शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून राफेलची चौकशी करण्याची आवश्यकता - रत्नाकर महाजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 01:09 IST

राफेल कराराबाबत भाजपाचे पदाधिकारी गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिंडोरा पिटून बालीशपणे उत्तरे देत आहेत. विमानांची वाढलेली किंमत आणि अनिल अंबानी यांच्या कंपनीबरोबर केलेल्या कराराची माहिती सर्वोच्च न्यायालय आणि संसदेपासून लपवून ठेवली आहे.

पिंपरी : राफेल कराराबाबत भाजपाचे पदाधिकारी गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिंडोरा पिटून बालीशपणे उत्तरे देत आहेत. विमानांची वाढलेली किंमत आणि अनिल अंबानी यांच्या कंपनीबरोबर केलेल्या कराराची माहिती सर्वोच्च न्यायालय आणि संसदेपासून लपवून ठेवली आहे. या कराराबाबत झालेल्या भ्रष्टाचारावर आणि चुकांवर पांघरूण घालण्याचा हा प्रकार आहे. याची संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी पिंपरीत केली.पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पत्रकार परिषद झाली. या वेळी शहराध्यक्ष सचिन साठे उपस्थित होते. भाजपा सरकारवर टीका करताना महाजन म्हणाले, ‘‘आघाडी सरकारच्या काळात राफेल करारात १२६ विमाने एक विमान ५२६ कोटी रुपये याप्रमाणे ठरले होते. यापैकी ३६ विमाने प्रत्यक्ष फ्रान्समधील कंपनीतून व उरलेली हिंदुस्थान एरोनॉटिक्सला तंत्रज्ञान देऊन भारतात त्यांची निर्मिती करण्याचे नियोजन होते. भाजपा सरकार स्थापन झाल्यानंतर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दुसऱ्याच महिन्यात हा करार रद्द करून कंपनीशी वाटाघाटी केल्या.दोन महिन्यांनंतर पंतप्रधानांनी फ्रान्सचा दौरा करून एक विमान सोळाशे कोटी रुपयांना खरेदी करण्याचा नवीन करार केला. पंधरा दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या आणि ४५ हजार कोटी रुपये कर्ज असलेल्या अनिल अंबानी यांच्या कंपनीला बरोबर घेतले. कराराबाबत भाजपामधूनच बाहेर पडलेल्या दोघांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्याच्या सुनावणीच्या वेळी सरकारने न्यायालयाची, संसदेची तसेच देशातील जनतेची फसवणूक करून खोटी माहिती सादर केली. संयुक्त संसदीय समितीसमोर याबाबतचा अहवाल सादर केला नसतानाही अहवाल दिला असल्याचे न्यायालयात सांगितले. समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी खरी माहिती उघडकीस आणली. तेव्हा भाजपाने काँग्रेसची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी भाजपाचे पदाधिकारी दिशाभूल करीत आहेत. या प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती स्थापन करावी.एमआयएमशी युती नाहीचप्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएमच्या युती बाबत विचारले असता महाजन म्हणाले, ‘‘आगामी निवडणुकीत धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवणाºया सर्व पक्षांनी एकत्र यावे व हुकूमशाही विरोध लढा उभारावा, अशी कॉंग्रेसची भूमिका आहे. एमआयएमसह चर्चा होणे अशक्य आहे. मनसेबाबत काँग्रेसची काहीच भूमिका नाही.’’ 

टॅग्स :congressकाँग्रेसPuneपुणे