शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

परिवर्तनवादी म्हणवून घेताना अजूनही मानसिक अंतरे मिटलेली नाहीत : बाबा आढाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 12:46 IST

स्वत:ला परिवर्तनवादी म्हणवून घेत असताना अजूनही मानसिक अंतरे मिटत नाहीत, हे वास्तव आहे.

ठळक मुद्देरवींद्र माळवदकर यांना धर्मनिरपेक्ष कार्यकर्ता पुरस्कार

पुणे : घटनेची आखणी करताना स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, बंधुता, समता आदी मुल्यांची रुजवात घालण्यात आली होती. मात्र दहशतमुक्त समाजनिर्मितीकडे वाटचाल होण्याऐवजी घटनेतील मुल्ये संस्कारात आणि शिक्षणात रूजू शकलेली नाहीत. राजकीय पक्ष, त्याचे नेतृत्व आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील संवाद खुंटत चालला आहे. जनता आणि नेतृत्व यांच्यात संवाद घडवून आणण्याची जबाबदारी ही राजकीय पक्षांची देखील आहे.स्वत:ला परिवर्तनवादी म्हणवून घेत असताना अजूनही मानसिक अंतरे मिटत नाहीत, हे वास्तव असल्याची खंत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केली. भारतीय संविधान संवर्धन समितीच्या वतीने राष्ट्रवादी कॉॅँग्रेस पक्षाचे नेते व साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराचे संस्थापक अध्यक्ष क्रांतीरत्न रवींद्र माळवदकर यांना शहरातील सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहिल्याबद्दल डॉ. बाबा आढाव व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते धर्मनिरपेक्ष कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमोद आडकर होते तसेच महाराष्ट्र राज्याचे अखिल भारतीय समता परिषदेचे सल्लागार डॉ. गौतम बेंगाळे, पुणे महानगर पालिकेचे नगरसेवक अनिल टिंगरे, रमेश बागवे, चेतन तुपे, दादासाहेब सोनवणे, लता राजगुरु, सुवर्णा डंबाळे उपस्थित होते.  भारतीय समाजात कधी नव्हे तेवढी असहिष्णुता वाढत आहे. तरुणांना जातीय दंगलीत गुंतवून विनाकारण अस्मिता जागविण्याचे खोडकर काम हेतुपुरस्कर सुरु आहे याकडे डॉ.आढाव यांनी लक्ष वेधले.डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, भारतीय राज्यघटनेने कोणत्याही धमार्चे कुंकु लावलेले नाही. तेव्हा धार्मिक समाज व्यवस्थेत धर्मनिरपेक्ष नागरिकांचा नवा समाज निर्माण करण्याचे आवाहन आपल्या समोर आहे. या पार्श्वभूमीवर धर्मनिरपेक्ष कार्यकतर््यांची जबाबदारी वाढली आहे. सत्ता हे मानवी कल्याणाचे साधन आहे.  यावेळी सत्काराला उत्तर देताना  रविंद्र माळवदकर म्हणाले, नाना पेठेमध्ये मिश्र जातीचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. १६ मे १९७३ रोजी झालेल्या दंगलीने मन विषण्ण झाले. जाती-जातींमध्ये सलोखा वाढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. साखळीपीर तालीन राष्ट्रीय मारुती मंदीर हे सामाजिक सलोख्याचे केंद्र बनले. गाडगे महाराज, भाई वैद्य, एस.एम. जोशी, ग.प्र. प्रधान, बाबा आढाव यासारख्यांच्या वैचारिक मेजवानीचा मी साक्षीदार झालो. त्यामुळे माज्यावर नकळतपणे धर्मनिरपेक्षतेचे संस्कार झाले. अ?ॅड. प्रमोद आडकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. भारतीय संविधान संवर्धन समितीचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.  

टॅग्स :PuneपुणेBaba Adhavबाबा आढावGovernmentसरकार