शहरं
Join us  
Trending Stories
1
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
2
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
3
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
4
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
5
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
6
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
8
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
9
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
10
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
11
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
12
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
13
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं
14
Crime : माता न तूं वैरिणी! काळ्या जादुचं भूत चढलं, तांत्रिकासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलीला विकलं 
15
पाळीव श्वानाने शेजाऱ्याला चावले, कोर्टाने मालकाची केली ४ महिने जेलमध्ये रवानगी, काय आहे प्रकरण?
16
IPL 2025 Eliminator : रोहितला मिळाला नवा ओपनिंग पार्टनर; हार्दिक पांड्यानं या दोघांवरही दाखवला भरवसा
17
भारताचा AMCA प्रोजेक्ट...अमेरिकेचा आश्चर्यकारक प्रस्ताव; रशियानेही दिली मोठी ऑफर
18
उत्पन्न नाही, पीकविमा बँक देईना; पेरणीसाठी पैसे नसल्याने, जीवन संपविण्याची शेतकऱ्याची तयारी
19
Video : तो फ्लॉवर समजला, पण वाघ फायर निघाला! तरुणाला वाघासोबत सेल्फी काढणं पडलं महागात, बघा नेमकं काय झालं...  
20
मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता

निरा डावा कालवा फुटल्याने शेती,घरांसह उपहारगृहाचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 09:59 IST

पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्यामुळेच निरा डावा कालवा फुटल्याची शेतकऱ्यांची तक्रार

बारामती - बारामती तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांची दाणादाण उडवली. एकीकडे शेतकऱ्यांवर आसमानी संकट घोंगावत असतानाच, निरा डावा कालवा फुटल्याने शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. केवळ पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्यामुळेच निरा डावा कालवा फुटल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. पाटबंधारे खाते झोपा काढतंय का? असा सवाल येथील संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे.रविवारी दुपारी २ च्या सुमारास येथील निरा डावा कालवा फुटला. यावेळी कालवा तुडुंब भरून वाहत होता. अचानक फुटल्याने कालव्याच्या पाण्याचा प्रचंड प्रवाह शेतकऱ्यांच्या शेतात, घरात घुसला. या पाण्यात शेती वाहून गेली. तसेच घरातील जीवनावश्यक वस्तू, धान्यासह संसारोपयोगी साहित्य पाण्यात बुडाले.

उपहारगृह देखील पाण्याखाली गेले. त्यामुळे येथील शेतकरी, नागरिक, व्यावसायिकांनी भर पावसात रात्र अक्षरशः जागून काढली. केवळ पाटबंधारे खात्याच्या उदासीन अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे येथील शेतकरी आणि व्यावसायिक उद्ध्वस्त झाले आहेत. या पाण्यात अनेक वाहने देखील अडकली. कालव्याचा मलबा आणि चिखल नागरिकांच्या घरात गेला आहे.

गेल्या काही दिवसांपासून हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असताना, कालव्यात सोडलेल्या पाण्याचा प्रवाह कमी करणे अपेक्षित होते. कालव्याचा प्रवाह प्रचंड असल्यामुळे आणि ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळे निरा डावा कालवा फुटला. भराव खचलेल्या ठिकाणीच कालवा फुटला. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कालव्याची अनेक दिवसांपासून पाहणीच केली नसल्याचे उघड झाले आहे."शेतकऱ्यांच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार?" असा सवाल येथील महिलांनी उपस्थित केला आहे. नंदा सुरेश काटे, महादेव काटे, राजेंद्र काटे, अरुण काटे, दिलीप काटे, नारायण काटे, सोमनाथ विजय काटे व इतर यांच्याही घरात पाणी गेल्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे कन्हेरीचे माजी सरपंच सतीश काटे यांनी सांगितले. घरातील टीव्ही, फ्रिज, धान्य, किराणा, बाजाराचे साहित्य, भांडी पाण्यात वाहून गेले. या लोकांचा संपूर्ण प्रपंच उध्वस्त झाला आहे.
तर नलिनी काटे, सचिन काटे, नितीन काटे, सतीश काटे यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी माजी सरपंच सतीश काटे यांनी केली आहे. काल पावसाचा वेग प्रचंड होता. सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. कालवा पूर्ण क्षमतेने वाहत होता. या परिसरात कॅनल माळरानालगत आहे. गेले चार दिवस पाऊस पडत असल्याने माळावरील पाणी कालव्यात आले. त्यामुळे कालवा ‘ओव्हरफ्लो’ झाला. त्यातच भराव खचल्यामुळे कालवा फुटला. त्यामुळे मोठे नुकसान झाले, असे छत्रपती संस्थेचे माजी संचालक संतोष ढवाण पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBaramatiबारामतीAjit Pawarअजित पवार