शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

'अशा कितीही शक्ती एकत्र आल्या तरी काही होणार नाही...' बच्चू कडूंची उद्धव ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 14:21 IST

किती ही शक्ती एकत्र आल्या तरी जन शक्तीसाठी तुम्ही काय केलं? बच्चू कडूंचा सवाल

पुणे: शिवशक्ती-भीमशक्ती आणि लहूशक्ती ही एकाच शक्तीची रूपे आहेत. या तिन्ही शक्ती एकत्र आल्या तर महाराष्ट्रात नव्हे, तर देशात एक प्रचंड ताकद निर्माण होईल. म्हणूनच शिवशक्ती-भीमशक्ती व लहूशक्तीचा लवकरच मेळावा घेणार आहे, अशी घोषणा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावरून आमदार बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. लोकांबाबत जर मनात आस्था नसेल अशा कितीही शक्ती एकत्र येऊन काय होणार नाही असं ते यावेळी म्हणाले आहेत. पुण्यात अर्हम फौंडेशन आणि वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने 'संवाद- स्पर्धा परीक्षा उमेदवारांशी' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. 

बच्चू कडू म्हणाले, किती ही शक्ती एकत्र आल्या तरी जन शक्तीसाठी तुम्ही काय केलं? दिव्यांगांसाठी आम्ही दहा वेळा गेलो, एकदा ही मीटिंग झाली नाही. लोकांबाबत जर मनात आस्था नसेल अश्या शक्ती एकत्र येऊन काय होणार नाही. मंत्री मंडळ विस्तार हे माझ्यासाठी महत्वाचं नाही. दिव्यांग मंत्रालयासमोर विस्तार ही लहान गोष्ट आहे. आता हे वंचितांचा विस्तार झाला पाहिजे. विस्तार कधी होणार हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना विचारलं पाहिजे.

 भाजपमध्ये छत्रपतींचा अपमान करण्याची स्पर्धा लागलीय...

संजय राऊत यांचं म्हणणं काही अंशी खरच आहे. मी त्यांच्या बाजूने आहे. काही लोक बोलतात, कुठल्याही महापुरुषांबद्दल बोलणे उचित नाही. त्याचा आम्ही निषेध करतो. सगळ्याच गोष्टीवर कारवाईची गरज नसते. जे बोलतात त्यांना हे समजल पाहिजे. स्वतः ची नाहीतर जनाची तर असली पाहिजे. राज्यपालांनी यावर स्पष्टीकरण देणे महत्वाचं आहे. सगळे प्रश्न कारवाईने सुटत नाही.

टॅग्स :PuneपुणेBachhu Kaduबच्चू कडूUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे