शहरं
Join us  
Trending Stories
1
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
2
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
3
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
4
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
5
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
6
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
7
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
8
रक्ताची ‘बंगाली’ चटक; हिंसाचाराच्या आगीत होरपळणारा बंगाल
9
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
10
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
11
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
12
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
13
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
14
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
15
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
16
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
18
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
19
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

विलिनीकरणाचे वेध : नऱ्हे भाग २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:10 IST

दीपक मुनोत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नऱ्हे गावाचा महापलिकेत समावेश होण्यापूर्वी गावात मलनिस्सारण तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, स्मशानभूमी ...

दीपक मुनोत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : नऱ्हे गावाचा महापलिकेत समावेश होण्यापूर्वी गावात मलनिस्सारण तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, स्मशानभूमी आणि पीएमपी टर्मिनलसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. नऱ्हेमधील ʻअभिनवʼ संकुल परिसर हा पायाभूत सुविधांपासून वंचित आहे. रस्ते आणि ड्रेनेज आमच्याकडे कधी होणार, याची नागरिक वाट पाहत आहेत.

येथील नामांकित शैक्षणिक संस्थांच्या परिसरात अतिक्रमण वाढत असल्याने रहादारीस अडचण निर्माण होत आहे.

अभिनव परिसर हा गावातील पायाभूत सुविधांच्या बाबतीत सर्वात दुर्लक्षित राहिला आहे. रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज आणि सांडपाणी या बाबतींत अजूनही फारशी कामे झालेली नाहीत. याच परिसरातील ओढे आणि नाल्यांमध्ये मोठ्या वेगाने अतिक्रमण वाढत असून, आता नैसर्गिक जलस्त्रोतांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

गावठाण परिसरात ड्रेनेजचे ८०% काम झाले असून याबाबत अभिनव परिसर पूर्णतः दुर्लक्षित राहिला आहे. काही ठिकाणी ड्रेनेजची कामे पूर्ण झाली नसल्याने सांडपाणी उघड्यावरच सोडले जात आहे. वीजखांबांवर सीसीटीव्हीची व्यवस्था असल्याने सुरक्षेची चिंता नागरिकांना नाही? मात्र रस्त्यांवर रात्री दिवाबत्तीची सोय कधीपर्यंत पूर्ण होईल याची शाश्वती गावकऱ्यांना नाही.

गावातील महत्त्वाच्या रस्त्यांवर दुतर्फा अतिक्रमण झालेले आहे. ओढे आणि नाल्यांवर तर मोठे अतिक्रमण झालेले असून तेथेही बेकायदा बांधकामांना वेग आला आहे.

स्मशानभूमीसाठी जागा अपुरी पडत आहे.

पुणे-बंगळुरू महामार्गावरील उड्डाणपुलाच्या किनाऱ्यावर कचरा साचलेला त्यापेक्षा अधिक कचरा आणि घाण सांडपाणी हे पुलाशेजारील नाल्यात वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा महापालिकेच्या जलवाहिनीतून होतो. पण त्यासाठीची वितरण व्यवस्था ग्रामपंचायतीकडे नाही. जलशुद्धीकरण प्रकल्पाला जागा नसल्याने अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. पाण्याची टाकी गावात असूनही नागरिकांना दिवसाआड पाणी मिळते.

गावाला मल्लनिस्सारण प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, स्मशानभूमी आणि पीएमपी टर्मिनलसाठी जागा नसल्याने ग्रामपंचायतीची मोठी पंचाईत झाली आहे. महापालिकेत आमचा समावेश होणार असेल तर आमच्या गावाला या प्रकल्पांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

*कोट*

मुख्य रस्त्यावर अवजड वाहनांची नेहमी वर्दळ असते. त्यातून वाहतूक कोंडी निर्माण होते. गावात विरंगुळा केंद्र व तरुणांना खेळण्यासाठी मैदान नाही. विलिनीकरणानंतर महापालिकेकडून या गोष्टींची पूर्तता होईल, अशी अपेक्षा आहे.

-सर्वेश मेहता, व्यावसायिक

-----

गावाला १४ व्या वित्त आयोगाकडून मोठा निधी मिळणार आहे. मात्र, विलिनीकरणामुळे नुकसान होईल. याआधी विलीन झालेल्या अकरा गावांचा विकास महापालिकेला का करता आला नाही?

- अशोक खराडे, ग्रामस्थ