शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

धर्माच्या नावाने भिंत नको, सेतू बांधायला हवा; संजय आवटे यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 10:29 IST

धर्माचा खरा अर्थ समजणे ही काळाची गरज

पुणे: ‘धर्माचा खरा अर्थ समजणे ही काळाची गरज आहे. महावीरांनी अहिंसा, अस्थेय, परिगृह असा संदेश दिला. धर्म म्हणजे धारणा; परंतु धर्माच्या नावाने भिंती बांधल्या जात असताना धर्माच्या नावाने सेतू बांधणे आणि तोडण्याचे काम चालू असताना जोडण्याचे काम महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे यांनी केले.

राष्ट्रसंत आचार्य भगवंत आनंदऋषीजी म. सा. यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त प. पू. चंदनबालाजी म. सा., प. पू. श्री. पद्मावतीजी म. सा. यांच्या आशीर्वादाने आनंद दरबार, दत्तनगरच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे, दि पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष राजेंद्रजी बाठिया, माजी नगरसेवक युवराज बेलदरे, प्रवीण चोरबोले, स्मिता कोंढरे, गणेश महाराज भगत, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस अक्षय जैन, संदीप बेलदरे, दीपक बेलदरे, देवीदास जाधव आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकार रवी कोपनर, गणेश वाघमोडे, धनराज गरड यांचा सन्मान करण्यात आला.

संपादक संजय आवटे म्हणाले की, ज्यांना महावीर कळतो त्यांना अहिंसा कळते. पूर्वी थोरांची ओळख नावाचे पुस्तक असायचे, आता चोरांची ओळख आहे. आपण खूप मोठे चोर असून उद्याच्या पिढ्यांचे भवितव्य चोरण्याचे काम आपण करत आहोत. अधर्म वाढत असताना धर्माने समकालीन संदर्भात भूमिका घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच आजच्या काळात पत्रकारिता करणे हे आव्हानात्मक आहे, तरीही ते आव्हान पेलून उत्तम पत्रकारिता अनेक लोक करतात, त्यांना पुरस्कार देणे ही बाब मोठी आहे.

जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महा प्रसादी श्री बन्सीलाल अनिल मनोज ओस्तवाल परिवार मिळला. स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रस्ताविक आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी केले. महेश लुंकड आणि सौरभ धोका यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास आनंद दरबार ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि महिला भगिनी उपस्थित होत्या.

पुरस्काराने जबाबदारी वाढते - आमदार तापकीर

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसारमाध्यमाकडे पाहिले जाते कारण पत्रकार नेहमीच सामान्य लोकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवतो व त्याला न्याय मिळवून देण्यासाठी झगडतो त्यामुळे त्यांचा गौरव करणे हे सामाजिक संस्थांचे कर्तव्यच आहे. मात्र गौरव झाला, पुरस्कार मिळाला की मग पत्रकारांचीही जबाबदारी अधिक वाढते, असे प्रतिपादन खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेReligious programmeधार्मिक कार्यक्रमJournalistपत्रकारSocialसामाजिक