शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
2
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
3
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
4
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
5
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
6
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
7
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
8
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
9
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
10
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
11
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
12
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
13
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
14
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
15
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
16
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
17
Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
18
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
19
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
20
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

'इंग्रजांना जसं घालवलं तसं आता बीजेपीलाही घालवू'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 20:32 IST

प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून कामकाजाची थोडक्यात माहिती घेतल्यानंतर पटोले म्हणाले, काँग्रेस लढणारी संघटना आहे

पुणे:काँग्रेसने इंग्रजांना या देशातून घालवले. आताचे भारतीय जनता पार्टीचे सरकार त्यापेक्षा भयंकर आहे, आता त्यांना घालवण्यासाठी काम करूयात, वाद विसरा व पुढे चालायचे शिका अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उमेद भरली.

प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून कामकाजाची थोडक्यात माहिती घेतल्यानंतर पटोले म्हणाले, काँग्रेस लढणारी संघटना आहे. देशाच्या जडणघडणीत काँग्रेसचा मोठा वाटा आहे. ती चौकट मोडण्याचा प्रयत्न करणारे सरकार देशात आहे. त्यांना आपल्याला सत्तेच्या सर्व ठिकाणांहून घालवून द्यायचे आहे, त्यासाठी काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपापसातले वाद सोडून द्या, काय काय झाले याची चर्चा करत बसू नका, उद्या काय करायचे आहे याकडे लक्ष द्या. एकत्र आलो तर काहीही अशक्य नाही हे कायम लक्षात ठेवा. एच. के. पाटील यांनीही काहीजणांना प्रश्न विचारले माहिती घेतली.

पक्षाचे राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या समवेत मंगळवारी दुपारी काँग्रेस (congress) भवनमध्ये पटोले यांनी पुणे, पुणे जिल्हा व पिंपरी-चिंचवड या तिन्ही ठिकाणच्या प्रमुख पदाधिकारी व आघाड्यांची बैठक घेतली. त्यावेळी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप, आजीमाजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेPuneपुणेcongressकाँग्रेस