शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
2
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
3
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
4
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
5
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
6
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
7
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
8
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
9
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
10
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
11
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
12
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
13
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
14
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
15
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
16
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
17
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
18
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
19
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
20
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?

Devendra Fadnavis: मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा, पण शरद पवार, ठाकरे, पटोले यांनी भूमिका स्पष्ट करावी - देवेंद्र फडणवीस

By श्रीकिशन काळे | Updated: July 21, 2024 14:22 IST

शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते, त्यांनी का नाही दिले आरक्षण? ते म्हणायचे मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही

पुणे : मराठा आरक्षण देण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. पण माझा सवाल मनोज जरांगे पाटील यांना नाही तर मी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नान पटोले यांना विचारू इच्छितो की, त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते, त्यांनी का नाही दिले आरक्षण? ते म्हणायचे मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही. मग आता भूमिका का मांडत नाहीत, त्यांनी त्यांचे मराठा आरक्षणाचे समर्थन सर्वांसमोर सांगावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  भाजपचे अधिवेशन पुण्यात सुरू आहे. त्यात फडणवीस यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली आणी विरोधकांना त्यांची भूमिका मांडण्याचे आवाहन केले. 

फडणवीस म्हणाले, समाजात आज दुफळी तयार झाली आहे. या राज्यात काही नेत्यांना वाटतं की, दुफळी करून आपल्याला फायदा मिळेल. ते पेट्रोल टाकण्याचे काम करत आहेत. निवडणुक येईल, जाईल. पण समाजातील दफळी भविष्यासाठी खूप नुकसान होईल.  मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. आमची तीच भूमिका आहे. १९८८ पासून अण्णासाहेब पाटील यांनी आरक्षण सुरू केले. त्यांचा बळी गेला पण तेव्हा आरक्षण दिले नाही. आपलं सरकार आलं आणि आरक्षण दिले. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते, त्यांनी का आरक्षण दिले नाही. त्यांनी सांगितले की मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही. पण आता मतांसाठी दुफळी निर्माण करत आहेत. सुप्रिम कोर्टात देखील आपण आरक्षण टिकवलं. पण ठाकरे सरकारने ते घालवलं. पण शिंदे सरकार आले आणि पुन्हा आरक्षण दिले. आज विविध खात्यात भरती होत आहे. 

आम्ही आण्णासाहेब पाटील महामंडळ तयार केले. त्यातून १ लाख उद्योजक तयार झाले आहेत.‌ आपल्या सरकारने सारथी सुरू केले. पण जे आंदोलन चालले आहे. माझा जरांगे पाटील यांना सवाल नाहीय. मी ठाकरे, शरद पवार, पटोले यांना सवाल आहे. त्यांनी समर्थन द्यावे. ओबीसी आणि मराठे दोघांना ते लटकवून ठेवत आहे. मला शिव्या खायची सवय आहे. पण तुमचा खोटेपणा समोर आणणार आहे. ये पब्लिक है, सब जानती है. असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. 

भाजपचे हिंदुत्व व्यापक आहे.‌ आपली मानकं मानतो तो हिंदू आहे. पूजा कोणीही कुठेही करावी. हिंदूंना दहशतवादी बोलले जात आहे. विशाळगडवरील  लोकांना दहशतवादी बोलत आहेत. राहुल गांधी हे हिंदूंना दहशतवादी म्हणत आहेत. छत्रपती यांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन‌ हिंदवी स्वराज्य स्थापन केले.  हिंदूत्वाबद्दल अपराधीपणा घेऊ नका. गर्वाने सांगा आपण हिंदू आहोत. हिंदूत्व म्हणजे सहिष्णुता आहे. सर्वांना आपण सोबत घेतोय. पाकिस्तानपेक्षा मुस्लिम समाज इथे अधिक चांगल्या प्रकारे नांदत  असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षणSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेNana Patoleनाना पटोलेBJPभाजपा