शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

एक महिन्यानंतरही नशिबी हताश हाेऊन बसणं ; दांडेकर पूल वसाहतीतील लाेकांची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 18:27 IST

मुठा कालवा दुर्घटनेला एक महिना पूर्ण झाला तरी येथील अनेक नागरिकांना मदत मिळाली नसल्याने हताश हाेऊन बसण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय त्यांच्याजवळ उरलेला नाही.

पुणे : मुठा कालवा फुटलेल्या दुर्घटनेला एक महिना उलटून गेला तरी येथील अनेक नागरिकांच्या नशिबी केवळ हताश हाेऊन बसण्याशिवाय कुठलाही पर्याय उरलेला नाही. सराकराने, पालिकेने अनेक अाश्वासने दिली परंतु महिन्याभरानंतही ही अाश्वासने हवेतच विरुन गेल्याचे चित्र अाहे. येथील काही लाेकांना इतरत्र घरे मिळाली परंतु बहुतांश कुटुंबे घराच्या प्रतिक्षेत अाहेत. त्यामुळे घरच नाही तर दिवाळी सण कसा साजरा करायचा असा प्रश्न येथील नागरिकांच्या समाेर उभा ठाकला अाहे. 

    एक महिन्यापूर्वी 27 सप्टेेंबर राेजी सकाळी 10.30 च्या सुमारास पुण्यातील मुठा कालवा फुटला. लाखाे लिटर पाणी वेगाने दांडेकर पूल वसाहतीत शिरले. काही कळायच्या अात हाेत्याचे नव्हते झाले. येथील शेकडाे कुटुंबे बेघर झाली. त्यानंतर महापालिकेने तसेच मुख्यमंत्र्यांनी लाखाे रुपयांच्या मदतीची घाेषणा केली. परंतु ही मदत लालफितीच्या कारभारातच विरुण गेली अाहे. अनेकदा पंचनामे करुनही येथील अनेकांना अद्याप एक रुपयाही मिळाला नाही. यातील अनेकांना राहण्यासाठी घर नसल्याने पैसे नकाे घर बांधून द्या अशी मागणी ते करत अाहेत. ज्यांची घरे या प्रलयात नष्ट झाली त्यातील काही लाेक हे नातेवाईकांकडे राहतात तर काहीजण येथील समाज मंदीर अाणि बुद्ध विहारात वास्तव्यास अाहेत. राेज सकाळी उठून तुटलेल्या घरांकडे पाहत अाज न उद्या सरकार घर बांधून देईल या अाशेने अनेकजण बसलेले असतात. घरच नसल्याने काहीजण महिन्याभरापासून कामावर जाऊ शकलेले नाहीत. काही समाजसेवी संस्था कपडे अाणि जेवण या लाेकांना देतात. पण ते तरी किती दिवस देणार अाणि अाम्ही किती दिवस तुटलेल्या घराकडे बघत बसायचं असा उद्विग्न सवाल येथील नागरिक उपस्थित करतात. 

    येथे राहणाऱ्या ललिता चतूर म्हणाल्या, महिना झाला तरी अाम्हाला कुठलिही मदत मिळाली नाही. अनेक पंचनामे करण्यात अाले परंतु मदत काही मिळाली नाही. अाम्ही राेज हताश हाेऊन अामच्या तुटलेल्या घराकडे पाहत बसताे. सरकारने अाम्हाला घर बांधून द्यायला हवे. अर्चना डिमडिमे म्हणाल्या, अनेक अाश्वासन मिळाली पण घर काही मिळालं नाही. दिवाळी सण अाला अाहे. अाम्हाला घरच राहिलं नाही, तर अाम्ही सण कसा साजरा करणार. सरकारने अामच्याकडे लक्ष द्यायला हवे. अशीच काहीशी व्यथा येथील अनेकांची अाहे. सराकराने लवकरात लवकर घरे बांधून द्यावीत अशी मागणी हे करत अाहेत.

टॅग्स :Puneपुणेmula muthaमुळा मुठाWaterपाणीAccidentअपघात