कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही ; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 04:46 PM2019-12-27T16:46:55+5:302019-12-27T16:50:00+5:30

ष्ट्रवादी काँगेसचे आमदार अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात नवा कलगीतुरा रंगण्याची शक्यता निर्माण झाली असून 'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही' असा टोला पवार यांनी पाटील यांना लगावला आहे. 

NCP Ajit Pawar controversial talk about BJP Chandrakant Patil | कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही ; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला 

कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही ; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला 

googlenewsNext

पुणे : राष्ट्रवादी काँगेसचे आमदार अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात नवा कलगीतुरा रंगण्याची शक्यता निर्माण झाली असून 'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही' असा टोला पवार यांनी पाटील यांना लगावला आहे. 

पुण्यात ते पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आयोजित जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी विविध मुद्दयांवर संवाद साधला. पाटील यांनी राष्ट्रवादीला गृहखाते देऊ नये कारण ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरा लावतील असे वक्तव्य केले होते. त्यावर पवार यांनी बोलताना, 'आम्ही त्यांचं सरकार असताना असं काहीही वक्तव्य केले नाही. १०५ जागा निवडून येवूनही  त्यांचं सरकार बनलं नाही याच त्यांना दुःख आहे. अधिवेशन काळातही त्यांनी काही व्यक्तव्य केली होती, ज्याला ठाकरे यांनी उत्तर दिले होते. मात्र त्यांच्यासाठी त्यांनी  'चोराच्या मनात चांदणे' किंवा 'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही' अशी म्हणही त्यांनी वापरली. यावेळी पक्ष देईल ते पद स्वीकारण्यास तयार असून राष्ट्रवादीला एखादे महत्वाचे खाते मिळू शकते असे सूचक विधानही त्यांनी केले. 

 कर्जमाफीचा श्रेय घेण्याचा कोणताही वाद महाविकास आघाडीत नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवरही त्यांनी भाष्य केले. याबाबत मुंबईत बोलणे झाले असून तीनही पक्षांच्या प्रमुखांनी निर्णय घेतला असल्याचे सांगितले. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या विचारांच्या स्थानिक पक्षप्रमुखांकडून एकत्र बसून निर्णय घेण्यात येणार असून तिथे एकमत नाही झालं तर वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी म्हटले. 

मी आणि हर्षवर्धन पाटील दुश्मन नाही 

मी प्रोटोकॉल पाळणारा माणूस आहे. त्यामुळे माझ्या नावाची पाटी सरकवून त्याआधी प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून बाळासाहेब थोरात यांच्या नावाची पाटी ठेवली. पाटील यांच्याशेजारी बसून राजकारणाव्यतिरिक्त बोलणे झाले, आमची राजकीय भूमिका वेगळी असली तरी आम्ही एकमेकांचे दुश्मन नाही असेही सांगायला ते विसरले नाहीत. 

Web Title: NCP Ajit Pawar controversial talk about BJP Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.