शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राष्ट्रवाद, स्वच्छ प्रतिमेमुळेच कमळ फुलले : व्यापार क्षेत्राचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 20:58 IST

राष्ट्रवाद, सरकारची स्वच्छ प्रतिमा, धाडसी निर्णय ही कारणे अधिक प्रभावी ठरली असल्याचे मत व्यापार क्षेत्रातून व्यक्त होत आहे. 

ठळक मुद्देनोटबंदी, जीएसटी नंतरही व्यापारी भाजपच्या पाठीशी

पुणे : नोटबंदी, वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणी नंतर उडालेला गोंधाळ...जीएसटीतील न सुटलेले प्रश्न..अशा अनेक अडचणी असूनही व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाला साथ दिली. राष्ट्रवाद, सरकारची स्वच्छ प्रतिमा, धाडसी निर्णय ही कारणे अधिक प्रभावी ठरली असल्याचे मत व्यापार क्षेत्रातून व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका रात्रीत नोटबंदी करीत पाचशे आणि हजार रुपये मूल्याच्या नोटा चलनातून बाद केल्या. बाजारातून काळापैसा काढण्यासाठी नोटबंदीचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. बाजारातून काळापैसा हद्दपार झालाच नाही. त्यामुळेच यंदाच्या प्रचारातही नोटबंदी यश असल्याची टिमकी सरकारने वाजवली नाही. जीएसटीच्या अंमलबाजवणी नंतर निरीक्षक राजपासून त्याच्या कर आकारणीचे देखील अनेक मुद्दे व्यापाऱ्यांनी उपस्थित केले. त्यावरुन आंदोलनही छेडले. अजूनही व्यापाºयांच्या म्हणण्याप्रमाणे जीएसटी सुरळीत झालेला नाही. सर्व अडचणी मतदारांनी मान्य करीत, पुन्हा एकदा मोदी यांच्या हाती सत्ता दिली. उलट मोदी लाटेवेळी आलेल्या जागांपेक्षा अधिक जागा मतदारांनी बहाल केल्या. निवडणुकीपूर्वी जवानांवर झालेला दहशतवादी हल्ला, त्याला भारताने दिलेले चोख प्रत्युत्तर, राष्ट्रवाद आणि धडाकेबाज निर्णय यामुळे मतदार प्रभावित झाल्याचे दिसून येते. प्रचारामधून विकासा ऐवजी राष्ट्रवादाचा मुद्दा घेण्यात आला. त्याला मतदारांनी देखील प्रतिसाद दिला. मोदी लाटेपेक्षा अधिक जागांवर भाजपच्या उमेदवारांना निवडून दिले. ग्राहक पेठेचे संचालक सूर्यकांत पाठक म्हणाले, अजूनही खालच्या पातळीवरील भ्रष्टाचार कायम असला तरी मंत्र्यांच्या पातळीवरील भ्रष्टाचार रोखला गेला आहे. मोदी सरकारमधील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. जीएसटी आणि नोटबंदी याकाळात अनेकांना त्रास झाला. मात्र, सर्वाधिक त्रास काळाबाजार करणाºयांना झाला. व्यापाऱ्यांच्या मागणीप्रमाणे जीएसटीच्या कर रचनेत बदल करण्यात आला. दरमहा ऐवजी तीन महिन्यांतून एकदा जीएसटी भरण्याची मुभा देण्याची मागणी आहे. अशा अनेक सुधारणा प्रलंबित आहेत. मात्र, राष्ट्रवादाची दिलेली हाक अधिक प्रभावी ठरली. भाजपने जाहीरनाम्यामधे व्यापारी वर्गासाठी महामंडळाच्या धरतीवर स्वतंत्र व्यवस्था उभारण्याची घोषणा केली. जीएसटीतील कररचनेमध्ये सुधारणा केली. काही वस्तूंना सवलत दिली. कॉंग्रेसने कधीही व्यापाºयांना आपल्या जाहीरनाम्यात स्थान दिलेले नाही, त्यामुळे व्यापारी वर्ग भाजपाच्या मागे राहिल्याचे गूळ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अजित सेटिया यांनी सांगितले.  गेल्या लोकसभा निवडणूकीत पत्रकार परिषद देऊन भाजपला पाठिंबा दिला होता. जीएसटीत ब्रँडेड वस्तूंवर ५ टक्के कर असून, ब्रँडेड नसलेल्या वस्तूंवर सूट आहे. अन्न आणि औषध प्रशासन कायद्यानुसार परवानाप्राप्त व्यापाºयाने परवाना नसलेल्या व्यापाऱ्यास माल विकल्यास दोघांनाही ५० हजार दंड आहे. अशा अनेक व्यापारी विरोधी तरतूदी आहेत. नोटबंदी आणि जीएसटी या दोन्हीचा त्रास झाला असूनही, व्यापाऱ्यांनी स्थिर सरकारसाठी भाजपाला साथ दिल्याचे पुणे मर्चंट्स व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालbusinessव्यवसाय