शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकाऱ्यांचा कारभार एककल्ली!

By admin | Updated: September 25, 2015 01:25 IST

पदाधिकाऱ्यांमध्ये असलेले अंतर्गत वाद, एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण, केवळ नावाला सुरू झालेले उपक्रम, आहे

पुणे : पदाधिकाऱ्यांमध्ये असलेले अंतर्गत वाद, एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण, केवळ नावाला सुरू झालेले उपक्रम, आहे त्या शाखा कार्यरत करण्याऐवजी आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून खिरापतीप्रमाणे शाखा वाटणे असे विविध आरोप होऊ लागले आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा महिनाअखेरीस होत असून, त्या वेळी या आरोपांमुळे वादाला तोंड फुटून खडाजंगी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पुढील वर्षी मार्च महिन्यात साहित्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. साहित्य महामंडळाच्या कारभारीची मुदतही संपत आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील ही वार्षिक सभा अखेरची ठरणार आहे. त्यामुळे ही सभा अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत सत्तापरिवर्तन झाले. मतदारांनी पूर्ण बहुमताने एकहाती सत्ता दिली. एकजुटीवर कारभार चालेल, असे वाटत असताना अधूनमधून वादाचा ठिणग्या पडू लागल्या. आता तर अशी परिस्थिती आहे, की कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य आणि कोशाध्यक्ष सुनील महाजन एकीकडे आणि प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे दुसरीकडे. परिषदेच्या सर्वच कारभारात अंतर्गत राजकारणाने शिरकाव केला आहे.नव्या कार्यकारिणीने सत्ता हाती घेतल्यानंतर परिषदेचा कारभार बदलण्याची घोषणा केली. बाल-युवा मंच, नाट्य विभाग, कॉफी टेबल, नवे कोरे तसेच बालकुमारांसाठी विशेष अंक, दिवाळी अंक सुरू करण्याची घोषणा केली. नव्या उपक्रमांना सुरुवात झाली; पण उपक्रम ठरले ते केवळ सुरू करण्यापुरते. हे उपक्रम ठेव म्हणून ठेवलेल्या निधीतील व्याजामधून सुरू करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते. व्याज तर नियमित मिळत आहे; पण हे उपक्रम बंद का पडले, हे मात्र समजण्यापलीकडील आहे. लहान मुलांसाठी ‘मज्जाच मज्जा’ हा अंक सुरू करण्यात आला; पण अंक सुरू करण्यापूर्वी कार्यकारिणीची मंजुरी घेण्यात आली नाही. सरकारी कार्यालयांमध्ये ज्याप्रमाणे कार्योत्तर परवानगी घेतली जाते, तशी परवानगी यासाठी घेण्यात आली. दिवाळी अंक सुरू केला; पण ज्यांना अनुभव नाही अशांकडे अंकाची जबाबदारी दिली. विक्रीची व्यवस्था नसल्याने बराच अंक रद्दीत पडला आहे. ‘अंक हातोहात खपेल’ ही भावना फोल ठरली आहे.ज्यांचा साहित्यक्षेत्राशी संबंध नाही, अशा व्यक्ती साहित्य परिषदेशी जोडल्या जाव्यात, यासाठी कॉफी टेबल हा उपक्रम सुरू करण्यात आला; मात्र तोही बंद पडला. ‘नवं कोरं’ हा उपक्रम ओळखीच्या लोकांसाठी राबविला गेला की काय, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. परिषदेच्या या सावळ्या गोंधळासंदर्भात सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले, तरच परिषदेचा कारभार समाधानकारक होऊ शकतो; अन्यथा परिषदेच्या कारभारला सरकारी कार्यालयाचे स्वरूप आल्याशिवाय राहणार नाही.