शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पवना पूरग्रस्तांना नोटिसा, वन विभागाला आली १४० वर्षांनंतर जाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 01:02 IST

खेड तालुक्यातील खराबवाडी तसेच वासुली गावात पवना धरणग्रस्तांचे, भूमिहीन व माजी सैनिकांचे पुनर्वसन ७०च्या दशकात झाले. त्यावर वस्ती झाली, व्यापारी-व्यावसायिक उद्योग उभे राहिले. येथे चौरसफुटाला भाव आला.

खेड - खेड तालुक्यातील खराबवाडी तसेच वासुली गावात पवना धरणग्रस्तांचे, भूमिहीन व माजी सैनिकांचे पुनर्वसन ७०च्या दशकात झाले. त्यावर वस्ती झाली, व्यापारी-व्यावसायिक उद्योग उभे राहिले. येथे चौरसफुटाला भाव आला. मात्र, ही जमीन त्यांची नसून आमची असल्याचा साक्षात्कार तब्बल १४० वर्षांनंतर वन खात्याला झाला आहे. वन खात्याने याबाबत सर्वांना नोटिसा पाठविल्या असून त्यामुळे मात्र, पुनर्वसितांचा जीव मात्र पुन्हा टांगणीला लागला आहे.खेड तालुक्यातील धरणग्रस्तांची टोलवाटोलवी अनेक दिवसांपासूनची आहे. धरणग्रस्तांचा अक्षरश: फुटबॉल केल्याच्या अनेक घटना यास साक्षी आहेत. पवना धरणग्रस्तांचे खेड तालुक्यात साधरण ५५ वर्षांपूर्वी पुनर्वसन झाले. तसेच यामध्ये सैनिक व भूमिहीन यांचाही समावेश होता. मात्र, त्यांच्या पूनर्वसित जागेवर वन विभागाने त्यांचा हक्क सांगितल्याने पुन्हा त्यांची परवड होण्यास सुरुवात झाली आहे. वन खात्याच्या सहायक वनसंरक्षकांनी खराबवाडी, वासुली गावच्या काही खातेदारांना नोटिसा काढल्याने हे प्रकरण पुढे आले आहे. खराबवाडी येथील सध्याचा गट नंबर २०० चे १२२.२६ एकर हे १ मार्च १८७९ चे गॅझेट नोटिफिकेशन २४ एफ नुसार राखीव वन म्हणून घोषित झाले होते. तसेच वासुली येथील जुना सर्व्हे नंबर १२ गट नंबर ११८ अ चे ४४.२० एकर तसेच गट नंबर ११८ ब चे ५१.३२ एकर अशा एकूण ९५ एकर जमिनीचे १६ जुलै १८८९ रोजी राखीव वन म्हणून नोटिफिकेशन झाले. तेव्हापासून या गॅझेटचा वैधानिक दर्जा कायम असल्याचा वनखात्याचा दावा आहे. या संदर्भात वन खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. या जमिनीवर १९६७च्या सुमारास पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाले. तसेच भूमिहीन व माजी सैनिकांचेही पुनर्वसन येथे झाले.सध्या या जमिनीवर घरे, व्यापारी संकुले, गोदामे, सदनिका, छोटे उद्योग उभे राहिलेत. खरेदी-विक्रीही त्यानुसार येथे झाली, असे असताना वन खात्याच्या सुनावणीच्या नोटिसीने खातेदार मात्र धास्तावले आहेत. आता हे काय नवीन नाटक इतक्या वर्षांनी, अशा प्रातिनिधिक प्रतिक्रिया येथून उमटत आहेत.साधारण १४० वर्षांचे वन खात्याचे गॅझेट, त्याची वैधानिक बाजू, झालेले पुनर्वसन आणि लोटलेला काळ पाहता ‘...अजब तुझे सरकार!’ असे म्हणण्याची वेळ येथील पुनर्वसित धरणग्रस्तांवर आली आहे.१९६७मध्ये झाले पुनर्वसन४खराबवाडी, वासुली येथे १९६७मध्ये पुनर्वसन झाले होते. यानंतर पुन्हा १९९७मध्ये एमआयडीसीसाठी पुनर्वसन झाले. एकाच जमिनीचे दोन वेळा संपादन हे धोरणांविरोधात होते. जमिनीचे निर्वनीकरण झाले असतानाही केवळ गॅझेट न झाल्याने वन खाते या जमिनींवर दावा सांगत आहे. यामुळे वन खाते, संपादन विभाग व महसूल खाते या शासकीय यंत्रणेतील समन्वयाअभावी पवना धरणग्रस्त, माजी सैनिक, भूमिहीन हे आरोपीच्या पिंजºयात सापडले आहेत.राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले नाही, हा सरकारी यंत्रणेचा दोष आहे. या जमिनीचे निर्वनीकरण झाले आहे. हा सरकारी तांत्रिक दोष संबंधित यंत्रणेने आधी दूर करावा, नंतर लाभार्थ्यांना आरोपीच्या पिंजºयात उभे करावे. वन खात्याचा कारभार म्हणजे ‘साप सोडून भुई धोपटणे’ आहे.- बाळासाहेब शिळवणे (लाभार्थी)काय आहे हे प्रकरण?खराबवाडी, वासुली येथे पुनर्वसन साधारण १९६७मध्ये.जमीन सुमारे ६४० एकरसध्या येथे नागरी वस्ती, उद्योग-व्यसाय.वन खात्याचे म्हणणे आहे, की पूर्वीच्या गॅझेटचा वैधानिक दर्जा कायम.वन खात्याच्या दृष्टीने ही जागा राखीव वनांसाठी.वन खात्यातर्फे खातेदारांना नोटिसा.खातेदार संतप्त.

टॅग्स :Puneपुणे