शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

नव्याने बायोगॅस प्रकल्प पुढे नाही - महापालिका प्रशासनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 06:46 IST

दुर्गंधीमुळे होणारा विरोध, खर्चाच्या तुलनेत पुरेसा फायदा नाही व जागेची कमतरता यांमुळे यापुढे ओल्या कच-यावर प्रक्रिया करणारा नवा बायोगॅस प्रकल्प करायचा नाही

पुणे : दुर्गंधीमुळे होणारा विरोध, खर्चाच्या तुलनेत पुरेसा फायदा नाही व जागेची कमतरता यांमुळे यापुढे ओल्या कच-यावर प्रक्रिया करणारा नवा बायोगॅस प्रकल्प करायचा नाही, असा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याऐवजी मिश्र कचºयापासून थेट वीजनिर्मिती करणाºया प्रकल्पांवर लक्ष देण्यात येत आहे. एकाच वेळी ७०० टन कचºयावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू होणार आहे. मात्र, यामुळे कचरा समस्येत वाढ होण्याची भीती आहे.शहरात रोज साधारण १ हजार ७०० टन कचरा निर्माण होतो. त्यातील सुमारे ८०० टन कचरा ओला असतो. ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. काही खासगी संस्थांकडेही हे काम देण्यात आले आहे. त्यांच्यासाठी विविध ठिकाणी खास शेड बांधण्यात आल्या आहेत. ओल्या कचºयावर प्रक्रिया करून त्यापासून गॅस तयार केला जातो. या गॅसचा वापर करून वीज तयार होते व ती पदपथावरील दिव्यांसाठी वापरली जाते. त्यासाठी महापालिकेने सुरुवातीला काही मोठे प्रकल्प सुरू केले होते; मात्र ते वेगवेगळ्या कारणांनी बंद पडले. त्यावर उपाय म्हणून क्षेत्रीय कार्यालयनिहाय किंवा प्रभागनिहाय प्रकल्प सुरू करण्याचे धोरण आखले. त्याप्रमाणे सध्या महापालिकेचे असे २५ बायोगॅस प्रकल्प आहेत. प्रत्येकी ५ टन कचºयावर तिथे रोज प्रक्रिया केली जाते. त्यापासून होणाºया विजेचा वापर दिव्यांसाठी केला जातो. मात्र, या प्रकल्पांपासून अपेक्षित फायदा होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच नव्याने असे प्रकल्प सुरू करण्याबाबत फेरविचार केला जात आहे.या प्रकल्पातील कचºयात लिंबाचे प्रमाण वाढले, की प्रक्रिया लांबते किंवा बंद पडते. त्यापासून खतही तयार होत नाही व गॅसही तयार होत नाही.ओल्या कचºयामध्ये बहुसंख्य कचरा हॉटेलमधील अन्नपदार्थांचा असतो. त्यात लिंबू असतेच. त्यामुळे ५ टनांच्या प्रकल्पात ५ टन कचराही जात नाही व हवी तेवढी वीजही तयार होत नाही, असे झाले आहे. त्यामुळेच प्रशासनाने आता प्रभागनिहाय असे प्रकल्प सुरू करायचेच नाहीत, असा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी मोठ्या क्षमतेचे प्रकल्प सुरू करण्याचा विचार केला जात आहे. मात्र, उरुळी येथील नागरिकांनी कचरा डेपो बंद करण्याची मागणी केली आहे. अशा प्रकल्पांसाठी नव्याने जमीन द्यायला कोणीही तयार नाही. काही जागा महापालिकेने निश्चित केल्या असून, तिथून विरोध होऊ नये यासाठी त्याविषयी गुप्तता बाळगली जात आहे.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिका