शरद पवार, पटोले यांना सवाल आहे. त्यांनी समर्थन द्यावे. ओबीसी आणि मराठे दोघांना ते लटकवून ठेवत आहे. मला शिव्या खायची सवय आहे. पण तुमचा खोटेपणा समोर आणणार आहे. ये पब्लिक है, सब जानती है. असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. 

भाजपचे हिंदुत्व व्यापक आहे.‌ आपली मानकं मानतो तो हिंदू आहे. पूजा कोणीही कुठेही करावी. हिंदूंना दहशतवादी बोलले जात आहे. विशाळगडवरील  लोकांना दहशतवादी बोलत आहेत. राहुल गांधी हे हिंदूंना दहशतवादी म्हणत आहेत. छत्रपती यांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन‌ हिंदवी स्वराज्य स्थापन केले.  हिंदूत्वाबद्दल अपराधीपणा घेऊ नका. गर्वाने सांगा आपण हिंदू आहोत. हिंदूत्व म्हणजे सहिष्णुता आहे. सर्वांना आपण सोबत घेतोय. पाकिस्तानपेक्षा मुस्लिम समाज इथे अधिक चांगल्या प्रकारे नांदत  असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षणSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेNana Patoleनाना पटोलेBJPभाजपा