पुणे : मुंबईवर २६ नोव्हेंबर रोजी झालेला दहशतवादी हल्ला व त्याचा भारतीय जवानांनी केलेला प्रतिकार याचा शालेय पुस्तकात एक धडा म्हणून समावेश करावा अशी मागणी पोलिस मित्र संघटनेच्या वतीने सरकारकडे करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते म्हणाले की, संघटनेच्या वतीने दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना २५ नोव्हेंबरला सायंकाळी बालगंधर्व चौकात झाशीच्या राणीच्या पुतळ्याजवळ श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}