शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Navale Bridge Accident: उतार कमी करणार! अपघात रोखण्यासाठी सल्लागाराची नेमणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 09:59 IST

सातारा-मुंबई महामार्गावर नवले पुलाजवळ रविवारी भरधाव ट्रकने ४८ वाहनांना उडवले आणि सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली

- कल्याणराव आवताडे

धायरी (पुणे) : स्वामी नारायण मंदिर ते नवले पूल हे सहा किलोमीटरहून अधिक अंतर आहे. मागील आठ वर्षांत येथे १८५ हून अधिक अपघात झाले असून, यात ६६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. तीव्र उतार हेच येथील अपघाताचे प्रमुख कारण असल्याचे निदर्शनास आल्याने स्वतंत्र समिती नेमून ३ टक्क्यांपर्यंत ग्रेडियंट कमी केले जाईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले.

सातारा-मुंबई महामार्गावर नवले पुलाजवळ रविवारी (दि. २०) भरधाव ट्रकने ४८ वाहनांना उडवले आणि सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली. उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काही निर्णय घेतले गेले. अनेक अपघाताच्या घटनांचा अभ्यास केला असता, वाहनचालकांची चुकी, ब्रेक फेल, अवजड वाहनांवरील नियंत्रण सुटणे अशीच कारणे समोर येतात. बऱ्याचवेळेला काही अवजड वाहनांचे चालक इंधन वाचविण्यासाठी वाहन ‘न्यूट्रल’ किंवा इंजिन बंद करून या उतारावरून चालवीत असतात. अचानकपणे इतर वाहने समोर आल्यास चालकाचा वाहनावरील ताबा सुटतो अन् विचित्र अपघात घडतो.

महामार्गावर इतर ठिकाणीही उतार असतो. मात्र, या ठिकाणी वारंवार अपघात घडतात. याच भागात सातत्याने अपघात का घडतात व अपघात रोखण्यासाठी त्यावर कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. ‘लोकमत’शी बाेलताना संजय कदम यांनी माहिती दिली.

येथेच अपघात का हाेतात?

मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल हा परिसर तीव्र उताराचा आहे. हा नैसर्गिक उतार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या दृष्टीने नियमाप्रमाणे टेकडी भागाचा उतार आहे. हा उतार साधारणत: ४.३ टक्के ग्रेडियंट आहे. बऱ्याच वेळेला काही वाहनचालक बेशिस्तपणे, वाहतूक नियमांचे पालन न करता वाहन चालवीत असल्याने सतत अपघात घडत असल्याचे मागील घटनांवरून दिसून येते, असे संजय कदम म्हणाले.

अपघात राेखण्यासाठी हे करणार

- परिसरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनसंख्या लक्षात घेऊन महामार्गावर अधिकची सुरक्षितता करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे स्वतंत्र सल्लागार नेमण्यात आला आहे. महामार्गातही आवश्यक ते बदल करू. यात तांत्रिक समितीचा अभ्यास करून ३ टक्क्यांपर्यंत ग्रेडियंट कमी करता येईल.

उड्डाण पुलाचाही पर्याय

- मुळात हे काम बीओटी तत्त्वावर आहे. यात आम्हालाही बऱ्याच समस्या आहेत. तांत्रिक समितीचा अहवाल आल्यानंतर सर्व कामे प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. साधारणत: तीन महिन्यांमध्ये यावर निर्णय होईल. त्यानंतर कामास सुरुवात होईल. यामध्ये उतार कमी करायचा की उड्डाणपूल करायचा, याबाबत नेमलेल्या स्वतंत्र सल्लागार, समितीच्या अहवालानंतरच ठरविण्यात येईल, असेही संजय कदम म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातsatara-acसाताराkatrajकात्रजNHAIभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण