शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वसंत मोरे म्हणाले, "साहेबांवर नाराज नाही, पण मनात बेचैनी...!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 14:59 IST

सगळीकडे वसंत मोरे हे राज ठाकरे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा...

पुणे :राज ठाकरे (raj thackeray) बोलले की भोंगे उतरवले नाहीत तर आम्ही हनुमान चालिसा लावू, पण त्यांच्या या वक्तव्यामुळे माझ्या मतदारसंघात अनिष्ट परिणाम झाला आहे. त्यामुळे माझ्या मनात बेचैनी निर्माण झाली आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेच नगरसेवक वसंत मोरे (mns vasant more) यांनी सांगितले. याबाबत एकतर साहेब मला बोलावतील किंवा मी स्वत:च साहेबांकडे जाऊन माझे शंका निरसन करून घेईन, असे ते म्हणाले.

गुढीपाडव्याच्या सभेत बोलताना राज यांनी थेट हिंदुत्वाची पताका उंचावत वर अजानचे भोंगे उतरले नाहीत, तर आम्ही बरोबर त्यासमोरच हनुमान चालिसाचे भोंगे लावू असा जाहीर इशारा दिला. त्यावर बोलताना मनसेचे शहराध्यक्ष नगरसेवक मोरे म्हणाले, माझ्या मतदार संघात मुस्लिम मतदार आहेत. त्यांचे मनसेला, मला नेहमीच सहकार्य असते. सध्या त्यांचा रमजानचा महिना सुरू आहे. त्या भाषणानंतर लगेचच मला या मतदारांचे फोन आले. तात्या, तुम्ही कुठे भोंगा लावणार आहात का वगैरे त्यांनी भीतीदायक स्वरात विचारले.

त्यामुळेच माझ्या मनात बेचैनी निर्माण झाली आहे, असे मोरे यांनी सांगितले. साहेबांनी भोंगे उतरवले नाहीत तर असे म्हटले आहे, याचा अर्थ सरकारने यात लक्ष घालावे. त्वरित कारवाई करून सर्व भोंगे काढावेत असाही होतो, सरकारने पुढे येऊन अशी कारवाई करण्याची हिंमत दाखवावी असे मोरे म्हणाले. माझी भूमिका साहेबांपर्यंत पोहचली असेलच, ते मला नक्की बोलावतील व नाही बोलावले तर मी स्वत: जाऊन माझ्या मनातील शंका दूर करेन. या विषयावर स्थानिक नेत्यांशी बोलण्यापेक्षाही थेट साहेबांबरोबर बोलणेच योग्य राहील, असे मत मोरे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMaharashtraमहाराष्ट्र