शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

धर्माच्या नावाने भिंत नको, सेतू बांधायला हवा; संजय आवटे यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 10:29 IST

धर्माचा खरा अर्थ समजणे ही काळाची गरज

पुणे: ‘धर्माचा खरा अर्थ समजणे ही काळाची गरज आहे. महावीरांनी अहिंसा, अस्थेय, परिगृह असा संदेश दिला. धर्म म्हणजे धारणा; परंतु धर्माच्या नावाने भिंती बांधल्या जात असताना धर्माच्या नावाने सेतू बांधणे आणि तोडण्याचे काम चालू असताना जोडण्याचे काम महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे यांनी केले.

राष्ट्रसंत आचार्य भगवंत आनंदऋषीजी म. सा. यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त प. पू. चंदनबालाजी म. सा., प. पू. श्री. पद्मावतीजी म. सा. यांच्या आशीर्वादाने आनंद दरबार, दत्तनगरच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे, दि पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष राजेंद्रजी बाठिया, माजी नगरसेवक युवराज बेलदरे, प्रवीण चोरबोले, स्मिता कोंढरे, गणेश महाराज भगत, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस अक्षय जैन, संदीप बेलदरे, दीपक बेलदरे, देवीदास जाधव आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकार रवी कोपनर, गणेश वाघमोडे, धनराज गरड यांचा सन्मान करण्यात आला.

संपादक संजय आवटे म्हणाले की, ज्यांना महावीर कळतो त्यांना अहिंसा कळते. पूर्वी थोरांची ओळख नावाचे पुस्तक असायचे, आता चोरांची ओळख आहे. आपण खूप मोठे चोर असून उद्याच्या पिढ्यांचे भवितव्य चोरण्याचे काम आपण करत आहोत. अधर्म वाढत असताना धर्माने समकालीन संदर्भात भूमिका घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच आजच्या काळात पत्रकारिता करणे हे आव्हानात्मक आहे, तरीही ते आव्हान पेलून उत्तम पत्रकारिता अनेक लोक करतात, त्यांना पुरस्कार देणे ही बाब मोठी आहे.

जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महा प्रसादी श्री बन्सीलाल अनिल मनोज ओस्तवाल परिवार मिळला. स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रस्ताविक आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी केले. महेश लुंकड आणि सौरभ धोका यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास आनंद दरबार ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि महिला भगिनी उपस्थित होत्या.

पुरस्काराने जबाबदारी वाढते - आमदार तापकीर

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसारमाध्यमाकडे पाहिले जाते कारण पत्रकार नेहमीच सामान्य लोकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवतो व त्याला न्याय मिळवून देण्यासाठी झगडतो त्यामुळे त्यांचा गौरव करणे हे सामाजिक संस्थांचे कर्तव्यच आहे. मात्र गौरव झाला, पुरस्कार मिळाला की मग पत्रकारांचीही जबाबदारी अधिक वाढते, असे प्रतिपादन खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेReligious programmeधार्मिक कार्यक्रमJournalistपत्रकारSocialसामाजिक