शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

रात्र शाळांमधील रिक्त जागांच्या भरतीचा शासनाला विसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 19:54 IST

शिक्षकांकडून शिकायला मिळते, पुस्तकांच्या पलीकडे जाऊन काहीतरी वर्गात शिकता येते म्हणून दिवसभर नोकरी केल्यानंतर कष्टकरी विद्यार्थी रात्रशाळांमध्ये येतात.मात्र..,

ठळक मुद्देपवित्र पोर्टलच्या प्रक्रियेत नाही समावेश : विद्यार्थ्यांना बसतोय फटकाशिक्षण आयुक्तांनी अपर सचिवांकडे मागणीशासनाच्या २०१७ मधील आदेशाचीच अद्याप अंमलबजावणी नाहीरात्र शाळांमधील रिक्त जागांच्या भरतीबाबत प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर निर्णय घेण्याची बाब

- दीपक जाधव -पुणे : राज्यातील रात्रशाळांमधून दुबार नोकरी करणारे १ हजार ४५६ शिक्षक शासनाने जून २०१७ मध्ये कमी केले. या रिक्त जागांवर कायमस्वरूपी शिक्षक भरती करण्यासाठी या जागांची पवित्र पोर्टलमार्फत भरती प्रक्रिया सुरू करणे आवश्यक होते. मात्र प्रत्यक्षात रात्र शाळांमधील रिक्त जागांची भरती करण्याबाबत शासनाने कुठलाच निर्णय घेतलेला नाही. याचा मोठा फटका रात्र शाळांमधील विद्यार्थ्यांना बसत असून ते शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जात आहेत.   राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील १२ हजार रिक्त जागांची भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलमार्फत राज्य शासनाने सुरू केली आहे. यामध्ये रात्र शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त असलेल्या एक हजार जागांचाही समावेश होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात शासनाकडून रात्र शाळांमधील शिक्षक भरतीबाबत कुठलाच निर्णय घेतलेला नाही. राज्यात १६५ रात्रशाळांमध्ये २५ हजार विद्यार्थी शिक्षक घेत आहेत. या शाळांमध्ये १ हजार ४५६ शिक्षक दुबार नोकरी करीत होते. म्हणजे दिवसा एका शाळेत नोकरी करून पुन्हा ते रात्र शाळेत कार्यरत होते. मात्र शासनाने हे दुबार नोकरीचे धोरण अमान्य करून त्यांची सेवा जूनमध्ये २०१७ पासून समाप्त केली. त्यानंतर या जागांवर काही ठिकाणी अतिरिक्त शिक्षक उपलब्ध करून देण्यात आले. तर काही ठिकाणी दुबार शिक्षकच कार्यरत राहिले. मात्र उर्वरित बहुसंख्य शिक्षकांच्या जागा रिक्त राहिल्या. शाळेत शिक्षकच शिकवायला येत नसल्याने विद्यार्थ्यांना मोठया अडचणींना सामोरे जावे लागले. विशेषत: दहावी-बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसला. इंग्रजी, गणित, विज्ञान आदी विषयांना वर्षभर शिक्षकच उपलब्ध झाले नसल्याने त्यांना केवळ स्व-अभ्यास करूनच परीक्षा द्यावी लागली. राज्य शासनाकडून लवकरच भरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याने त्याअंतर्गत रात्र शाळांमधील रिक्त जागा भरल्या जातील असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले होते. राज्यातील बहुप्रतिक्षेत असलेली शिक्षक भरती प्रक्रिया अखेर आचार संहिता लागण्यापूर्वी काही दिवस अगोदर जाहीर झाली. त्यामध्ये राज्यातील १२ हजार शिक्षकांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. मात्र यामध्ये रात्र शाळांमधील रिक्त जागांचा समावेशच करण्यात आलेला नाही. शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर रात्र शाळांना शिक्षक मिळतील याची प्रतिक्षा करीत असलेल्या विद्यार्थ्यांचा मात्र यामुळे मोठा हिरमोड झाला आहे.  .....................रात्र शाळांमधील रिक्त जागांच्या भरतीबाबत प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर निर्णय घेण्याची बाब धोरणात्मक स्वरूपाची आहे. त्यामुळे मंत्रालयस्तरावरून याबाबतची योग्य ती कार्यवाही केली जावी असे पत्र शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पाठविलेले आहे................स्कूलतर ते वर्गात बसणार कसे?शिक्षकांकडून शिकायला मिळते, पुस्तकांच्या पलीकडे जाऊन काहीतरी वर्गात शिकता येते म्हणून दिवसभर नोकरी केल्यानंतर कष्टकरी विद्यार्थी रात्रशाळांमध्ये येतात. मात्र,  दिवसभर थकून शाळेत आल्यानंतर वर्गात शिक्षकच उपलब्ध असणार नसतील तर शाळेला यायचेच कशासाठी अशी भावना रात्र शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत आहे. मात्र शासनाकडून हा प्रश्न सोडविण्यासाठी कुठलीच हालचाल होताना दिसत नाही...........................शासनाच्या २०१७ मधील आदेशाचीच अद्याप अंमलबजावणी नाहीराज्य शासनाने जून २०१७ मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार दुबार शिक्षकांची सेवा संपुष्टात आणली. मात्र त्याचबरोबर या परिपत्रकामध्ये रात्र शाळांमधील शिक्षकांना पूर्णवेळ दर्जा देणे, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आदींबाबत आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणीच शिक्षण संचालक कार्यालयाकडून झालेली नाही.अविनाश ताकवले, प्राचार्य, पूना नाइट ..........................

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थीGovernmentसरकार