शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

प्राथमिक शाळांमध्ये आठवड्यात फक्त तीन तास खेळाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 14:04 IST

खेळायचे तास कमी असल्याने विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण बोजड व नीरस वाटू लागल्याची शिक्षकांनी तक्रार केली आहे.

ठळक मुद्देआम्ही खेळायचे कधी? : प्राथमिक शाळांच्या वेळापत्रकात बदलाची मागणीसीबीएसई, आयसीएसई शाळांच्या बोर्डांकडून शाळेच्या वेळापत्रकामध्ये खेळांच्या तासाला विशेष महत्त्वशारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होण्यासाठी खेळाचे तास जास्त असणे आवश्यक

दीपक जाधव  पुणे : प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते चौथीमध्ये शिकणाऱ्या लहानग्यांना मनोसक्त खेळायला, बागडायला, मित्र-मैत्रीणींसोबत मस्ती करायला खूप आवडते. शाळेमध्ये खेळण्यासाठी आठवड्यातून तास कमी करण्यात आल्याने शाळेतील बहुतांश वेळ केवळ पुस्तकी ज्ञान मिळविण्यासाठी खर्ची घालावा लागणार आहे. या वेळापत्रकात बदल करून प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जास्त तासिका उपलब्ध करून देण्याची मागणी शिक्षकांकडून करण्यात आली आहे. विद्या प्राधिकरणाच्या वतीने प्राथमिक शाळांचे वेळापत्रक निश्चित केले जाते. प्राथमिक शाळेत आठवड्याला ४५ ऐवजी ४८ तासिकांचे वेळापत्रक बनविण्यात आले आहे. त्यावेळी खेळायला वाढीव तास देण्याऐवजी ते कमी करण्यात आले. पहिली व दुसरीसाठी आठवड्यातून ४ आणि तिसरी व चौथीसाठी आठवड्यातून ३ तास ठेवण्यात आले आहेत. खेळायचे तास कमी असल्याने विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण बोजड व नीरस वाटू लागल्याची तक्रार शिक्षकांनी केली आहे. एकीकडे सीबीएसई, आयसीएसई शाळांच्या बोर्डांकडून शाळेच्या वेळापत्रकामध्ये खेळांच्या तासाला विशेष महत्त्व दिले आहे. त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना तयार करून त्यांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांच्या शाळांना देण्यात आले आहेत. विद्या प्राधिकरण मात्र त्याबाबात उदासीन आहे. दुसरीकडे, सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळेमध्ये मात्र विद्यार्थ्यांनी खेळासाठी जास्तीत जास्त वेळ द्यावा, याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. सीबीएसई बोर्डाने शालेय वेळापत्रकात दररोज पीटीचा तास ठेवण्याच्या सूचना सर्व शाळांना दिल्या आहेत. विद्यार्थी वर्गात बसून राहणार नाहीत, याकडे लक्ष देण्याच्या मार्गदर्शक सूचनाही त्यांनी त्यांच्या सर्व शाळांना पाठविल्या आहेत. यामध्ये शारीरिक शिक्षणाचा तास वर्गाबाहेर मैदानातच घ्यायचा आहे. विद्यार्थ्यांकडून करून घ्यावयाच्या शारीरिक कवायतींचा एक चार्टदेखील शाळांना पाठविण्यात आला आहे. त्याचबरोबर, ते आपला आवडता खेळ खेळण्यासाठीही त्यांना वेळ देण्यास सांगण्यात आले आहे. पीटी विषयाची अन्य विषयांप्रमाणे परीक्षा घेऊन नये.विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षण निरस वाटू नये, त्यांना शाळेत जाण्यासाठी उत्साह वाटावा, यासाठी समवयस्क मित्रांसोबत त्यांना भरपूर खेळायला मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर लहानग्यांमध्ये वाढत असलेल्या लठ्ठपणाचे प्रमाण कमी होऊन ती शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होण्यासाठी खेळाचे तास जास्त असणे आवश्यक असल्याचे मत यापूर्वी अनेकदा शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळे खेळाचे तास वाढविण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे........................लठ्ठपणाचे वाढतेय प्रमाणप्राथमिक शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींमध्ये विविध कारणांमुळे लठ्ठपणाचे प्रमाण वाढत चालले आहे. इतक्या लहान वयातच त्यांना लठ्ठपणाचा सामना करावा लागत असल्याने भविष्यात आरोग्याच्या दृष्टीने गंभीर परिणामांना त्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे लहान वयातच त्यांना जास्तीत जास्त खेळाकडे वळविले जाणे आवश्यक असल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली....................शाळेतच मोबाईलपासून दूरमुले-मुली घरी गेल्यानंतर जास्तीत जास्त वेळ मोबाईलवर गेम खेळण्यामध्ये घालवत आहेत. मैदानांवर जाऊन खेळण्याचे त्यांचे प्रमाण कमी होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर शाळेमध्ये मुले-मुली मोबाईलपासून कटाक्षाने दूर असतात; त्यामुळे शाळेमध्येच त्यांना खेळण्यासाठी जास्तीत जास्त वेळ देणे योग्य ठरेल, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाStudentविद्यार्थीeducationशैक्षणिकSportsक्रीडाVinod Tawdeविनोद तावडे