शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात नवी संच मान्यता सरकारी शाळांच्या मुळावर ? राज्यभरात हजारो शिक्षक अतिरिक्त ठरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 15:20 IST

राज्यभरातील शिक्षकांमध्ये या संचमान्यतेच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त

बारामती - राज्य शासनाच्या संचमान्यतेच्या नव्या शासन निर्णयामुळे राज्यभरात हजारो शिक्षक अतिरिक्त झाले आहेत.ही संच मान्यता तात्काळ रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केल्याची माहिती राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली. राज्य शासनाने संचमान्यतेचे सुधारित धोरण १५ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध केले. या वर्षीच्या ऑनलाईन संच मान्यता शाळा लॉगिन ला उपलब्ध झालेल्या आहेत. या संचमान्यतेमुळे लहान शाळांमध्ये तिसऱ्या शिक्षकाच्या मंजुरीसाठी पूर्वीची ६१ पटाची आहे. ७६ पर्यंत वाढवलेली आहे.त्यामुळे लहान शाळांना तिसरा शिक्षक नव्याने मंजूर होण्याचा मार्ग जवळपास बंद झालेला आहे. २१० पेक्षा जास्त पटसंख्येच्या शाळांवर पुढील प्रत्येक शिक्षकासाठी ३० ऐवजी ४० विध्यार्थी संख्येची अट ठेवलेली आहे.राज्यभरातील शिक्षकांमध्ये या संचमान्यतेच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त होत असून संच मान्यतेच्या शासन निर्णयाला शिक्षक संघाचा कडाडून विरोध आहे.पुढील निर्णयाबाबत संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक सांगली बँकेच्या सभागृहात आयोजित केली होती. शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. नव्या संच मान्यतेस विरोधाचा ठराव यावेळी झाला, राज्यस्तरावर अर्ज विनंती याद्वारे ही संच मान्यता रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.समाजशास्त्र पदवीधर यामध्ये हद्दपार होणार आहेत.संचमान्यतेतील भाषावार रचनेमुळे बहुतांश समाजशास्त्र पदवीधर शिक्षकांना जिल्हाभरात रिक्त जागा नसल्याचे चित्र आहे, यामध्ये अनेक सेवाजेष्ठ शिक्षकांचा समावेश आहे. प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे म्हणाले, संचमान्यतेचा नवा शासन निर्णय ग्रामीण भागातील सरकारी शाळांचे कंबरडे मोडणारा आहे, शिक्षणासारख्या पायाभूत व्यवस्थेमध्ये कर्मचारी कपातीचे दूरगामी परिणाम होतील, शासनाने संचमान्यता जुन्या पद्धतीनेच करावी अन्यथा आंदोलनाशियाय पर्याय नसल्याचा इशारा मारणे यांनी दिला आहे.आधार सक्ती नको...या वर्षीची संचमान्यता प्रत्यक्ष विद्यार्थी संख्येऐवजी आधार व्हॅलिड संख्येवर केले असल्याने अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या पुरेशी असूनही आधार कार्ड अपडेट नसल्याने शिक्षक अतिरिक्त ठरवले आहेत, प्रत्यक्ष विध्यार्थी संख्येची पडताळणी करून शिक्षक संख्या ठरविण्याची संघटनेची मागणी आहे.६ ते ८ विना शिक्षकांचे वर्ग भरणार ?६ वी ते ८ वी या वर्गांसाठी २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या शाळांना एकही शिक्षक मंजूर केलेला नाही. यामुळे या वर्गाना कोण शिकवणार असा प्रश्न तयार झाला आहे.पर्यायाने मुलांना अन्य गावात शिक्षणासाठी जावे लागण्याची भीती आहे.   

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षक