शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Nana Patole | "मागील ९ वर्षे भाजपाकडून देश तोडण्याचे काम"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 19:30 IST

काँग्रेसच्या 'हात ते हात जोडो अभियाना'ला सुरूवात...

पुणे: सत्तेवर आल्यापासून मागील ९ वर्षात भारतीय जनता पक्षाने केवळ देश तोडण्याचे काम केले आहे. त्यांना जनहिताचे काहीही काम करायचे नाही. धर्माच्या आधारावर देशात फूट पाडायची आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसच्या 'हात ते हात जोडे' या अभियानाला सोमवारी सुरूवात करण्यात आली.

महात्मा फुले समता भूमी स्मारकाजवळ झालेल्या या कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी मंत्री विश्वजीत कदम, आमदार संग्राम थोपटे, माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे व अन्य प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले व पुण्यातून हे राज्याचे अभियान सुरू करत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

देश अडचणीत असेल तर काँग्रेसच धाव...

राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात जो प्रतिसाद मिळाला त्यावरून देशातील सामान्य जनतेच किती खदखद आहे ते लक्षात आले. देश अडचणीत असेल तर काँग्रेसच धावते हा इतिहास आहे. त्याची पुनरावृती होणार आहे असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. सुशिलकुमार शिंदे यांनीही यावेळी काँग्रेसच्या देशकार्याचा धावता आढावा घेत, राहूल गांधी यांनी भारत जोडो मधून भारतीय जनतेत काँग्रेसविषयी विश्वास निर्माण केला आहे असे सांगितले. विश्वजीत कदम, संग्राम थोपटे, मोहन जोशी, शाम उमाळकर यांची यावेळी भाषणे झाली. अरविंद शिंदे, अविनाश बागवे यांनी सुत्रसंचालन केले. कमल व्यवहारे यांनी आभार व्यक्त केले. पटोले यांच्या हस्ते मोहिमेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाNana Patoleनाना पटोले