शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

परिवर्तनवादी म्हणवून घेताना अजूनही मानसिक अंतरे मिटलेली नाहीत : बाबा आढाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 12:46 IST

स्वत:ला परिवर्तनवादी म्हणवून घेत असताना अजूनही मानसिक अंतरे मिटत नाहीत, हे वास्तव आहे.

ठळक मुद्देरवींद्र माळवदकर यांना धर्मनिरपेक्ष कार्यकर्ता पुरस्कार

पुणे : घटनेची आखणी करताना स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, बंधुता, समता आदी मुल्यांची रुजवात घालण्यात आली होती. मात्र दहशतमुक्त समाजनिर्मितीकडे वाटचाल होण्याऐवजी घटनेतील मुल्ये संस्कारात आणि शिक्षणात रूजू शकलेली नाहीत. राजकीय पक्ष, त्याचे नेतृत्व आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील संवाद खुंटत चालला आहे. जनता आणि नेतृत्व यांच्यात संवाद घडवून आणण्याची जबाबदारी ही राजकीय पक्षांची देखील आहे.स्वत:ला परिवर्तनवादी म्हणवून घेत असताना अजूनही मानसिक अंतरे मिटत नाहीत, हे वास्तव असल्याची खंत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केली. भारतीय संविधान संवर्धन समितीच्या वतीने राष्ट्रवादी कॉॅँग्रेस पक्षाचे नेते व साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराचे संस्थापक अध्यक्ष क्रांतीरत्न रवींद्र माळवदकर यांना शहरातील सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहिल्याबद्दल डॉ. बाबा आढाव व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते धर्मनिरपेक्ष कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमोद आडकर होते तसेच महाराष्ट्र राज्याचे अखिल भारतीय समता परिषदेचे सल्लागार डॉ. गौतम बेंगाळे, पुणे महानगर पालिकेचे नगरसेवक अनिल टिंगरे, रमेश बागवे, चेतन तुपे, दादासाहेब सोनवणे, लता राजगुरु, सुवर्णा डंबाळे उपस्थित होते.  भारतीय समाजात कधी नव्हे तेवढी असहिष्णुता वाढत आहे. तरुणांना जातीय दंगलीत गुंतवून विनाकारण अस्मिता जागविण्याचे खोडकर काम हेतुपुरस्कर सुरु आहे याकडे डॉ.आढाव यांनी लक्ष वेधले.डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, भारतीय राज्यघटनेने कोणत्याही धमार्चे कुंकु लावलेले नाही. तेव्हा धार्मिक समाज व्यवस्थेत धर्मनिरपेक्ष नागरिकांचा नवा समाज निर्माण करण्याचे आवाहन आपल्या समोर आहे. या पार्श्वभूमीवर धर्मनिरपेक्ष कार्यकतर््यांची जबाबदारी वाढली आहे. सत्ता हे मानवी कल्याणाचे साधन आहे.  यावेळी सत्काराला उत्तर देताना  रविंद्र माळवदकर म्हणाले, नाना पेठेमध्ये मिश्र जातीचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. १६ मे १९७३ रोजी झालेल्या दंगलीने मन विषण्ण झाले. जाती-जातींमध्ये सलोखा वाढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. साखळीपीर तालीन राष्ट्रीय मारुती मंदीर हे सामाजिक सलोख्याचे केंद्र बनले. गाडगे महाराज, भाई वैद्य, एस.एम. जोशी, ग.प्र. प्रधान, बाबा आढाव यासारख्यांच्या वैचारिक मेजवानीचा मी साक्षीदार झालो. त्यामुळे माज्यावर नकळतपणे धर्मनिरपेक्षतेचे संस्कार झाले. अ?ॅड. प्रमोद आडकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. भारतीय संविधान संवर्धन समितीचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.  

टॅग्स :PuneपुणेBaba Adhavबाबा आढावGovernmentसरकार