शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 19:02 IST

लोकांची मानसिकता बदलणे ही काळाची गरज...

ठळक मुद्देसिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचा सोळावा पदवीदान समारंभभाषणाला मराठीतून सुरूवात  

पुणे : ‘निर्भया’ नंतर महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत देशातील कायदे अधिक कडक केले. मात्र, तरीही देशात बलात्काराच्या घटना होत आहेत. ही निंदनीय बाब असून या घटना थांबविण्यासाठी समाजाच्या मानसिकतेत बदल होण्याची गरज आहे. त्यासाठी शालेय जीवनापासूनच सर्व विद्यार्थ्यांमध्ये चांगले मुल्य रुजविण्याची आवश्यकता असून देशातील नैसर्गिक साधन संपत्तीचे, संस्कृतिचे, परंपरांगत चालत आलेल्या चांगल्या गोष्टींचे जतन केले पाहिजे, असे प्रतिपादन देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी रविवारी केले.लवळे येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सोळाव्या पदवीदान समारंभ प्रसंगी व्यंकय्या नायडू बोलत होते. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मंत्री छगन भुजबळ, सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष शां. ब. मुजूमदार, कुलगुरू रजनी गुप्ते, प्र-कुलगुरू तथा विद्यापीठाच्या प्रधान संचालिका विद्या येरवडेकर, कुलसचिव एम. जी. शेजूल उपस्थित होते. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर, शास्त्रज्ञ डॉ. टेसी थॉमस यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली. तसेच विद्यापीठातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना सुवर्णपदक पदवी प्रदान केले.व्यंकय्या नायडू म्हणाले, आपल्या आई-वडिलांचा ,गुरूंजणांचा, वडीलधाऱ्यांचा, ज्येष्ठांचा व आपल्या बहिणींचा आदर ठेवण्याबाबत मुलांना लहानपनापासून शिकवले पाहिजे. समाजात गुरूचे स्थान महत्त्वाचे असून शाळा व महाविद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखविला पाहिजे. शिक्षणामुळे जगभरातील संधीची दारे उघडली जातात. शिक्षण हे प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव करुन देते.जीवनात निर्माण झालेल्या आव्हानांकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे. तसेच समाजातील राक्षसांना संपवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती व प्रशासकीय कौशल्यांची आवश्यकता आहे. लोकांची मानसिकता बदलणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी आपल्या संस्कृती आणि इतिहासाचा आधार घेतला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.डॉ. शां. ब. मुजूमदार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जावेद अख्तर, शास्त्रज्ञ डॉ. टेसी थॉमस यांनी मनोगत व्यक्त केले. --विद्यापीठांच्या क्रमवारीत वाढ व्हावी...इंग्रज अधिकारी मेकॉले याने देशाला दिलेल्या शिक्षण पध्दतीत बदल करणे गरजेचे आहे. त्यातच देशाचा इतिहास चूकीच्या पध्दतीने लिहिला असून खरा इतिहास समाजपर्यंत पोहचत नाही, अशी खंत व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली. तसेच जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत पहिल्या ३०० मध्ये भारतातील एकही विद्यापीठ येत नाही. परंतु, त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेले पाहिजे. मात्र, आपल्या आई-वडिलासाठी, समाजासाठी, मातृभूमिच्या सेवेसाठी परत आले पाहिजे, असेही व्यंकय्या नायडू म्हणाले.........भाषणाला मराठीतून सुरूवात  व्यंकय्या नायडू यांनी पदवी प्रदान समारंभ प्रसंगी भाषणाची सुरूवात मराठीतून केली. त्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सिंबायोसिसचा गौरव करताना व्यंकय्या नाडू म्हणाले, सध्या ‘वसुधैव कुटुंबकम’चा वारसा सिम्बायोसिस विद्यापीठ चालवत आहे. जगभरातील विविध देशांचे विद्यार्थी सिंबायोसिसमध्ये शिक्षणासाठी येत आहेत, ही गौरवाची बाब आहे.

टॅग्स :Puneपुणेsymbiosisसिंबायोसिस