शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मांसाहार खालेल्लं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
2
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
3
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
4
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
5
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
6
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
7
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
8
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
9
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
10
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
11
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
12
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
13
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
14
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
15
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
16
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
17
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
19
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
20
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता

नीरा-देवघर प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्न पुन्हा पेटणार : आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 13:07 IST

नीरा-देवघर धरणात २१ गावे बाधित झाली आहेत.

ठळक मुद्देआंदोलनाचा इशारा : वीस वर्षांपासून मागण्या प्रलंबित; दोनशे खातेदारांचे प्रस्तावही रखडलेलेनीरा-देवघर प्रकल्पग्रस्तांचे २०० खातेदारांचे प्रस्ताव अद्याप नाही मंजूर

भोर : नीरा-देवघर प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्या गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित असून, त्या पूर्ण  व्हाव्यात, यासाठी ५ ऑगस्टपासून आंदोलन करण्याचा इशारा नीरा-देवघर धरणग्रस्त पुर्नवसन विकास शेतकरी संघटनेने दिला आहे. याबाबतचे निवेदनही संघटनेचे अध्यक्ष बाळासो मालुसरे व सचिव नथू दिघे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.निवेदनात म्हटले आहे की,   देवघर गावाला नियोजन आराखड्याप्रमाणे वाटपासाठी आज शिल्लक क्षेत्र नसून येथील क्षेत्र साळव गावातील खातेदारांना आराखडाबाह्य जमीन वाटप केले आहे, त्याची चौकशी करावी. उपभूमी अभिलेख, खंडाळा हे नकाशाची नक्कल देत नसून ते टाळाटाळ करतात, फलटण तहसीलदार यांनी खंडाळा तालुक्यातील गावनिहाय लेखी माहिती १५ दिवसांत द्यावी. प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनी मिळाल्या नाहीत. त्यांनी त्वरित कार्यकारी अभियंता नीरा-देवघर भाटघर यांच्याकडून उदरनिर्वाह भत्ता द्यावा. नीरा-देवघर धरणात २१ गावे बाधित झाली आहेत. त्यामधील  खातेदारांचे पुनर्वसन करावे. फलटण तालुक्यातील कोळकी येथील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी असणारी जमीन क्षेत्राची नीरा-देवघर प्रकल्पग्रस्तांनाच वाटप करावी. माझेरी येथील कार्यकारी अभियंता नीरा-देवघर यांचे नावे असणारी जमीन मिळकत शिवाजी कवडे व वैभव कवडे हे अतिक्रमण करून वहिवाटत आहेत. या जमिनीत रस्ते, तलाव व बंगले आहेत याची चौकशी करावी. प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांचे ५ ऑगस्टला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. निवेदनाच्या प्रती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार संग्राम थोपटे, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांना देण्यात आल्या आहेत. या मागण्यांसाठी गल्या वीस वर्षांमध्ये अनेकवेळा प्रकल्पग्रस्तांनी निवेदन दिले शिवाय आंदोलनही केले. मात्र, शासनाने पोकळ आश्वासनांशिवाय काहीच दिले नाही. ...या आहेत प्रमुख मागण्यानीरा-देवघर प्रकल्पग्रस्तांचे २०० खातेदारांचे प्रस्ताव अद्याप मंजूर नाही. उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन यांनी खातेदारांचा जाब-जबाब आठ दिवसांत उपजिल्हाधिकारी पुनर्वसन सातारा यांच्याकडे सोपवावा, प्रकल्पग्रस्तांना लागणारे सर्व भूसंपादन व ६५ टक्के दाखले शेतकऱ्यांकडे नसतील, तर भूसंपादन क्र. १७ व ३ यांनी द्यावे, जमिनीचे बदली प्रस्ताव केले जात नाहीत ते करावे..........

टॅग्स :PuneपुणेDamधरणFarmerशेतकरीGovernmentसरकार