पुणे : भारत - पाकिस्तान टी ट्वेन्टी विषवचशक स्पर्धेत शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करत भारताने रोमहर्षक विजयाचा इतिहास रचला. शेवटच्या तीन ओव्हरमध्ये भारतीयांच्या हृदयाचे ठोके वाढत होते. सामन्यात एक ना एक चेंडू महत्वाचा होता. विराटच्या सुसाट बॅटने विजयाला भारताकडे ओढवून आणले. अखेर भारताने पाकिस्तानवर मात करून विजयाची पताका भारतीयांच्या मनात रोवली. त्यानंतर देशात सर्वत्र जलोष सुरु झाला. पुण्यातल्या गुडलक चौकात तरुणाईने भारत मात कि जय, वंदे मातरम चा जयघोष करत विजयी जल्लोष साजरा केला.
Video: 'आता खरी दिवाळी साजरी होणार..' भारताच्या रोमहर्षक विजयानंतर पुणेकरांचा जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 18:33 IST