शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

मूल्ये सुरक्षित ठेवण्याकरिता सत्यशोधक विचारांची गरज - डॉ. बाबा आढाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 01:53 IST

वेगवेगळ्या घटनांनी समाजमन ढवळून निघत असताना त्याचा प्रतिकूल परिणाम एकूण समाजव्यवस्थेवर होताना दिसत आहे. सगळ्यांना जातीच्या निकषावर आरक्षण हवे आहे.

पुणे  - वेगवेगळ्या घटनांनी समाजमन ढवळून निघत असताना त्याचा प्रतिकूल परिणाम एकूण समाजव्यवस्थेवर होताना दिसत आहे. सगळ्यांना जातीच्या निकषावर आरक्षण हवे आहे. जातींजा उजागर होत आहे. अशा वेळी संविधानातील घटनेमध्येदेखील बदलाचे वारे वाहत असताना संविधानातील ती मूल्ये सुरक्षित ठेवण्याकरिता सत्यशोधक विचारांची गरज आहे, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते व सामाजिक कृतज्ञता निधीचे कार्याध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले.सामाजिक कृतज्ञता निधीच्या वतीने देण्यात पुरस्कारांचे वितरण महात्मा फुले वाडा, समता भूमी येथे डॉ. आढाव यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सत्यशोधक विचारांसाठी काम करणाऱ्या माजी आमदार कमल विचारे यांना कृतज्ञता पुरस्कार, भटके विमुक्त महिला अधिकार आंदोलनाच्या वैशाली भांडवलकर यांना एस. एम. जोशी कार्यकर्ता पुरस्कार आणि रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानचे रमेश चव्हाण यांना डॉ. राम आपटे प्रबोधन पुरस्कार प्रदान करण्यात आला. विचारे यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते शमसुद्दीन तांबोळी यांनी पुरस्कार स्वीकारला. निधीचे कार्यवाह सुभाष वारे या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. आढाव म्हणाले, ‘‘संविधानातील मूल्यांच्या सुरक्षितेकरिता सत्यशोधक विचारांना पर्याय नाही. केवळ आश्वासने आणि निवडणुकांमधून काही साध्य होणार नाही. हे नागरिकांनी लक्षात घेण्याची गरज आहे. सामाजिक प्रबोधनाकरिता चळवळ टिकविण्याबरोबरच जे कार्यकर्ते स्वत:ला सत्यशोधक म्हणवून घेतात, त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. विचारांच्या विरोधातील लढाईला उत्तर देण्याचे धाडस अंगी यावे, यासाठी त्यांनी प्रयत्नशील राहायला हवे.’’भटके विमुक्त समाजांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधताना आढाव म्हणाले, की काही वर्षांपासून या समाजात एक नवा मध्यमवर्ग तयार झाला आहे. बेरोजगारीचे प्रश्न प्रलंबित आहेत आणि रोजगार मिळावा याकरिता सगळ्यांनाच जातीवर आधारित आरक्षण हवे आहे. हल्ली समाजात विषमता, धर्मांधपणा वाढत आहे. यासाठी प्रबोधनाची परंपरा अखंडपणे सुरू ठेवण्याची गरज असून आता समाजात सत्यशोधक धर्माचा विचार रुजत आहे, ही समाधानकारक गोष्ट आहे. याचा परिणाम म्हणजे घटनेचे होणारे मूल्यात्मक संरक्षण होय, असे मत रमेश चव्हाण यांनी व्यक्त केले.भटक्या समाजाच्या मागण्यांची दखल घेते कोण?अनेक वर्षांपासून भटक्या समाजाचे नेते समाजातील व्यक्तींना जातीचे दाखले मिळावेत म्हणून धडपडत असताना त्याकडे शासनाकडून दुर्लक्ष होत आहे. आजही भटक्या समाजात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. व्यसनाधीनता आहे, देवदासीचे प्रमाण वाढत आहे. या सगळ्यातून आर्थिक शोषणदेखील होत आहे. समाजातील सुशिक्षितांंपर्यत शासनाच्या योजना पोहोचत नाहीत. अशा परिस्थितीत भटक्या समाजातील व्यक्तींनी आपले अस्तित्व टिकवायचे कसे? असा प्रश्न वैशाली भांडवलकर यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Baba Adhavबाबा आढावPuneपुणे