शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

लोकमतच्या बातमीची दखल, तळेगाव-चाकण रस्त्याच्या दुरुस्तीचे अखेर झाले उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 10:54 PM

औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या वाहतुकीमुळे तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा रस्ता अतिशय वर्दळीचा आणि धोकादायक बनला आहे.

चाकण - औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या वाहतुकीमुळे तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा रस्ता अतिशय वर्दळीचा आणि धोकादायक बनला आहे. आमदार सुरेश गोरे यांनी वेळोवेळी सदर रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून रस्त्याचा विषय अनेक प्रकारे अधिवेशनात मांडून त्याचा सतत पाठपुरावा घेतला. त्याचप्रमाणे 'लोकमत'ने वेळोवेळी या रस्त्याबाबत सचित्र वार्तांकन करून आवाज उठवला होता. अखेर या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचे उदघाटन करण्यात आले. दरम्यानच्या काळात सदर रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्याने केंद्राकडे याबाबतचा पाठपुरावा शासन करणार असल्याची माहिती राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी आमदार सुरेश गोरे यांना हिवाळी अधिवेशन २०१६ मधे उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेमधे दिली होती. त्या अनुषंगाने आमदार सुरेश गोरे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडून रस्ता दुरुस्त करण्याची सतत मागणी केली. त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने काम मंजूर झाले असून तळेगाव ते चाकणमधील २४ किमीचे मजबुतीकरण व डांबरीकरण असे १०.८९ कोटी रुपयाचे काम नुकतेच मंजूर झाले असून ऍशकॉन इंफ्रा प्रा.लि. यांनी हे काम घेतले आहे. सहा महिन्याच्या कालावधीत पूर्ण करण्याचे प्रस्तावित असून आमदार गोरे यांनी एका महिन्यातच काम पूर्ण करण्याच्या सूचना संबधित अधिकारी तसेच ठेकेदार यांना दिल्या आहेत. सन २०१० पासून सदर रस्ता दुरुस्ती किंवा नव्याने करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित होता. २५ फेब्रुवारी २०१० रोजी मंत्रिमंडळ बैठकीत या रस्त्याचा चौपदरीकरणाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. ०६ फेब्रुवारी २०१३ रोजी तत्कालीन उप-मुख्यमंत्री यांच्याकडे यांच्याकडे सहापदरीकरणाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. ०२ ऑगस्ट २०१३ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४८० कोटी रुपयांचा पुनर्नियोजनाचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. परंतु प्रकल्पाची वाढलेली किंमत आणि नवीन पथकर धोरणामुळे खासगीकरणामधून करण्यात येणारा रस्ता मंजूर झाला नाही.त्यानंतर आमदार गोरे यांनी रस्ता मंजूर करण्यासाठी जवळपास २ वर्षे सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. परंतु २३ जून २०१६ रोजी सदर रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणून तत्वत: मान्यता मिळाली आणि रस्ता केंद्र सरकारकडे वर्ग झाल्याने पुन्हा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून दुरुस्तीसाठी या रस्त्याला १०.८९ कोटी रुपये मंजूर करून आणण्यात गोरे यांना यश आले.  महामार्गावरील खड्डे बुजविल्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होवून वाहतूक कोंडी सुरळीत होण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. तसेच केंद्र शासनाकडून राष्ट्रीय महामार्गाचे ( ५४८ डी ) चे प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरु असून या रस्त्यासाठी १८०० कोटी रुपये खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या मार्फत मंजूर करण्यात आले आहेत. लवकरच प्रकल्प अहवाल मंजूर करून सहापदरी रस्त्याचे काम सुरु होणार असल्याचे आमदार सुरेश गोरे यांनी यावेळी सांगतले.