शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

निरा डावा कालवा फुटल्याने शेती,घरांसह उपहारगृहाचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 09:59 IST

पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्यामुळेच निरा डावा कालवा फुटल्याची शेतकऱ्यांची तक्रार

बारामती - बारामती तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांची दाणादाण उडवली. एकीकडे शेतकऱ्यांवर आसमानी संकट घोंगावत असतानाच, निरा डावा कालवा फुटल्याने शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. केवळ पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्यामुळेच निरा डावा कालवा फुटल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. पाटबंधारे खाते झोपा काढतंय का? असा सवाल येथील संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे.रविवारी दुपारी २ च्या सुमारास येथील निरा डावा कालवा फुटला. यावेळी कालवा तुडुंब भरून वाहत होता. अचानक फुटल्याने कालव्याच्या पाण्याचा प्रचंड प्रवाह शेतकऱ्यांच्या शेतात, घरात घुसला. या पाण्यात शेती वाहून गेली. तसेच घरातील जीवनावश्यक वस्तू, धान्यासह संसारोपयोगी साहित्य पाण्यात बुडाले.

उपहारगृह देखील पाण्याखाली गेले. त्यामुळे येथील शेतकरी, नागरिक, व्यावसायिकांनी भर पावसात रात्र अक्षरशः जागून काढली. केवळ पाटबंधारे खात्याच्या उदासीन अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे येथील शेतकरी आणि व्यावसायिक उद्ध्वस्त झाले आहेत. या पाण्यात अनेक वाहने देखील अडकली. कालव्याचा मलबा आणि चिखल नागरिकांच्या घरात गेला आहे.

गेल्या काही दिवसांपासून हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असताना, कालव्यात सोडलेल्या पाण्याचा प्रवाह कमी करणे अपेक्षित होते. कालव्याचा प्रवाह प्रचंड असल्यामुळे आणि ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळे निरा डावा कालवा फुटला. भराव खचलेल्या ठिकाणीच कालवा फुटला. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कालव्याची अनेक दिवसांपासून पाहणीच केली नसल्याचे उघड झाले आहे."शेतकऱ्यांच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार?" असा सवाल येथील महिलांनी उपस्थित केला आहे. नंदा सुरेश काटे, महादेव काटे, राजेंद्र काटे, अरुण काटे, दिलीप काटे, नारायण काटे, सोमनाथ विजय काटे व इतर यांच्याही घरात पाणी गेल्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे कन्हेरीचे माजी सरपंच सतीश काटे यांनी सांगितले. घरातील टीव्ही, फ्रिज, धान्य, किराणा, बाजाराचे साहित्य, भांडी पाण्यात वाहून गेले. या लोकांचा संपूर्ण प्रपंच उध्वस्त झाला आहे.
तर नलिनी काटे, सचिन काटे, नितीन काटे, सतीश काटे यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी माजी सरपंच सतीश काटे यांनी केली आहे. काल पावसाचा वेग प्रचंड होता. सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. कालवा पूर्ण क्षमतेने वाहत होता. या परिसरात कॅनल माळरानालगत आहे. गेले चार दिवस पाऊस पडत असल्याने माळावरील पाणी कालव्यात आले. त्यामुळे कालवा ‘ओव्हरफ्लो’ झाला. त्यातच भराव खचल्यामुळे कालवा फुटला. त्यामुळे मोठे नुकसान झाले, असे छत्रपती संस्थेचे माजी संचालक संतोष ढवाण पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBaramatiबारामतीAjit Pawarअजित पवार