शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
2
आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
3
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
4
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
5
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
6
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
7
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
8
धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
9
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
10
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
11
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
12
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
13
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
14
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
15
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
16
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
17
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
18
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
19
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
20
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल

जलयुक्त शिवार योजनेवरील विरोधकांची टिका पोरकट : राम शिंदे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 21:55 IST

मदानातून जलसंधारणाची कामे केलेल्या कोट्यावधी नागरिकांच्या हातांचा व त्यांनी गाळलेल्या घामाचा अपमान करणारी आहे, असा आरोप जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी केला. 

ठळक मुद्देराज्यात श्रमदानातून झाली असून एकूण ७ हजार ७८९ कोटी रुपयांची कामेयंदा दुष्काळ असूनही जलयुक्त शिवारमुळे ग्रामीण भागात पाणीसाठा उपलब्ध राज्यातील ३५६ तालुक्यांपैकी १०१ तालुक्यांच्या भूजल पातळीत वाढ

पुणे: जलयुक्त शिवार योजनेमुळे कमी पाऊस पडून देखील भूजल पातळी कायम राहण्यात यश आले असून राज्यातील ३५६ तालुक्यांपैकी १०१ तालुक्यांच्या भूजल पातळीत वाढ झाली आहे.भूजल सर्वेक्षण विभागाने (जीएसडीए) ३ हजार ९०० गावांतील सिंचन विहिरींच्या आधारावर सादर केलेल्या अहवालावरून संपूर्ण राज्याचे स्पष्ट होत नाही.त्यामुळे विरोधकांकडून जलयुक्त शिवार योजनेवर केली जाणारी टिका पोरकटपणाची आहे.तसेच श्रमदानातून जलसंधारणाची कामे केलेल्या कोट्यावधी नागरिकांच्या हातांचा व त्यांनी गाळलेल्या घामाचा अपमान करणारी आहे,असा आरोप जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी सोमवारी केला. राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या जलयुक्त शिवार या योजनेसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आला.मात्र,त्यातून राज्याच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही; या उलट पाणी पातळीत घट झाल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केली जात आहे.त्यावर राम शिंदे यांनी पत्रकार परिषद घेवून जलयुक्त शिवार योजनेमुळे वाढलेल्या भूजल पातळीबाबत माहिती दिली.शिंदे म्हणाले,जलयुक्त शिवार योजना लोकांनी स्वाकारली असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.तब्बल ७०० कोटी रुपयांची कामे श्रमदानातून झाली असून राज्यात एकूण ७ हजार ७८९ कोटी रुपयांची कामे झाली आहेत.मराठवाड्यासारख्या भागातही गेल्यावर्षापर्यंत  ४.५ मिटरने भूजल पातळी वाढली होती.राज्यातील सोयाबीनच्या उत्पादकतेत ११.५१ टक्के,मूग पिकात १.१८ टक्के, उडिद पिकात २ टक्के आणि बाजरीच्या पिकात ८ टक्के वाढ दिसून येत आहे.हे जलयुक्त शिवार योजनेचे यश आहे,असे स्पष्ट करून शिंदे म्हणाले, २०१७-१८ वर्षात अघवा ८४ टक्के पाऊस झालेला असताना १८० लाख मेट्रिक टन उत्पादन झाले होते.तर २०१३-१४ मध्ये १२४ टक्के पाऊस पडूनही केवळ १३८ लाख मेंट्रिक टन उत्पादन घेता आले होते.त्याचप्रमाणे यंदा दुष्काळ असूनही जलयुक्त शिवारमुळे ग्रामीण भागात पाणीसाठा उपलब्ध असल्याने आॅक्टोबर महिन्यात वीजेची मागणी २९ टक्क्यांनी वाढली असल्याचे महावितरणकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.----------------जलयुक्त शिवारची कामे झालेल्या गावातच पाणी पातळीत घट झाली असल्याचा विरोधांकडून केला जाणारा आरोप धादांत खोटा असून राज्यात ५ लाख ४२ हजार कामे झाली आहेत.त्यामुळे राज्याची पिक उत्पादनात ४५ टक्के वाढ झाली आहे.तसेच टँकरच्या संख्येत घट झाली असून सध्या राज्यात केवळ १ हजार ४५ टँकर सुरू आहेत.जलयुक्तची कामे झाली त्या ठिकाणचे शेतकरी समाधानी आहेत,असेही राम शिंदे म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रRam Shindeप्रा. राम शिंदेJalyukt Shivarजलयुक्त शिवारGovernmentसरकार