शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अध्यक्ष कोणीही करा, पण शून्य गुणिले शून्य बरोबर शून्यच! शेलारांची आघाडीवर टीका

By राजू इनामदार | Updated: February 14, 2025 17:31 IST

मी महाविकास आघाडीची एक्सापायरी डेट जवळ आल्याचे स्पष्ट केले होते, ते आता खरे ठरत आहे

पुणे : कोणाला अध्यक्ष करायचे हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे, मात्र मी गणिताचा विद्यार्थी असल्याने ‘शून्य गुणिले शून्य इज इक्वल टू शून्य हेच उत्तर येते’ हे मला माहीत आहे. त्यामुळे अध्यक्ष कोणीही केला तरी काँग्रेस शून्यच आहे, अशी टीका सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केली. काँग्रेसच्या नूतन प्रदेशाध्यक्ष निवडीवरून ते बोलत हाेते. महाविकास आघाडीची एक्सापायरी डेट जवळ आली आहे, असेही ते म्हणाले.

पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे उद्घाटन गुरूवारी सायंकाळी शेलार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी काही राजकीय विषयांवर संवाद साधला. भाजपकडून ईडीचा त्रास दिला जातो, त्यामुळे कोरी पाटी असलेला अध्यक्ष द्यायचा या विचाराने काँग्रेसने अध्यक्ष निवडला, असे शेलार म्हणाले. ज्यांची पाटी कोरी आहे, ते आमच्या पीएच. डी. च्या विद्यार्थ्यांशी काय लढणार, असा प्रतिप्रश्न केला.

विधानसभेचे जागा वाटप सुरू होते, त्याचवेळी मी महाविकास आघाडीची एक्सापायरी डेट जवळ आल्याचे स्पष्ट केले होते. ते आता खरे ठरत आहे, असेही शेलार म्हणाले. दुसऱ्या पक्षात कोणी प्रवेश केला की लगेचच त्याला ब्लॅकमेलिंग केले असे म्हटले जाते. मात्र उद्धव ठाकरे यांनी आमच्या पक्षातील काही लोकांना त्यांच्या पक्षात प्रवेश दिला, त्यावेळी आम्ही काय अशीच टीका केली होती का? त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्यामुळे असे बोलले जाते, असेही शेलार म्हणाले. उपमुख्यमंत्री शिंदे काहीही नाराज वगैरे नाही. मुख्यमंत्री व दोन्हीही उपमुख्यमंत्री एकमताने, परस्परांशी चर्चा करून निर्णय घेत आहेत. त्यामुळे शिंदेच काय कोणीही नाराज नाही. सगळे काही आलबेल आहे, सगळे व्यवस्थित काम करत आहेत, मी तुमच्यासमोर उभा आहे, असेही शेलार म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेAshish Shelarआशीष शेलारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारcongressकाँग्रेसBJPभाजपा