शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पुढील साखर हंगामाचा मंत्री समिती करणार अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 11:46 IST

साखर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईत आढावा बैठक घेण्यात आली. त्यात साखरेचे नियोजन करण्यासाठी मंत्री गटाची स्थापना करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसंकट अति उत्पादनाचे : मंत्री गट समितीच्या निर्णयावर ठरणार साखर उद्योगाची दिशा यंदाच्या हंगामात १०१ सहकारी आणि ९७ खासगी साखर कारखाने सुरु ऊस तोडणी यंत्र आणि ठिबक सिंचनाच्या अनुदानात वाढ करण्याच्या निर्णय

पुणे : यंदाच्या हंगामात गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पुढील हंगामात तर तब्बल सव्वाशे लाख टन इतक्या प्रचंड प्रमाणात साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज असल्याने साखर उद्योग क्षेत्र धास्तावले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुढील हंगामाचा विचार करण्याचे महत्त्वाचे काम मंत्री गटाच्या समितीला देण्यात आले आहे. साखर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईत आढावा बैठक घेण्यात आली. त्यात साखरेचे नियोजन करण्यासाठी मंत्री गटाची स्थापना करण्यात आली आहे. या मंत्रिगटासमोर साखर क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांसह पुढील हंगामाला कसे सामोरे जायचे यासंदर्भात महत्त्वाचे विषय देण्यात आले आहेत. या वर्षी ९ लाख २ हजार हेक्टरवर उसाची लागवड झाली होती. यंदाच्या हंगामात १०१ सहकारी आणि ९७ खासगी साखर कारखाने सुरु होते. त्यातील ४१ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. राज्यात, २१ मार्च अखेरीस ८७२.११ लाख टन ऊस गाळपातून सुमारे ९७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. अजूनही ७५ टक्के कारखाने सुरु आहेत. त्यामुळे कमीत कमी साखरेचे उत्पादन १०६ लाख टनांवर जाईल असा अंदाज आहे. पुढील वर्षी २०१८-१९च्या हंगामासाठी १० लाख ८७ हजार हेक्टरवरील ऊस गाळपासाठी उपलब्ध असेल. त्यामुळे त्या हंगामात १२५ लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. सलग दोन वर्षे साखरेचे प्रचंड  उत्पादन झाल्यास भाव गडगडून साखर उद्योग अडचणीत येण्याची दाट शक्यता दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्रीगटाला पुढील हंगामाची तयारी करण्याचे उद्दीष्ट दिले आहे. त्यात पुढील हंगाम आॅक्टोबर महिन्यातच सुरु करता येईल का ? तसेच बंद कारखाने सुरु करण्याबाबत निर्णय घेणे, महाराष्ट्राबाहेर साखर विक्रीसाठी अनुदान देणे अशा प्रश्नांवर चर्चा करुन शिफारसी पाठविण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, राज्य सरकारने घोषित केल्यानुसार, राज्यात उत्पादित झालेली १० लाख टन साखर ३२०० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे मार्केंटिग फेडरेशन खरेदी करेल हा महत्त्वाचा विषय देखील समितीच्या कार्यक्रमपत्रिकेत देण्यात आला आहे. ऊस तोडणी यंत्र आणि ठिबक सिंचनाच्या अनुदानात वाढ करण्याच्या निर्णयाचा देखील यात समावेश असल्याची माहिती साखर संघातील सूत्रांनी दिली.  ....................साखरेचे उत्पादन झाले होते. त्यावेळचे ते दहा वर्षांतील सर्वाधिक उत्पादन होते. गेल्या हंगामात (२०१६-१७) दुष्काळामुळे अवघ्या ३७३.१३ लाख टन ऊसाचे गाळप झाले होते. त्यातून नीचांकी ४२ लाख टन साखर उत्पादित झाली होती. यंदा १०६ लाख टन साखरेच्या उत्पादनाचा अंदाज आहे. हा आकडा गाठल्यास ते सर्वोच्च साखर उत्पादन होईल..............

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnvisदेवेंद्र फडणवीसState Governmentराज्य सरकारFarmerशेतकरी