शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

भीमा नदीपात्रात सापडलेल्या सात मृतदेहांचे गूढ उघडले; चुलत भावांनी घडविले सामूहिक हत्याकांड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 17:52 IST

बदला घेण्यासाठी चुलत भावांनी सात जणांचे सामूहिक हत्याकांड केले...

- संदीप चाफेकर

यवत (पुणे) : यवत पोलिस स्टेशन हद्दीतील पारगाव (ता. दौंड) येथे भीमा नदीच्या पात्रात सापडलेले सातही जणांची हत्या केली असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चुलत भावांनी सात जणांचे सामूहिक हत्याकांड केले असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.

याबाबतची पत्रकार परिषद पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी यवत पोलिस ठाण्यात घेतली. सामूहिक हत्याकांडाचा तपास पोलिसांनी केला असून, पाच आरोपींना अटक केल्याची माहिती दिली. पोलिसांनी खून करणाऱ्या आरोपी अशोक कल्याण पवार (वय ३९), श्याम कल्याण पवार (३५), शंकर कल्याण पवार (३७) प्रकाश कल्याण पवार (२४) व कांताबाई सर्जेराव जाधव (४५, रा. ढवळे मळा, निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर ) यांना अटक केली आहे. आरोपी मयतचे चुलत भाऊ आहेत. पोलिस तपासात आरोपी अशोक कल्याण पवार यांचा मुलगा धनंजय याचा काही महिन्यांपूर्वी वाघोली येथे अपघाती मृत्यू झाला होता. त्यामध्ये मयत मोहन उत्तम पवार व त्याचा मुलगा अनिल मोहन पवार हेच जबाबदार आहेत, असा संशय आरोपींना होता. तोच राग त्यांच्या मनात होता. त्या कारणावरून बदला घेण्यासाठी आरोपींनी सामूहिक हत्याकांड घडवून आणले असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.

पारगाव येथील भीमा नदीच्या पुलालगत बुधवार (दि. १८) ते रविवार (दि. २२) च्या दरम्यान पोलिसांना सात मृतदेह मिळून आले होते. एकाच वेळी तब्बल सात मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली होती. अनोळखी मयत इसमांच्या नातेवाइकांचा शोध यवत पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामीण करीत होते. त्यापैकी शुक्रवारी (दि. २०) रोजी नदीपात्रात मिळालेल्या मयत महिलेजवळ एक मोबाइल सापडला त्यावरून मयतांचे नातेवाइकांचा शोध पोलिसांनी लावला.

मयतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला व तीन लहान मुलांचा समावेश होता. मयत मोहन पवार हे पत्नी संगीता ऊर्फ शहाबाई, मुलगी राणी, जावई श्याम, नातू रितेश, छोटू, कृष्णा यांच्यासह मुलगा अनिल याच्याबरोबर मागील एक वर्षापासून निघोज, ता. पारनेर येथे राहून मजुरी काम करत होते.

एकाच वेळी सात मृतदेह भीमा नदीच्या पात्रात मिळून आल्याने सुरुवातीला सामूहिक आत्महत्या आहे की काय, अशी चर्चा सुरू होती. मयत इसमांच्या अंगावर कसल्याही मारहाणीच्या जखमा नसल्याने अशी चर्चा केली जात होती. मात्र पुणे ग्रामीण पोलिसांनी योग्य दिशेने तपास सुरू ठेवला. तपासादरम्यान काही पुरावे पोलिसांच्या निदर्शनास आले त्यावरून सर्वांची हत्या केली असल्याचा शोध पोलिसांनी लावला.

नाहीतर प्रकरण दडपले असते...

अपघाती मृत्यू नसून खून असल्याच्या संशयावरून चुलत भावांनीच संपूर्ण कुटुंबाचा खून केला. सदर सामूहिक हत्याकांड करणारा आरोपी सुशिक्षित नाहीत. मात्र त्यांनी केलेला गुन्हा समोर येण्यास आठवडा गेला. पोलिसांनी आकस्मित मयतांचा तपास करताना खोलवर तपास केला नसता तर कदाचित हा प्रकार उघडकीस आला नसता. मात्र पोलिसांनी घटनेतील बारकावे लक्षात घेत योग्य तपास केल्याने सदर हत्याकांड उघडकीस आले.

सदर गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शेळीमकर, पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, शिवाजी ननावरे, संजय नागरगोजे, सहायक फौजदार तुषार पंदारे, हनुमंत पासलकर, मुकुंद कदम, काशीनाथ राजापुरे, पोलिस हवालदार सचिन गाडगे, राजू मोमीन, जनार्दन शेळके, अजित भुजबळ, मंगेश थिगले, योगेश नागरगोजे, विजय कांचन, चंद्रकांत जाधव, प्रमोद नवले, नीलेश शिंदे, धीरज जाधव, मंगेश भगत, तुषार भोईटे, अमोल शेडगे, दगडू वीरकर, अक्षय सुपे, नीलेश कदम, महेंद्र चांदणे, रामदास जगताप, अक्षय यादव, अजित काळे, प्रमोद गायकवाड यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस