शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस नको असलेला पाहुणा; भाजपचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 21:21 IST

सरकारमध्ये निर्णय घेताना काँग्रेसला फारसे विश्वासात घेतले जात नाही...

पुणे:  महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांमध्ये सुरु असलेली धुसफूस लपून राहिलेली नाही. त्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून सातत्याने सत्तेतील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेचे बाण सोडले जात आहे. त्यात धक्कादायक बाब म्हणजे पटोले यांनी मुख्यमंत्री माझ्यावर पाळत ठेवत आहे असा गंभीर आरोप केला होता. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. मात्र, याच दरम्यान भाजपने काँग्रेस हा महाविकास आघाडी सरकारमध्ये नको असलेला पाहुणा बनला आहे अशा शब्दात टीकास्त्र सोडले आहे. 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची मोठी अडचण होऊ लागली असून सध्याचे आघाडीचे सरकार आता तिघाडीचे सरकारच बनले आहे. तसेच सरकारमध्ये निर्णय घेताना काँग्रेसला फारसे विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे काँग्रेस हा सरकारमध्ये नको असलेला पाहुणा बनला आहे, असे टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.  

वादग्रस्त वक्तव्यामुळे काही दिवसांपासून महाविकास आघाडीत वांदग निर्माण झाले असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याने वाद आणखी उफाळून आला आहे. धोरणात्मक निर्णय घेताना काँग्रेसला विचारात घेतले जात नाही. त्यामुळे कॉंग्रेसची अवस्था बिकट बनली आहे असेही भंडारी म्हणाले.

विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपच्या आमदारांचे निलंबन राजकीय हेतूने करण्यात आले असा आरोप करून भंडारी म्हणाले, सभापतीपदाची निवडणूक झाकण्याच्या प्रयत्नाच्या दृष्टीने भाजपचे आमदार अनुपस्थित राहावेत यासाठीच ही कार्यवाही करण्यात आली.परंतु, याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागण्याच्या हालचाली सुरु आहेत.---------------------------खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्री मंडळात स्थान न दिल्यामुळे प्रीतम मुंडे व पंकजा मुंडे नाराज असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरु झाले आहे.परंतु, याबाबत चर्चा सुरु असून लवकरच नाराजी दूर होईल, असेही  भंडारी यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेState Governmentराज्य सरकारcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस