शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

धर्माच्या नावाने भिंत नको, सेतू बांधायला हवा; संजय आवटे यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 10:29 IST

धर्माचा खरा अर्थ समजणे ही काळाची गरज

पुणे: ‘धर्माचा खरा अर्थ समजणे ही काळाची गरज आहे. महावीरांनी अहिंसा, अस्थेय, परिगृह असा संदेश दिला. धर्म म्हणजे धारणा; परंतु धर्माच्या नावाने भिंती बांधल्या जात असताना धर्माच्या नावाने सेतू बांधणे आणि तोडण्याचे काम चालू असताना जोडण्याचे काम महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे यांनी केले.

राष्ट्रसंत आचार्य भगवंत आनंदऋषीजी म. सा. यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त प. पू. चंदनबालाजी म. सा., प. पू. श्री. पद्मावतीजी म. सा. यांच्या आशीर्वादाने आनंद दरबार, दत्तनगरच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे, दि पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष राजेंद्रजी बाठिया, माजी नगरसेवक युवराज बेलदरे, प्रवीण चोरबोले, स्मिता कोंढरे, गणेश महाराज भगत, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस अक्षय जैन, संदीप बेलदरे, दीपक बेलदरे, देवीदास जाधव आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकार रवी कोपनर, गणेश वाघमोडे, धनराज गरड यांचा सन्मान करण्यात आला.

संपादक संजय आवटे म्हणाले की, ज्यांना महावीर कळतो त्यांना अहिंसा कळते. पूर्वी थोरांची ओळख नावाचे पुस्तक असायचे, आता चोरांची ओळख आहे. आपण खूप मोठे चोर असून उद्याच्या पिढ्यांचे भवितव्य चोरण्याचे काम आपण करत आहोत. अधर्म वाढत असताना धर्माने समकालीन संदर्भात भूमिका घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच आजच्या काळात पत्रकारिता करणे हे आव्हानात्मक आहे, तरीही ते आव्हान पेलून उत्तम पत्रकारिता अनेक लोक करतात, त्यांना पुरस्कार देणे ही बाब मोठी आहे.

जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महा प्रसादी श्री बन्सीलाल अनिल मनोज ओस्तवाल परिवार मिळला. स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रस्ताविक आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी केले. महेश लुंकड आणि सौरभ धोका यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास आनंद दरबार ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि महिला भगिनी उपस्थित होत्या.

पुरस्काराने जबाबदारी वाढते - आमदार तापकीर

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसारमाध्यमाकडे पाहिले जाते कारण पत्रकार नेहमीच सामान्य लोकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवतो व त्याला न्याय मिळवून देण्यासाठी झगडतो त्यामुळे त्यांचा गौरव करणे हे सामाजिक संस्थांचे कर्तव्यच आहे. मात्र गौरव झाला, पुरस्कार मिळाला की मग पत्रकारांचीही जबाबदारी अधिक वाढते, असे प्रतिपादन खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेReligious programmeधार्मिक कार्यक्रमJournalistपत्रकारSocialसामाजिक