शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

विद्यार्थ्यांना शालेय पोषक आहाराऐवजी धान्याचे वाटप करण्याचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 19:33 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांंना शालेय पोषण आहार मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे

पुणे  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांंना शालेय पोषण आहार मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे शालेय पोषण आहारता दिल्या जाणा-या तांदळाचे व कडधान्याचे वाटप विद्यार्थ्यांमध्ये करावे, असे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. 

राज्यात शासनातर्फे अंगणवादीसह शालेय विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. त्यात तांदूळ, डाळी व कडधान्य आदींचा समावेश असतो. तसेच प्रत्येक शाळेकडे एक ते दोन महिन्यांचे धान्य उपलब्ध असते. 'कोरोना' मुळे मार्च महिन्यातच शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. त्याचप्रमाणे इयत्ता पहिलीपासून ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. सध्या शाळा व अंगणवाड्या बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जात नव्हता. तसेच याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने केंद्र सरकारचे मत विचारात घेतले.तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांसह खासगी शाळा, हंगामी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात दिले जाणारे धान्य वितरीत करण्याचे आदेश दिले .

उप सचिव राजेंद्र पवार यांनीही याबाबत परिपत्रक काढले आहे. त्यानुसार शाळेचे मुख्याध्यापक योजनेचे काम पहाणारे शिक्षण व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी शाळेत शिल्लक असणाऱ्या धान्याचा आढावा घ्यावा. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना समान धान्य वाटप करावे.धान्य वाटप करताना शाळेत गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. प्रत्येक विद्यार्थी व पालकांना वेळा ठरवून द्याव्यात. शाळेत धान्य वाटप करण्यापूर्वी त्याची माहिती जिल्हाधिकारी व स्थानिक पोलिसांना देणे बंधनकारक आहे. धान्य वाटप करण्यासाठी शाळेत आलेल्या पालकांमध्ये एक मीटरचे सामाजिक अंतर असले पाहिजे.पालक किंवा विद्यार्थी आजारी असल्यास त्यांना घरपोच धान्य देण्याची सोय करावी,असे पवार यांनी काढलेल्या परिपत्रकात नमुद केले आहे. 

प्रतिक्रिया :

जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांमध्ये दोन महिन्यांचा शालेय पोषण आहाराचा धान्य साठा उपलब्ध असू शकतो. सध्या शाळा बंद असल्यामुळे शालेय पोषण आहार अंतर्गत दिले जाणारे तांदूळ, डाळी,कडधान्य यांचे वाटप विद्यार्थ्यांना करणे शक्य होत नाही. शालेय पोषण आहारात दिल्या जाणाऱ्या धान्याचे योग्य वेळी वाटप न झाल्यास ते खराब होऊ शकते. त्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी सर्व धान्याचे वाटप शाळेमध्ये गर्दी होऊन देता  वितरीत करावे."

- दत्तात्रेय जगताप, संचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSchoolशाळाEducationशिक्षणStudentविद्यार्थी