शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
5
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
6
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
7
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
8
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
9
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
10
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
12
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
13
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
14
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
15
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
16
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
17
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
18
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
19
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
20
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप

Navale Bridge Accident: उतार कमी करणार! अपघात रोखण्यासाठी सल्लागाराची नेमणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 09:59 IST

सातारा-मुंबई महामार्गावर नवले पुलाजवळ रविवारी भरधाव ट्रकने ४८ वाहनांना उडवले आणि सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली

- कल्याणराव आवताडे

धायरी (पुणे) : स्वामी नारायण मंदिर ते नवले पूल हे सहा किलोमीटरहून अधिक अंतर आहे. मागील आठ वर्षांत येथे १८५ हून अधिक अपघात झाले असून, यात ६६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. तीव्र उतार हेच येथील अपघाताचे प्रमुख कारण असल्याचे निदर्शनास आल्याने स्वतंत्र समिती नेमून ३ टक्क्यांपर्यंत ग्रेडियंट कमी केले जाईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले.

सातारा-मुंबई महामार्गावर नवले पुलाजवळ रविवारी (दि. २०) भरधाव ट्रकने ४८ वाहनांना उडवले आणि सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली. उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काही निर्णय घेतले गेले. अनेक अपघाताच्या घटनांचा अभ्यास केला असता, वाहनचालकांची चुकी, ब्रेक फेल, अवजड वाहनांवरील नियंत्रण सुटणे अशीच कारणे समोर येतात. बऱ्याचवेळेला काही अवजड वाहनांचे चालक इंधन वाचविण्यासाठी वाहन ‘न्यूट्रल’ किंवा इंजिन बंद करून या उतारावरून चालवीत असतात. अचानकपणे इतर वाहने समोर आल्यास चालकाचा वाहनावरील ताबा सुटतो अन् विचित्र अपघात घडतो.

महामार्गावर इतर ठिकाणीही उतार असतो. मात्र, या ठिकाणी वारंवार अपघात घडतात. याच भागात सातत्याने अपघात का घडतात व अपघात रोखण्यासाठी त्यावर कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. ‘लोकमत’शी बाेलताना संजय कदम यांनी माहिती दिली.

येथेच अपघात का हाेतात?

मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल हा परिसर तीव्र उताराचा आहे. हा नैसर्गिक उतार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या दृष्टीने नियमाप्रमाणे टेकडी भागाचा उतार आहे. हा उतार साधारणत: ४.३ टक्के ग्रेडियंट आहे. बऱ्याच वेळेला काही वाहनचालक बेशिस्तपणे, वाहतूक नियमांचे पालन न करता वाहन चालवीत असल्याने सतत अपघात घडत असल्याचे मागील घटनांवरून दिसून येते, असे संजय कदम म्हणाले.

अपघात राेखण्यासाठी हे करणार

- परिसरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनसंख्या लक्षात घेऊन महामार्गावर अधिकची सुरक्षितता करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे स्वतंत्र सल्लागार नेमण्यात आला आहे. महामार्गातही आवश्यक ते बदल करू. यात तांत्रिक समितीचा अभ्यास करून ३ टक्क्यांपर्यंत ग्रेडियंट कमी करता येईल.

उड्डाण पुलाचाही पर्याय

- मुळात हे काम बीओटी तत्त्वावर आहे. यात आम्हालाही बऱ्याच समस्या आहेत. तांत्रिक समितीचा अहवाल आल्यानंतर सर्व कामे प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. साधारणत: तीन महिन्यांमध्ये यावर निर्णय होईल. त्यानंतर कामास सुरुवात होईल. यामध्ये उतार कमी करायचा की उड्डाणपूल करायचा, याबाबत नेमलेल्या स्वतंत्र सल्लागार, समितीच्या अहवालानंतरच ठरविण्यात येईल, असेही संजय कदम म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातsatara-acसाताराkatrajकात्रजNHAIभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण