शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

Devendra Fadnavis: मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा, पण शरद पवार, ठाकरे, पटोले यांनी भूमिका स्पष्ट करावी - देवेंद्र फडणवीस

By श्रीकिशन काळे | Updated: July 21, 2024 14:22 IST

शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते, त्यांनी का नाही दिले आरक्षण? ते म्हणायचे मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही

पुणे : मराठा आरक्षण देण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. पण माझा सवाल मनोज जरांगे पाटील यांना नाही तर मी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नान पटोले यांना विचारू इच्छितो की, त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते, त्यांनी का नाही दिले आरक्षण? ते म्हणायचे मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही. मग आता भूमिका का मांडत नाहीत, त्यांनी त्यांचे मराठा आरक्षणाचे समर्थन सर्वांसमोर सांगावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  भाजपचे अधिवेशन पुण्यात सुरू आहे. त्यात फडणवीस यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली आणी विरोधकांना त्यांची भूमिका मांडण्याचे आवाहन केले. 

फडणवीस म्हणाले, समाजात आज दुफळी तयार झाली आहे. या राज्यात काही नेत्यांना वाटतं की, दुफळी करून आपल्याला फायदा मिळेल. ते पेट्रोल टाकण्याचे काम करत आहेत. निवडणुक येईल, जाईल. पण समाजातील दफळी भविष्यासाठी खूप नुकसान होईल.  मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. आमची तीच भूमिका आहे. १९८८ पासून अण्णासाहेब पाटील यांनी आरक्षण सुरू केले. त्यांचा बळी गेला पण तेव्हा आरक्षण दिले नाही. आपलं सरकार आलं आणि आरक्षण दिले. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते, त्यांनी का आरक्षण दिले नाही. त्यांनी सांगितले की मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही. पण आता मतांसाठी दुफळी निर्माण करत आहेत. सुप्रिम कोर्टात देखील आपण आरक्षण टिकवलं. पण ठाकरे सरकारने ते घालवलं. पण शिंदे सरकार आले आणि पुन्हा आरक्षण दिले. आज विविध खात्यात भरती होत आहे. 

आम्ही आण्णासाहेब पाटील महामंडळ तयार केले. त्यातून १ लाख उद्योजक तयार झाले आहेत.‌ आपल्या सरकारने सारथी सुरू केले. पण जे आंदोलन चालले आहे. माझा जरांगे पाटील यांना सवाल नाहीय. मी ठाकरे, शरद पवार, पटोले यांना सवाल आहे. त्यांनी समर्थन द्यावे. ओबीसी आणि मराठे दोघांना ते लटकवून ठेवत आहे. मला शिव्या खायची सवय आहे. पण तुमचा खोटेपणा समोर आणणार आहे. ये पब्लिक है, सब जानती है. असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. 

भाजपचे हिंदुत्व व्यापक आहे.‌ आपली मानकं मानतो तो हिंदू आहे. पूजा कोणीही कुठेही करावी. हिंदूंना दहशतवादी बोलले जात आहे. विशाळगडवरील  लोकांना दहशतवादी बोलत आहेत. राहुल गांधी हे हिंदूंना दहशतवादी म्हणत आहेत. छत्रपती यांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन‌ हिंदवी स्वराज्य स्थापन केले.  हिंदूत्वाबद्दल अपराधीपणा घेऊ नका. गर्वाने सांगा आपण हिंदू आहोत. हिंदूत्व म्हणजे सहिष्णुता आहे. सर्वांना आपण सोबत घेतोय. पाकिस्तानपेक्षा मुस्लिम समाज इथे अधिक चांगल्या प्रकारे नांदत  असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षणSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेNana Patoleनाना पटोलेBJPभाजपा