शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

“कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये : श्री श्री रविशंकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 09:44 IST

जर देशात ऋषी म्हणजे ज्ञानी नसते आणि कृषी नसती, तर हा देश केव्हाच संपला असता.

पुणे: ' कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये."आपला देश ऋषी आणि कृषी यांचा देश आहे. जर देशात ऋषी म्हणजे ज्ञानी नसते आणि कृषी नसती, तर हा देश केव्हाच संपला असता." आत्मबल आणि धैर्य यांचे महत्त्व सांगताना त्यांनी शेतकऱ्यांना आत्मविश्वास आणि मानसिक आरोग्य वाढवण्यासाठी विविध उपक्रमांची ओळख करून दिली असे प्रतिपादन" श्री श्री रविशंकर यांनी केले.

किसान समृद्धी महोत्सव 3.0 " मध्ये ते बोलत होते. यावेळी आमदार श्वेता महाले उपस्थित होत्या. श्री श्री रविशंकर म्हणाले, “जेव्हा मनोबल आणि आत्मविश्वास असतो, तेव्हा कोणतेही कार्य अशक्य राहत नाही. त्यांनी ‘प्रोजेक्ट भारत’ विषयी सांगितले, ज्या अंतर्गत प्रत्येक गावातील पाच लोकांची निवड केली जाईल, जे गावाच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी कार्य करतील.

आर्ट ऑफ लिव्हिंग ही गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी स्थापन केलेली जागतिक स्वयंसेवी संस्था आहे, जी तणावमुक्त जीवनशैली, सामाजिक आणि मानवीय सेवा, तसेच शाश्वत विकास यासाठी कार्य करते. संस्थेने शेतकऱ्यांसाठी अनेक उपक्रम सुरू केले असून, त्याद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे.

आमदार श्वेता महाले म्हणाल्या गुरुदेवांनी शेतकऱ्यांचे मनोबल उंचावले. आर्ट ऑफ लिव्हिंग ही एकमेव संस्था आहे जी मानसिक आरोग्य, समाज आणि निसर्ग या तिन्ही स्तरांवर समग्र पद्धतीने कार्य करते. जलयुक्त शिवार आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या विविध उपक्रमांमुळे महाराष्ट्रभर मोठे सकारात्मक बदल घडले आहेत. २०२४ मध्ये या प्रयत्नांमुळे भूजल पातळी वाढली, ज्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले.”

आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेने शेतकऱ्यांसाठी समृद्ध पर्यावरण तयार केले असून २३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. १ लाखाहून अधिक जलसंधारण रचना उभारण्यात आल्या असून २०,००० हून अधिक गावांमध्ये३.४५ कोटी लोकांना त्याचा लाभ झाला. या उपक्रमांनी महाराष्ट्रभर सकारात्मक बदल घडवले आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAgriculture Schemeकृषी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्र