शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

Nana Patole | "मागील ९ वर्षे भाजपाकडून देश तोडण्याचे काम"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 19:30 IST

काँग्रेसच्या 'हात ते हात जोडो अभियाना'ला सुरूवात...

पुणे: सत्तेवर आल्यापासून मागील ९ वर्षात भारतीय जनता पक्षाने केवळ देश तोडण्याचे काम केले आहे. त्यांना जनहिताचे काहीही काम करायचे नाही. धर्माच्या आधारावर देशात फूट पाडायची आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसच्या 'हात ते हात जोडे' या अभियानाला सोमवारी सुरूवात करण्यात आली.

महात्मा फुले समता भूमी स्मारकाजवळ झालेल्या या कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी मंत्री विश्वजीत कदम, आमदार संग्राम थोपटे, माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे व अन्य प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले व पुण्यातून हे राज्याचे अभियान सुरू करत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

देश अडचणीत असेल तर काँग्रेसच धाव...

राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात जो प्रतिसाद मिळाला त्यावरून देशातील सामान्य जनतेच किती खदखद आहे ते लक्षात आले. देश अडचणीत असेल तर काँग्रेसच धावते हा इतिहास आहे. त्याची पुनरावृती होणार आहे असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. सुशिलकुमार शिंदे यांनीही यावेळी काँग्रेसच्या देशकार्याचा धावता आढावा घेत, राहूल गांधी यांनी भारत जोडो मधून भारतीय जनतेत काँग्रेसविषयी विश्वास निर्माण केला आहे असे सांगितले. विश्वजीत कदम, संग्राम थोपटे, मोहन जोशी, शाम उमाळकर यांची यावेळी भाषणे झाली. अरविंद शिंदे, अविनाश बागवे यांनी सुत्रसंचालन केले. कमल व्यवहारे यांनी आभार व्यक्त केले. पटोले यांच्या हस्ते मोहिमेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाNana Patoleनाना पटोले