शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

धर्माच्या नावाने भिंत नको, सेतू बांधायला हवा; संजय आवटे यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 10:29 IST

धर्माचा खरा अर्थ समजणे ही काळाची गरज

पुणे: ‘धर्माचा खरा अर्थ समजणे ही काळाची गरज आहे. महावीरांनी अहिंसा, अस्थेय, परिगृह असा संदेश दिला. धर्म म्हणजे धारणा; परंतु धर्माच्या नावाने भिंती बांधल्या जात असताना धर्माच्या नावाने सेतू बांधणे आणि तोडण्याचे काम चालू असताना जोडण्याचे काम महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे यांनी केले.

राष्ट्रसंत आचार्य भगवंत आनंदऋषीजी म. सा. यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त प. पू. चंदनबालाजी म. सा., प. पू. श्री. पद्मावतीजी म. सा. यांच्या आशीर्वादाने आनंद दरबार, दत्तनगरच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे, दि पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष राजेंद्रजी बाठिया, माजी नगरसेवक युवराज बेलदरे, प्रवीण चोरबोले, स्मिता कोंढरे, गणेश महाराज भगत, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस अक्षय जैन, संदीप बेलदरे, दीपक बेलदरे, देवीदास जाधव आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकार रवी कोपनर, गणेश वाघमोडे, धनराज गरड यांचा सन्मान करण्यात आला.

संपादक संजय आवटे म्हणाले की, ज्यांना महावीर कळतो त्यांना अहिंसा कळते. पूर्वी थोरांची ओळख नावाचे पुस्तक असायचे, आता चोरांची ओळख आहे. आपण खूप मोठे चोर असून उद्याच्या पिढ्यांचे भवितव्य चोरण्याचे काम आपण करत आहोत. अधर्म वाढत असताना धर्माने समकालीन संदर्भात भूमिका घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच आजच्या काळात पत्रकारिता करणे हे आव्हानात्मक आहे, तरीही ते आव्हान पेलून उत्तम पत्रकारिता अनेक लोक करतात, त्यांना पुरस्कार देणे ही बाब मोठी आहे.

जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महा प्रसादी श्री बन्सीलाल अनिल मनोज ओस्तवाल परिवार मिळला. स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रस्ताविक आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी केले. महेश लुंकड आणि सौरभ धोका यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास आनंद दरबार ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि महिला भगिनी उपस्थित होत्या.

पुरस्काराने जबाबदारी वाढते - आमदार तापकीर

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसारमाध्यमाकडे पाहिले जाते कारण पत्रकार नेहमीच सामान्य लोकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवतो व त्याला न्याय मिळवून देण्यासाठी झगडतो त्यामुळे त्यांचा गौरव करणे हे सामाजिक संस्थांचे कर्तव्यच आहे. मात्र गौरव झाला, पुरस्कार मिळाला की मग पत्रकारांचीही जबाबदारी अधिक वाढते, असे प्रतिपादन खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेReligious programmeधार्मिक कार्यक्रमJournalistपत्रकारSocialसामाजिक