शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

'अशा कितीही शक्ती एकत्र आल्या तरी काही होणार नाही...' बच्चू कडूंची उद्धव ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 14:21 IST

किती ही शक्ती एकत्र आल्या तरी जन शक्तीसाठी तुम्ही काय केलं? बच्चू कडूंचा सवाल

पुणे: शिवशक्ती-भीमशक्ती आणि लहूशक्ती ही एकाच शक्तीची रूपे आहेत. या तिन्ही शक्ती एकत्र आल्या तर महाराष्ट्रात नव्हे, तर देशात एक प्रचंड ताकद निर्माण होईल. म्हणूनच शिवशक्ती-भीमशक्ती व लहूशक्तीचा लवकरच मेळावा घेणार आहे, अशी घोषणा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावरून आमदार बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. लोकांबाबत जर मनात आस्था नसेल अशा कितीही शक्ती एकत्र येऊन काय होणार नाही असं ते यावेळी म्हणाले आहेत. पुण्यात अर्हम फौंडेशन आणि वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने 'संवाद- स्पर्धा परीक्षा उमेदवारांशी' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. 

बच्चू कडू म्हणाले, किती ही शक्ती एकत्र आल्या तरी जन शक्तीसाठी तुम्ही काय केलं? दिव्यांगांसाठी आम्ही दहा वेळा गेलो, एकदा ही मीटिंग झाली नाही. लोकांबाबत जर मनात आस्था नसेल अश्या शक्ती एकत्र येऊन काय होणार नाही. मंत्री मंडळ विस्तार हे माझ्यासाठी महत्वाचं नाही. दिव्यांग मंत्रालयासमोर विस्तार ही लहान गोष्ट आहे. आता हे वंचितांचा विस्तार झाला पाहिजे. विस्तार कधी होणार हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना विचारलं पाहिजे.

 भाजपमध्ये छत्रपतींचा अपमान करण्याची स्पर्धा लागलीय...

संजय राऊत यांचं म्हणणं काही अंशी खरच आहे. मी त्यांच्या बाजूने आहे. काही लोक बोलतात, कुठल्याही महापुरुषांबद्दल बोलणे उचित नाही. त्याचा आम्ही निषेध करतो. सगळ्याच गोष्टीवर कारवाईची गरज नसते. जे बोलतात त्यांना हे समजल पाहिजे. स्वतः ची नाहीतर जनाची तर असली पाहिजे. राज्यपालांनी यावर स्पष्टीकरण देणे महत्वाचं आहे. सगळे प्रश्न कारवाईने सुटत नाही.

टॅग्स :PuneपुणेBachhu Kaduबच्चू कडूUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे