शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

राज्यातील मंदिरं उघडा; पुरोहितांचं मुख्यमंत्र्यांना साकडं, तीर्थक्षेत्री असणाऱ्यांवर आर्थिक संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 11:30 IST

शासनाकडून आर्थिक मदत मिळावी व मंदिरे लवकर खुली करावीत अशी पुरोहितांची मागणी

ठळक मुद्देमंदिरं बंद असल्यानं भाविक दर्शनासाठी व धार्मिक विधीसाठी येऊ शकत नाहीत.

भीमाशंकर : महाराष्टातील मंदिरे कोरोना महामारीमुळे गेली अठरा महिने बंद आहेत. तसेच सर्व प्रकारे धार्मिक कार्यक्रम देखील बंद आहेत. त्यामुळे राज्यातील पुरोहित वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. यासाठी पुरोहितांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी व मंदिरे लवकर खुली करावीत अशी मागणी अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभाचे पुणे विभाग मंत्री वेदमुर्ती मधुकरशास्त्री गवांदे यांनी केली आहे. 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन पाठवून त्यांनी ही मागणी केली आहे. गेल्या अठरा महिन्यांपासून संपूर्ण मंदिरं बंद आहेत. या लॉकडाऊन काळात आपण दुकाने, नोकरवर्ग, छोटे मोठे व्यवसाईक अशा घटकास व्यवसायासाठी निर्बंध टाकून मुभा दिल्या आहेत. परंतु महाराष्ट्रातील गावोगावी असलेली मंदिरं उघडण्यास तसेच दर्शनासाठी, धार्मिक विधी करण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे भाविक मंदिरास दर्शनासाठी व धार्मिक विधीसाठी येऊ शकत नाहीत. 

पुरोहितांना शासनाकडून अथवा मंदिर संस्थांना सांगून मदत देण्याचे आदेश काढा 

राज्यातील गावोगावी छोटयामोठया तीर्थक्षेत्री असलेल्या पुरोहितांवर आर्थिक संकट आले आहे. सर्व पुरोहितवृंद मंदिरे उघडण्याची वाट पाहत आहेत. त्यात तीस-या लाटेचे संकट येणार असल्याचे सांगितले जात आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या पुरोहितांना शासनाकडून अथवा मंदिर संस्थांना सांगून मदत देण्याचे आदेश आपणाकडून निघावेत. तसेच लवकरात लवकर दुकानदारांप्रमाणे निर्बंध टाकून मंदिरे उघडण्यास परवानगी दयावी अशी मागणी वेदमुर्ती श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे उपकार्यकारी विश्वस्त मधुकरशास्त्री गवांदे यांनी केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेTempleमंदिरUddhav Thackerayउद्धव ठाकरेGovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्रcorona virusकोरोना वायरस बातम्या