शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

या कारवाईने मला तेवढा आनंद, समाधान मिळालं नाही; हल्ला केलेल्या अतिरेक्यांना ठेचून मारा - अमित ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 11:25 IST

जेव्हा त्या १०, १२ दहशतवाद्यांना शोधून, ठेचून मारतील तेव्हाच त्या २५ भारतीयांना न्याय मिळेल

पुणे: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात २५ लोकांनी जीव गमावला. पर्यटनासाठी फिरायला गेलेल्या कुटुंबांचा आनंद क्षणात हिरावला गेल्याने ते नागरिक अजूनही धक्क्यातच आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भारताने दहशतवादाविरोधात मोठी कारवाई करत मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. या हल्ल्याला ऑपरेशन सिंदुर असं नाव देण्यात आले. तिन्ही सैन्य दलाने मिळून ही संयुक्त कारवाई केली. भारताच्या धाडसी सैन्याने पाकिस्तानच्या ४ आणि पीओकेमध्ये ५ ठिकाणी एकाचवेळी टार्गेट केले. भारतीय गुप्तचर यंत्रणा RAW ने हे सर्व टार्गेट निश्चित केले होते. ज्यानंतर पूर्ण कारवाईने लश्कर आणि जैशच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. संपूर्ण देशाकडून या कारवाईचे स्वागत करण्यात आले. मात्र अमित ठाकरे यांनी कारवाईबाबत समाधानी नसल्याचे सांगत त्या अतिरेक्यांना ठेचून मारायला हवं अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

अमित ठाकरे, संपूर्ण देशभरामध्ये कौतुक होतंय. आपल्या भारताच्या सैन्याचं खरंच हॅट्स ऑफ, त्यांचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. पहलगाम घटनेनंतर जेवढं दुःख झालं होतं. तेवढा आनंद किंवा समाधान मला आज मिळालेलं नाही. कारण ते अतिरेकी अजूनही आज फिरतायेत. भारतात असतील किंवा पाकिस्तान ज्यांनी केलं ते अजूनही मोकळे फिरतायेत. त्याच्यामुळे मला तो आनंद मिळाला नाही. न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा ते दहा लोकं किंवा बारा लोकं जे आले होते ते मरतील .ज्यांनी आपल्या पंचवीस जणांची हत्या केली. ज्या अतिरेक्यांनी हमला केलाय त्यांना ठेचून मारा. जसं राज साहेब बोलले की युद्ध हे उत्तर नाही. तुम्ही सामान्य लोकांचा बळी कशाला घेताय? आपल्या सैन्याला जे सांगितलं जात ते ते करत असतात. काही लष्करचे अड्डे  किंवा काही दहशतवादी अड्डे तिकडे उध्वस्त झाले आहेत. पण शेवटी हा पहलगाम हल्ला कशामुळे झाला? ती लोकं अजून मोकळे फिरतायेत त्यामुळे तो आनंद मला अजून मिळाला नाही. कारण ते अजून मोकळे फिरणारे आत आले कसे? आपण विचारायला नको का प्रश्न? नाही आपल्या भारतात घुसून मारलंय ना आपण उत्तर देतो ते वेगळी गोष्ट आहे. पण ते पंचवीस लोकं शेवटी गेली ना त्यांनी त्यांचा जीव घालवला. ते आलेच कसे? त्याच्यामुळे हे प्रश्न तर आपण विचारलेच पाहिजे. हे तर यंत्रणेचं अपयश आहे. 

टॅग्स :PuneपुणेOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाRaj Thackerayराज ठाकरेAmit Thackerayअमित ठाकरेIndiaभारतPakistanपाकिस्तान