शहरं
Join us  
Trending Stories
1
Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
2
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
3
IND vs AUS : गिलनं पुन्हा गमावला टॉस; युवा ऑलराउंडर दुखापतीमुळे OUT; कुलदीपसह प्रसिद्ध कृष्णाला संधी
4
टाटा मोटर्सचं नाव बदललं, आता 'या' नावाने शेअर बाजारात ओळखली जाणार कंपनी; डिमर्जरनंतर झाला मोठा बदल
5
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
6
SIP Investment: एका वर्षात एसआयपीनं भरला खिसा, मागील दिवाळीनंतर या ५ म्युच्युअल फंडांनी दिला २०% पेक्षा जास्त रिटर्न
7
"सलमान खानसोबत चित्रपट करणार नाही"; महेश मांजरेकरांचं मोठं विधान, म्हणाले- "मी त्याला शिवी..."
8
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
9
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पतीने पत्नीला कुऱ्हाडीनं कापलं! नंतर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला..
10
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
11
जान्हवी कपूर विवाहबंधनात अडकणार? अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल; लग्नाची तारीख सांगितल्याची चर्चा
12
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
13
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
15
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
16
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
17
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
18
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
19
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
20
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध

शेतीसाठीच्या उन्हाळी आवर्तनावर संक्रात : खडकवासला धरण पाणीसाठा अपुरा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 11:44 IST

खडकवासला धरणासाखळीतील एकूण पाणीसाठ्याचा अंदाज घेऊन शेतीसाठीचे उन्हाळी आवर्तन देणे शक्य नसल्याचे जलसंपदाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देपुणेकरांनंतर आता शेतकऱ्यांमध्ये रोष उन्हाळी आवर्तनाचा निर्णय २८ फेब्रुवारी अखेरपर्यंत धरणात किती साठा शिल्लक राहतो त्यावरपाणीसाठाच शिल्लक नसल्यामुळे पुणे शहरावरही पाणी कपात करण्याची वेळ येण्याची शक्यता

पुणे : पुणे शहरासह दौंड, इंदापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणासाखळीतील एकूण पाणीसाठ्याचा अंदाज घेऊन शेतीसाठीचे उन्हाळी आवर्तन देणे शक्य नसल्याचे जलसंपदाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच शिल्लक पाणी आता फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच वापरण्याचा निर्णय जलसंपदाच्या खडकवासला विभागाने घेतला असल्याचे समजते. पुणे शहराला २८ फेब्रुवारीपर्यंत लागणारे पाणी लक्षात घेता उर्वरित शिल्लक पाणी साठ्यातून  दौंड, इंदापूरसह सुमारे ३५ ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. उन्हाळी आवर्तनाचा निर्णय २८ फेब्रुवारी अखेरपर्यंत धरणात किती साठा शिल्लक राहतो त्यावर घेण्यात येतो. पुण्याला लागणारे पाणी बाजूला ठेवले तर फक्त अडीच टीएमसी पाणी धरणात शिल्लक रहाते. पुण्याच्या पाण्यात दर गुरूवारी कपात केल्यानंतरचा हा हिशोब आहे. या अडीच टीएमसी पाण्यात शेतीसाठी आवर्तन सोडणे अशक्य असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आले असल्याची माहिती मिळाली. पाण्याचे सगळे नियोजन आता पिण्यासाठी लागणारे पाणी लक्षात घेऊनच करण्यात येत आहे. त्यामुळेच शेतीसाठीचे उन्हाळी आवर्तनावर संक्रात आली आहे. खडकवासला धरणासाखळीत (खडकवासला, वरसगाव, पानशेत, टेमघर) मागीलवर्षी याच काळात २०. १२ टीएमसी होते. यंदा फक्त १५.१२ टीएमसी आहे. त्यामुळेच जलसंपदाचे पाण्याचे नियोजन बिघडले आहे. पाणीसाठा कमी झाल्यामुळेच गेले महिनाभर जलसंपदाकडून पुणे शहराला पाणी कपात करण्याबाबत आग्रह धरण्यात येत होता. त्यासाठी तीन वेळा पंप बंद करण्याची कारवाईही करण्यात आली. पुणे शहराला ११.५० टीएमसी पाणी कोटा मंजूर आहे. याचा अर्थ त्यांनी दररोज फक्त ८९२ दशलक्ष लिटर पाणी धरणातून घ्यायचे आहे. प्रत्यक्षात मात्र पालिका रोज १ हजार ३५० दशलक्ष लिटर पाणी घेत आहे. इतके पाणी मिळूनही संपुर्ण शहराला व्यवस्थित पाणी पुरवठा करताना पालिकेची दमछाक होत आहे. मात्र आता पाणीसाठाच शिल्लक नसल्यामुळे पुणे शहरावरही पाणी कपात करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. तसे थेट जाहीर न करता दर गुरूवारी पाणी पुुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्यादिवशी १३५० दशलक्ष लिटर पाण्याची बचत होणार आहे. आठवड्यातून एकदा १३५० म्हणजे महिनाभरात ५ हजार ४०० दशलक्ष लिटर पाण्याची बचत होणार आहे. हा निर्णय महापालिका व जलसंपदा यांनी स्थानिक स्तरावर घेतला असल्यामुळे २५ जानेवारीला पुण्याच्या पाण्याबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत जलसंपदा व महापालिका पदाधिकाºयांची मुबंईला होणारी बैठक झालीच नाही.   

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणी