शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पाणी गळती न रोखल्यास महापालिका आयुक्तांनी राजीनामा द्यावा : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 19:20 IST

मुदतीत गळती रोखावी अन्यथा...

पुणे : “पुण्याच्या पाणीप्रश्नावरून पालकमंत्र्यांच्या बैठकीत आमचे समाधान झाले नाही. सत्ता बदलली तरी अधिकाऱ्यांची तीच उत्तरे आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी काहीही केले जात नाही. त्यामुळे ठरलेल्या वेळेत ही पाणी गळती न रोखल्यास महापालिका आयुक्तांनी राजीनामा द्यावा,” अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. कोणत्याही राजकीय पक्षाने यावरून राजकारण न करता याकडे लक्ष द्यावे. अधिकारी मात्र, तीच उत्तरे देत नसल्याने हा प्रश्न सुटेल असा वाटत नाही, अशी उद्विग्नताही त्यांनी व्यक्त केली.

पुण्याच्या पिण्याच्या आणि ग्रामीण भागाच्या पाणीप्रश्नाबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोलाविलेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यावर त्यांनी या वेळी चांगलेच तोंडसूख घेतले. अधिकाऱ्यांमुळेच हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही, असा आरोप करत त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांनी विशेषत: कुमार यांच्या उत्तरावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “महापालिका आयुक्तांनी ४० टक्के पाण्याची गळती होत असल्याचे कबूल केले आहे. ते पालिकेच्या रेकॉर्डवर आहे. जलवाहिन्या, कालव्यातून होणाऱ्या पाण्याची गळतीमुळे महापालिकेला २१ टीएमसी पाणी घ्यावे लागते. त्यामुळे हे पाणी महापालिकेच्या खात्यावर पडत आहे. पुणेकर इतके पाणी वापरत नसताना त्यांच्यावर चुकीचा आरोप होतो. मात्र, यात केवळ अधिकाऱ्यांची चूक आहे.”

मुदतीत गळती रोखावी अन्यथा...

गेल्या तीस वर्षांपासून मी जिल्ह्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. यापूर्वी कॉंग्रेस त्यानंतर कॉंग्रेस व राष्ट्रवादी आणि त्यानंतर भाजपची सत्ता होती. सौरभ राव, त्यानंतर शेखर गायकवाड व आता विक्रम कुमार असे आयुक्त महापालिकने पाहिले आहेत. आयुक्त बदलले; पण अधिकाऱ्यांची उत्तरे मात्र, बदलली नाहीत, असा आरोपही त्यांनी या वेळी केला. पाणी गळती रोखण्यासाठी आयुक्तांनी सप्टेंबर २०२३ ची मुदत दिली आहे. त्या मुदतीत गळती रोखावी, अन्यथा आयुक्त ज्या ठिकाणी असतील तेथे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.

जायका प्रकल्पामुळे प्रश्न सुटणार नाही

विविध कारणांनी पुण्यात येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यातच शहरात नव्याने काही गावे समाविष्ट झाली आहेत. त्यांनाही पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे योग्य नियोजन करून हा पाणीप्रश्न मिटायला हवा. जायका प्रकल्पातून पाण्यावर प्रक्रिया करून हा प्रश्न सुटणार नाही. सोसायट्यांनीही आपली जबाबदारी ओळखून पाणीगळती कमी करावी, असे ते म्हणाले.

दूध का दूध पानी का पानी

उच्च न्यायालयानेही या प्रश्नाची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे आता अधिकाऱ्यांना न्यायालयात वस्तुस्थिती सांगावी लागणार आहे. सध्याचे आकडे न्यायालयात मांडले गेल्यास गंभीर स्थिती निर्माण होईल. त्यामुळे तेथे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे दूध का दूध पानी का पानी होईल, असा इशारा त्यांनी या वेळी दिला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्र