शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 2:07 AM

अपघाताला एक वर्ष पूर्ण : बोगद्यात उतरण्यासाठी लिफ्टची सोय; सुरक्षेची घेतली जातेय काळजी

अकोले : नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या अपघाताला एक वर्ष पूर्ण होत आहे. प्रकल्पाचे काम प्रगतिथावर आहे. अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या कामाच्या व्यवस्थेत बदल करून बोगदा खोदण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कामगारांना बोगद्यात उतरण्यासाठी लिप्टची सोय करण्यात आली आहे.

मागील वर्षी दि. २० नोव्हेंबरला अकोले येथील पाच नंबर शॉप्टच्या ठिकाणी काम करून वर येत असताना क्रेनचा वायररोप तुटून दोनशे फूट खाली आदळून आठ कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर तीन महिने काम बंद ठेवून जीविताला धोका असणाºया यंत्रणेत बदल करून काम जोमाने सुरू करण्यात आले आहे. बोगद्यात दोनशे फूट खोल खाली उतरण्यासाठी कामगारांना लिप्टची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच कामाच्या ठिकाणी असणारी जुनी यंत्रसामग्री बदलून नवीन यंत्ररचना करण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाºयांनी लोकमतशी बोलताना दिली. नीरा नदी ते उजनी धरण असा हा नदीजोड प्रकल्प असून तावशी, भवानीनगर, काझड, अकोले, भादलवाडी, डाळजमार्गे उजनी धरण असा बोगद्यामार्गे नदीजोड प्रकल्प असून, मराठवाड्याला पाणी मिळावे यासाठी कृष्णा मराठवाडा पाटबंधारे विभाग उस्मानाबाद यांच्या देखरेखीखाली हा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच शेतकºयांचा विरोध असून, आता कृष्णा नदीचे पाणी अगोदर नीरा नदीत आणा. त्यानंतर नीरा नदीचे ८ टीएमसी पाणी उजनी धरणात सोडा यासाठी आता शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, काझड, अकोले, भादलवाडी या गावांच्या हद्दीमध्ये जमिनीपासून १५० फूट खोल खाली रात्रंदिवस युद्धपातळीवर बोगदा खोदण्याचे काम सुरू आहे.२कुंभी-कासारी-कडवी-वारणा-कृष्णा-नीरा ते भीमा असा हा सुमारे दोनशे किलोमीटरचा नदीजोड प्रकल्पाचा प्रस्ताव तयार आहे. कोल्हापूर-सांगली-सातारा-पुणे-उस्मानाबाद ते सोलापूर या जिल्ह्यांतून हा पाण्याचा प्रवास होऊन त्याचा साठा उजनी धरणात करण्याचा हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. मात्र ठराविक दिवसांनी यासाठी विरोध सुरू असून पूर्णत्वाला नेण्यासाठी अडचणींचा काळ ठरणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीwater transportजलवाहतूक