शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

दुप्पट पाणी घेऊनही पुण्याची भागेना तहान 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 11:00 PM

जर आताच पाण्याची बचत केली नाही, तर भविष्यात पुणेकरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे.

ठळक मुद्देपाणी वितरणाचे नियोजन,गळती रोखणे,पुनर्वापरावर भर गरजेचाएका व्यक्तीने दररोज १५५ लिटर पाणी वापरणे अपेक्षितलोकसंख्येच्या आकडेवारीवरच पालिकेला एका वर्षासाठी ८.१९ टीएमसी पाणी मंजूर

पुणे: महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमानुसार मंजूर झालेल्या पाण्याच्या दुप्पट पाणी सध्या पुणे महापालिका वापरत आहे. पालिकेला लोकसंख्येच्या आधारे अधिक पाणी मिळवता येणार आहे. मात्र, पुढील वीस वर्षांनंतर आवश्यक असलेल्या पाण्याचा वापर सध्या पालिकेकडून केला जात असल्याने पुणे शहराची तहान कधीही भागणार नाही, अशीच सध्याची स्थिती आहे.त्यामुळे पाणी वितरणाचे योग्य नियोजन,पाण्याची गळती व चोरी रोखणे आणि पाण्याच्या पुनर्वापरावर भर देण्याशिवाय पालिकेला कोणताही पर्याय नाही, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. जर आताच पाण्याची बचत केली नाही, तर भविष्यात पुणेकरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे.एका व्यक्तीने अंघोळ,बाथरूम,पिण्याचे पाणी, कपडे, भांडे धुण्यासाठी दररोज १५५ लिटर पाणी वापरणे अपेक्षित आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडून या नियमाच्या आधारेच पाणी मंजूर केले जाते. पुणे महापालिकेने सादर केलेल्या लोकसंख्येच्या आकडेवारीवरच पालिकेला एका वर्षासाठी ८.१९ टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले. त्यानुसार पालिकेने दररोज ६३५ दशलक्ष घन मिटर (एमएलडी) पाणी वापरावे अशी अपेक्षा आहे.मात्र,पालिकेकडून १३५० एमएलडी पाण्याचा वापर केला जातो. शहराची वाढती लोकसंख्या,पालिका हद्दीत समाविष्ट होणा-या गावांची संख्या आणि तर ती लोकसंख्या (फ्लोटींग पॉप्युलेशन) ह्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पाण्याचा वापर वाढत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगितले जात असून वाढी पाण्याची मागणी केली जात आहे. परंतु, कितीही प्रयत्न केले तरी पालिकेला एक कोटी लोकसंख्येचा आकडा दाखवता येणार नाही.पालिकेने सप्टेबर २०१७ मध्ये जलसंपदा विभागाला सादर केलेल्या दिलेल्या शपथपत्रामध्ये शहराची लोकसंख्या २०३२ पर्यंत ५२ लाख ७१ लाख होईल,असे नमूद केले होते. त्यावर पालिकेला २०३२ मध्ये १२.८३ टीएमसी पाणी पुरेसे होईल,असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले होते. मात्र,पालिकेकडून तब्बल १७ टीएमसी पाण्याची मागणी केली जात आहे.परंतु, जुलै २०१८ पासून फेब्रुवारी २०१९ पर्यंत पालिकेने एकाही महिन्यात सरासरी १३०० ते १३५० एमएलडी पेक्षा कमी पाणी वापरले नाही. त्यामुळे पालिकेकडून नहेमीच मंजूर पाण्याच्या दुप्पटच पाणी वापर होत असल्याचे दिसून येते.परिणामी पालिकेला मंजूर पाण्यातच शहराची तहान भागवावी लागणार आहे.त्यासाठी पालिकेने शहरातील जलवाहिन्यातून होणारी पाण्याची चोरी व गळती थांबविणे गरजेचे आहे. मुंढवा जॅकवेलमधून सिंचनासाठी लागणारे पाणी उपलब्ध करून देवून त्याची क्षमता वाढवणे,पाण्याचे वितरण योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे.------------------पुणे महापालिकेला मंजूर झालेल्या पाण्यात पुणे शहराची तहान भागवणे गरजेचे आहे. त्यासाठी पाण्याचे वितरण नियोजनबध्द पध्दतीने करण्याची आवश्यकता आहे.मंजूर पाण्यातच शहराची तहान भागवण्याचे ठरवले तर पाणी कमी पडणार नाही.मात्र,नियोजनाकडेच दूर्लक्ष होत आहे.- सुरेश शिर्के ,माजी सचिव,जलसंपदा विभाग

 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका