शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

नीरा-देवघर प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्न पुन्हा पेटणार : आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 13:07 IST

नीरा-देवघर धरणात २१ गावे बाधित झाली आहेत.

ठळक मुद्देआंदोलनाचा इशारा : वीस वर्षांपासून मागण्या प्रलंबित; दोनशे खातेदारांचे प्रस्तावही रखडलेलेनीरा-देवघर प्रकल्पग्रस्तांचे २०० खातेदारांचे प्रस्ताव अद्याप नाही मंजूर

भोर : नीरा-देवघर प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्या गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित असून, त्या पूर्ण  व्हाव्यात, यासाठी ५ ऑगस्टपासून आंदोलन करण्याचा इशारा नीरा-देवघर धरणग्रस्त पुर्नवसन विकास शेतकरी संघटनेने दिला आहे. याबाबतचे निवेदनही संघटनेचे अध्यक्ष बाळासो मालुसरे व सचिव नथू दिघे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.निवेदनात म्हटले आहे की,   देवघर गावाला नियोजन आराखड्याप्रमाणे वाटपासाठी आज शिल्लक क्षेत्र नसून येथील क्षेत्र साळव गावातील खातेदारांना आराखडाबाह्य जमीन वाटप केले आहे, त्याची चौकशी करावी. उपभूमी अभिलेख, खंडाळा हे नकाशाची नक्कल देत नसून ते टाळाटाळ करतात, फलटण तहसीलदार यांनी खंडाळा तालुक्यातील गावनिहाय लेखी माहिती १५ दिवसांत द्यावी. प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनी मिळाल्या नाहीत. त्यांनी त्वरित कार्यकारी अभियंता नीरा-देवघर भाटघर यांच्याकडून उदरनिर्वाह भत्ता द्यावा. नीरा-देवघर धरणात २१ गावे बाधित झाली आहेत. त्यामधील  खातेदारांचे पुनर्वसन करावे. फलटण तालुक्यातील कोळकी येथील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी असणारी जमीन क्षेत्राची नीरा-देवघर प्रकल्पग्रस्तांनाच वाटप करावी. माझेरी येथील कार्यकारी अभियंता नीरा-देवघर यांचे नावे असणारी जमीन मिळकत शिवाजी कवडे व वैभव कवडे हे अतिक्रमण करून वहिवाटत आहेत. या जमिनीत रस्ते, तलाव व बंगले आहेत याची चौकशी करावी. प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांचे ५ ऑगस्टला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. निवेदनाच्या प्रती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार संग्राम थोपटे, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांना देण्यात आल्या आहेत. या मागण्यांसाठी गल्या वीस वर्षांमध्ये अनेकवेळा प्रकल्पग्रस्तांनी निवेदन दिले शिवाय आंदोलनही केले. मात्र, शासनाने पोकळ आश्वासनांशिवाय काहीच दिले नाही. ...या आहेत प्रमुख मागण्यानीरा-देवघर प्रकल्पग्रस्तांचे २०० खातेदारांचे प्रस्ताव अद्याप मंजूर नाही. उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन यांनी खातेदारांचा जाब-जबाब आठ दिवसांत उपजिल्हाधिकारी पुनर्वसन सातारा यांच्याकडे सोपवावा, प्रकल्पग्रस्तांना लागणारे सर्व भूसंपादन व ६५ टक्के दाखले शेतकऱ्यांकडे नसतील, तर भूसंपादन क्र. १७ व ३ यांनी द्यावे, जमिनीचे बदली प्रस्ताव केले जात नाहीत ते करावे..........

टॅग्स :PuneपुणेDamधरणFarmerशेतकरीGovernmentसरकार