शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात ' पुणे झाले उणे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 11:54 IST

पुणेकरांनी देखील सन २०१४ आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश दिले...

ठळक मुद्देशहराच्या विकासावर मोठा परिणाम होणार

पुणे: राज्याच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्यागिक विकासामध्ये पुणे शहराला अत्यंत महत्व आहे. तसेच मुंबईनंतर सर्वांत मोठे शहर म्हणून देखील पुण्याचा नंबर लागतो. पुणेकरांनी देखील सन २०१४ निवडणुकीत आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश दिले, असे असताना मंत्री मंडळाच्या विस्तारामध्ये पुण्याला एकही मंत्री पद देण्यात आले नाही. यामुळे पुणेकरांवर मोठा अन्याय झाला असून, याचा शहराच्या विकासावर मोठा परिणाम होणार असल्याची टिका विरोधकांनी केली आहे.    देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदार संघातून भाजपचे गिरीश बापट खासदार म्हणून निवडून आले. यामुळे बापट यांनी राज्याच्या मंत्री मंडळाचा व पुण्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनाम दिला. बापट यांच्या राजीनाम्यानंतर  मंत्री मंडळाच्या विस्तारामध्ये पुण्यात कुणाला मंत्रीपदाची संधी मिळणार यांची रोजदार चर्चा रंगली होती. यामध्ये प्रामुख्याने सलग तीन वेळा निवडून आलेल्या माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर आणि योगेश टिळेकर  यांना मंत्री मंडळामध्ये संधी मिळेल अशी अपेक्षा होती. यामध्ये पहिल्यावेळी संधी हुकलेल्या मिसाळ मंत्रीपद मिळण्यासाठी अधिक दावेदार होत्या. परंतु रविवारी झालेल्या मंत्री मंडळाच्या विस्तारामध्ये बापटाच्या जागी पुण्याला मंत्री देणे सोडाच राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा देखील राजीनाम घेण्यात आला. यामुळे पुणेकरांनी भरभरुन यश देणा-या भाजपने पुणेकरांना मंत्री मंडळाच्या विस्तारामध्ये ठेंगा दाखविला आहे.    शहराच्या विकासाच्या दृष्टीने अनेक प्रश्न शासनाच्या स्तरावर प्रलंबित आहेत. यामध्ये मेट्रो प्रकल्प असो की, वाहतुक कोंडीचा प्रश्न, कचरा प्रश्न, शहरातील एचसीएमटीआर वर्तुळाकर रस्ता, पीएमआरडीचा रिंगरोड, आतंरराष्ट्रीय विमानतळ यासारखे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. याशिवाय पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्याचा आरक्षणाचा प्रश्न देखील शासनाच्या पातळीवर प्रलंबित आहे. शहराच्या विकासासाठी व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी, प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मंत्री मंडळामध्ये पाठपुरावा करण्यासाठी आता शहरातील एकही प्रतिनिधी नाही. याचा शहराच्या विकासावर मोठा परिणाम होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.--------------------पुणेकरांचे दुर्भाग्यपुणेकरांनी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीमध्ये देखील भरभरुन यश दिले आहे. पुणेकरांचे प्रश्न, प्रलंबित विकास प्रकल्प मार्गी लागतील या अपेक्षाने पुणेकरांनी भाजपला मतदान केले आहे. राज्यात मुंबईनंतर पुणे सर्वांत मोठे शहर असून, राज्याच्या मंत्री मंडळामध्ये किमान एका तरी व्यक्तींला प्रतिनिधीत्व देणे अपेक्षित होते. मेट्रो प्रकल्प मंजुर करताना देखील पुण्याबाबत दुजाभाव करण्यात आला होता. गेल्या चार-पाच वर्षांत सातत्याने पुण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.  पुणेकरांनी घवघवीत यश दिल्यानंतर त्याच्या वाट्याला काहीच आले नाही हे दुर्भाग्यच म्हणावे लागले.-रमेश बागवे, काँग्रेस शहराध्यक्ष------------------------पुणेकरांवर अन्यायगेली सहा-सात दशके राज्याच्या सत्तेचे केंद्र म्हणून मंत्री मंडळामध्ये पुण्याचा दबदबा होता. परंतु सन २०१४ च्या निवडणुकीमध्ये राज्यातमध्ये सत्तांतरण झाले व राज्याचे राजकीय सत्ताकेंद्र नागपूरकडे सरकले. परंतु याचा मोठा परिणाम शहर आणि जिल्ह्याच्या विकासावर झाला आहे. शहर आणि जिल्ह्यातील अनेक महत्वाचे मेट्रो असो की विमानतळ, रिंगरोड  प्रकल्पांना अपेक्षित गती मिळालेली नाही. मेट्रो, विमानतळाच्या विकासासाठी नागरपूरकडेच अधिक लक्ष दिले जात आहे. त्यात आता मंत्री मंडळामध्ये पुणेकरांचे प्रतिनिधीत्व करणारी एकही व्यक्ती नाही, हा पुणेकरांवर एक प्रकारचा अन्यायच आहे. याची किमंत भविष्यात पुणेकरांना मोजावी लागेल.-अकुश काकडे, राष्ट्रवादी काँगे्रस प्रवक्ते------------------------------शहराच्या विकासावर परिणाम भाजपला एक खासदरा, आठ आमदार, नव्वद हून अधिक नगरसेवक देणा-या पुणेकरांना भाजपने काय दिले. त्यात नव्याने करण्यात आलेल्या राज्याच्या मंत्री मंडळाच्या विस्तारामध्ये पुणेकरांचाय एकही प्रतिनिधी नाही ही खेदाची बाब आहे. याचा शहराच्या विकासावर मोठा परिणाम होणार आहे. त्यातही मंत्री पद मिळून देखील गेल्या चार वर्षांत काहीच विकास झाला नाही. त्यामुळे भाजप सत्तेवर असे पर्यंत पुण्याच्या विकासावर परिणाम होणारच आहे.-अजय शिंदे, मनसे शहर अध्यक्ष-------------------शहराच्या विकासावर कोणातही परिणाम नाहीराज्याच्या मंत्री मंडळामध्ये आता पर्यंत पुणे शहराला दोन मंत्रीपदे देण्यात आली होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: नियमित शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील असतात. राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार करताना आगामी विधानसभा निवडणुकीची राजकीय गणित लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठीने निर्णय घेतला आहे. परंतु याचा पुणे शहराच्या विकासावर कोणताही परिणाम होणार नाही.-योगेश गोगावले, भाजप शहर अध्यक्ष

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGovernmentसरकारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस