शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

Nana Patole | "मागील ९ वर्षे भाजपाकडून देश तोडण्याचे काम"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 19:30 IST

काँग्रेसच्या 'हात ते हात जोडो अभियाना'ला सुरूवात...

पुणे: सत्तेवर आल्यापासून मागील ९ वर्षात भारतीय जनता पक्षाने केवळ देश तोडण्याचे काम केले आहे. त्यांना जनहिताचे काहीही काम करायचे नाही. धर्माच्या आधारावर देशात फूट पाडायची आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसच्या 'हात ते हात जोडे' या अभियानाला सोमवारी सुरूवात करण्यात आली.

महात्मा फुले समता भूमी स्मारकाजवळ झालेल्या या कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी मंत्री विश्वजीत कदम, आमदार संग्राम थोपटे, माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे व अन्य प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले व पुण्यातून हे राज्याचे अभियान सुरू करत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

देश अडचणीत असेल तर काँग्रेसच धाव...

राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात जो प्रतिसाद मिळाला त्यावरून देशातील सामान्य जनतेच किती खदखद आहे ते लक्षात आले. देश अडचणीत असेल तर काँग्रेसच धावते हा इतिहास आहे. त्याची पुनरावृती होणार आहे असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. सुशिलकुमार शिंदे यांनीही यावेळी काँग्रेसच्या देशकार्याचा धावता आढावा घेत, राहूल गांधी यांनी भारत जोडो मधून भारतीय जनतेत काँग्रेसविषयी विश्वास निर्माण केला आहे असे सांगितले. विश्वजीत कदम, संग्राम थोपटे, मोहन जोशी, शाम उमाळकर यांची यावेळी भाषणे झाली. अरविंद शिंदे, अविनाश बागवे यांनी सुत्रसंचालन केले. कमल व्यवहारे यांनी आभार व्यक्त केले. पटोले यांच्या हस्ते मोहिमेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाNana Patoleनाना पटोले