शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

“कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये : श्री श्री रविशंकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 09:44 IST

जर देशात ऋषी म्हणजे ज्ञानी नसते आणि कृषी नसती, तर हा देश केव्हाच संपला असता.

पुणे: ' कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये."आपला देश ऋषी आणि कृषी यांचा देश आहे. जर देशात ऋषी म्हणजे ज्ञानी नसते आणि कृषी नसती, तर हा देश केव्हाच संपला असता." आत्मबल आणि धैर्य यांचे महत्त्व सांगताना त्यांनी शेतकऱ्यांना आत्मविश्वास आणि मानसिक आरोग्य वाढवण्यासाठी विविध उपक्रमांची ओळख करून दिली असे प्रतिपादन" श्री श्री रविशंकर यांनी केले.

किसान समृद्धी महोत्सव 3.0 " मध्ये ते बोलत होते. यावेळी आमदार श्वेता महाले उपस्थित होत्या. श्री श्री रविशंकर म्हणाले, “जेव्हा मनोबल आणि आत्मविश्वास असतो, तेव्हा कोणतेही कार्य अशक्य राहत नाही. त्यांनी ‘प्रोजेक्ट भारत’ विषयी सांगितले, ज्या अंतर्गत प्रत्येक गावातील पाच लोकांची निवड केली जाईल, जे गावाच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी कार्य करतील.

आर्ट ऑफ लिव्हिंग ही गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी स्थापन केलेली जागतिक स्वयंसेवी संस्था आहे, जी तणावमुक्त जीवनशैली, सामाजिक आणि मानवीय सेवा, तसेच शाश्वत विकास यासाठी कार्य करते. संस्थेने शेतकऱ्यांसाठी अनेक उपक्रम सुरू केले असून, त्याद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे.

आमदार श्वेता महाले म्हणाल्या गुरुदेवांनी शेतकऱ्यांचे मनोबल उंचावले. आर्ट ऑफ लिव्हिंग ही एकमेव संस्था आहे जी मानसिक आरोग्य, समाज आणि निसर्ग या तिन्ही स्तरांवर समग्र पद्धतीने कार्य करते. जलयुक्त शिवार आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या विविध उपक्रमांमुळे महाराष्ट्रभर मोठे सकारात्मक बदल घडले आहेत. २०२४ मध्ये या प्रयत्नांमुळे भूजल पातळी वाढली, ज्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले.”

आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेने शेतकऱ्यांसाठी समृद्ध पर्यावरण तयार केले असून २३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. १ लाखाहून अधिक जलसंधारण रचना उभारण्यात आल्या असून २०,००० हून अधिक गावांमध्ये३.४५ कोटी लोकांना त्याचा लाभ झाला. या उपक्रमांनी महाराष्ट्रभर सकारात्मक बदल घडवले आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAgriculture Schemeकृषी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्र