शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

नाटक पाहायला या, अशी भीक मागावी लागते; ज्येष्ठ नाटककार चं. प्र. देशपांडे, पुरुषोत्तम करंडक पारितोषिक प्रदान सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 11:57 IST

खरं तर खऱ्या प्रश्नांवर मराठी माणसाला नाटक बघायचे नाही, मराठी प्रेक्षक ‘डल्ल’ झालाय

पुणे: ‘कोरोनानंतर मराठी नाटक संपलेले आहे. नवरा-बायकोचे भांडण आणि रहस्यमय नाटक असेच प्रकार उरलेत. खरं तर खऱ्या प्रश्नांवर मराठी माणसाला नाटक बघायचे नाहीय. मराठी प्रेक्षक ‘डल्ल’ झालाय. आता प्रायोगिक नाटकही खर्चिक झाले. नाटक हे आपल्या जगण्याशी संबंधित काहीतरी आहे, अशी भावना असलेले मराठी लोक खूपच कमी आहेत. आज मोठी लोकंही घरोघरी फोन करून नाटक पाहायला या, अशी भीक मागून प्रयोग करताहेत,’ अशी व्यथा ज्येष्ठ नाटककार चं. प्र. देशपांडे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित ५९व्या आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत म. ए. सो. गरवारे कॉलेजने सादर केलेल्या ‘बस नं. १५३२’ एकांकिकेने पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेचे पारितोषिक प्रदान सोहळा ज्येष्ठ नाटककार देशपांडे यांच्या हस्ते शनिवारी (दि. २८) भरत नाट्यमंदिरमध्ये झाला. याप्रसंगी परीक्षक गिरीश परदेशी, गोपाळ जोशी, मानसी जोशी, आदी उपस्थित होते. स्पर्धेतील सांघिक द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक हरी विनायक करंडक आणि ३००१ रुपयांचे रोख पारितोषिक विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बारामतीच्या ‘पाटी’ एकांकिकेने, तर सांघिक तृतीय पारितोषिक संजीव करंडक आणि २००१ रुपयांचे पारितोषिक न्यू आर्टस् ॲन्ड सायन्स कॉलेज, अहमदनगरच्या ‘देखावा’ या एकांकिकेला प्रदान करण्यात आला.

देशपांडे म्हणाले, नाटकाकडे सीरिअसली पाहणारे लोक कमी होत आहेत. एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळेल आणि दुसरीकडे भाषा खल्लास होईल; पण भाषा मरणार नाही. ती जिवंत राहील. जगात भाषेचा दहावा-बारावा नंबर राहील; परंतु, त्या भाषेतून जे सांस्कृतिक घडणं आहे ते खल्लास होत जाईल. आपण सर्व गोष्टीत ‘डल्ल’ झालो आहोत. रोज सीरिअल बघून रात्री झोपून टाकायचं, असं जर केलं तर अवघड आहे. आज नाटकाकडे करमणुकीचे साधन म्हणून पाहिले जाते. जगणं समजून घेण्याची प्रक्रिया आहे, ती नाटकात असते. कला ही आपल्या जगण्याचा भाग आहे. नाटकातून ते समजून घेण्याचा विचार करणारे लोक कमी झाली आहेत. भाषा मेली काय, संस्कृती मेली काय, याकडे कोणाचेच लक्ष नाही.’

आपल्याकडे बुद्धिप्रामाण्यवादाचे स्तोम खूप माजवले. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी बुद्धिप्रामाण्यवाद ओके आहे; पण माणसाच्या जगण्यात ती काय करते? तर माणसाच्या प्रत्येक संबंधामध्ये बुद्धीमुळे समस्या निर्माण होतात. त्या बुद्धी सोडवू शकत नाही. बुद्धी ही अपयशी चीज आहे, मानवी आयुष्यातील ! चर्चेने प्रश्न सोडवू ! पण कुठं सुटतात ! माझी नाटकं वैचारिक असतात, असं बोलतात; पण ते यासाठी असतात की, विचार हे अपयशी आहेत. - चं. प्र. देशपांडे, ज्येष्ठ नाटककार

टॅग्स :Puneपुणेartकलाcollegeमहाविद्यालयEducationशिक्षणcultureसांस्कृतिकSocialसामाजिक