शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आता खुनासाठी '३०२' नव्हे तर '१०३' कलम; नवीन कायद्यांचा वकील, पोलिसांना ‘गृहपाठ’ करावा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 12:18 IST

कायद्यांची अंमलबजावणी करण्यापूर्वी वकिलांशी चर्चा किंवा त्यांचे मत विचारात घेणे आवश्यक होते, वकिलांचे मत

पुणे: येत्या १ जुलैपासून भारतीय दंड विधान, भारतीय फौजदारी संहिता आणि भारतीय पुरावा कायदा रद्द होऊन भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्षीदार पुरावा अधिनियम या नावाने तीन नवीन कायदे लागू होणार आहेत. न्यायाधीशांसह सरकारी व बचाव पक्षाचे वकील आणि पोलिसांनाही नवीन कायद्याचा ‘गृहपाठ’ त्यामुळे करावा लागणार आहे. एक जुलैपूर्वी जुन्या कायद्याच्या कलमानुसार दाखल गुन्ह्यांचे काय, त्याबद्दल स्पष्टता नसल्याने काहीसा संभ्रमही असल्याचे मत वकिलांनी नोंदविले.

पूर्वी विशिष्ट गुन्ह्यासाठी अधोरेखित करण्यात येणाऱ्या कलमांच्या क्रमांकामध्ये बदल करण्यात आले आहेत. आता खुनासाठी ३०२ नव्हे तर १०३ कलम असणार आहे. ब्रिटिश काळात लागू करण्यात आलेले कायदेच स्वातंत्र्यानंतरही वापरले जात आहेत, अशी टीका सातत्याने केली जात होती. मात्र, या कायद्यांची अंमलबजावणी करण्यापूर्वी वकिलांशी चर्चा किंवा त्यांचे मत विचारात घेणे आवश्यक होते, याकडे वकिलांनी लक्ष वेधले आहे.

नुसते कायद्यांचे नाव नाही बदलले तर त्यातील कलमे व त्यातील तरतुदी थोड्या फार प्रमाणात बदलल्या आहेत. शिक्षा बहुतांश पूर्वीच्याच कायद्याप्रमाणे आहेत. त्यामुळे नवीन कायद्याला सामोरे जाताना पोलिसांना, न्यायाधीशांना, समाजाला व खासगी वकिलांना थोडा त्रास होणार आहे. देशातील संपूर्ण फौजदारी कायद्यांची यामुळे उलथापालथ होणार आहे. या कायद्यांवर अधिक चर्चेची गरज होती. - ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार, माजी अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन

नवीन कायद्यांमध्ये काही तरतुदी समाविष्ट केल्या आहेत आणि कलमांच्या क्रमांकामध्ये बदल करण्यात आले आहेत. उदा. खून म्हटले की ३०२. पण, आता न्यायाधीश, सरकारी व बचाव पक्षाचे वकील आणि पोलिसांनादेखील अभ्यास करावा लागणार आहे. पूर्वी कायद्यामध्ये ‘ज्युरी’ची व्याख्या होती. पण इंग्रज गेल्यानंतर आता त्याची गरज राहिली नाही. भारतीय दंड संहिता मध्ये २ ते ५४ पर्यंतच्या व्याख्या आता नवीन भारतीय न्याय संहिता कायद्यात व्याख्या २ अंतर्गत समाविष्ट केल्या आहेत. याशिवाय फेसबुकवर एखादी आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली तर त्याला काय शिक्षा होईल यासाठी स्वतंत्र कलमे लावली आहेत. इलेक्ट्रॉनिक पुराव्यांबाबतही तरतुदी समाविष्ट केलेल्या आहेत. नवीन कायद्यात आता स्पष्टता आली आहे - ॲड. लीना पाठक, सरकारी वकील

नवीन कायद्यात केवळ काही कलमे नव्याने समाविष्ट केली आहेत आणि कलमांचे क्रमांक बदलण्यात आले आहेत. न्यायालयात खटले प्रलंबित राहतात. त्यासाठी जलदगतीने न्यायदानासाठीचा विचार व्हायला हवा होता. अशा कोणत्याही नवीन तरतुदी कायद्यात नाहीत. नवीन कायद्यांत कलमांचे क्रमांक बदलण्यात आल्याने रजिस्टर समोर घेऊन नव्याने कलमांचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळे वकिलांना अडचणी येणार आहेत. - ॲड. विजयसिंह ठोंबरे, फौजदारी वकील

टॅग्स :PuneपुणेadvocateवकिलCourtन्यायालयPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी