शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा शासनाविरोधात ‘एल्गार’ ;सोशल मिडियावर चालवणार मोहिम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 15:28 IST

राज्य शासनाने महापरीक्षा पोर्टल बंद करून विभाग स्तरावर विविध पद भरतीच्या परीक्षा घेण्याचा चुकीचा निर्णय घेतला असून शासनाच्या या निर्णयाविरोधात एमपीएससी स्टुडेंट्स राईटस् व एमपीएससी समन्वय समितीतर्फे येत्या २४ फेब्रुवारीपासून सोशल मिडियावर ‘हॅश टॅग मोहिम’ राबविली जाणार आहे.

ठळक मुद्देसोशल मिडियावर मोहिम: येत्या २ मार्चला लाक्षणिक उपोषणयेत्या २ मार्चला लाक्षणिक उपोषण

 पुणे: राज्य शासनाने महापरीक्षा पोर्टल बंद करून विभाग स्तरावर विविध पद भरतीच्या परीक्षा घेण्याचा चुकीचा निर्णय घेतला असून शासनाच्या या निर्णयाविरोधात एमपीएससी स्टुडेंट्स राईटस् व एमपीएससी समन्वय समितीतर्फे येत्या २४ फेब्रुवारीपासून सोशल मिडियावर ‘हॅश टॅग मोहिम’ राबविली जाणार आहे. तसेच येत्या २ मार्च रोजी पुण्यात लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, असे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

महापरीक्षा पोर्टल बंद करून शासनाने विभाग स्तरावर भरती घेण्याचा निर्णय अध्यादेशाद्वारे जाहीर केला. मात्र, विभागस्तरावर ऑनलाईन परीक्षा घेऊन सुद्धा त्यात महापरीक्षा पोर्टलसारखाच गैरप्रकार होणार आहे.तसेच सध्या राज्यात ऑनलाईन परीक्षांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे एका पदाची ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी सुमारे एक महिना लागतो. तसेच या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासही बराच वेळ जातो. त्यात ऑनलाईन परीक्षेमध्ये कोणतीही पारदर्शकता नाही. त्यामुळे शासनाने ऑनलाईन परीक्षा बंद करून सर्व परीक्षा या लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) ऑफलाईन पध्दतीने घ्याव्यात,अशी मागणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांनी केली आहे.

 शासनाने एमपीएससीला अधिक सक्षम करून सर्व परीक्षा एमपीएससीकडूनच घ्याव्यात,अशी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. राज्य शासनाकडून काढण्यात आलेल्या अध्यादेशातून महापरीक्षा पोर्टल बंद करण्यात आले किंवा नाही. हे स्पष्टपणे समजत नसल्यामुळे सुरूवातीला विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण होते.परंतु, शासनाने ऑनलाईन पध्दतीने व विभाग स्तरावर परीक्षा घेतल्या जातील,असे नुकतेच स्पष्ट केले.त्यामुळे विद्यार्थ्यांनी शासन निर्णयाविरोधात येत्या २ मार्च रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.शासनाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यंमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.त्यामुळे शासनाने सर्व परीक्षा एमपीएससीतर्फे ऑफलाईन पध्दतीनेच घ्याव्यात,अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे.

महेश बढे, एमपीएससी स्टुडेटस् राईटस्  :सर्व परीक्षा एमपीएससीतर्फे घेतल्या जाव्यात, या एकमुखी मागणीसाठी येत्या २४ फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व विद्यार्थीट्विटर वरून #onlyMPSC ही मोहिम सुरू केली जाणार आहे. तसेच सर्व आमदार व खासदारांना याबाबत लेखी निवेदन देण्यात येणार आहे. त्यांनी अधिवेशनात या विषयावर लाक्षणिक प्रश्न उपस्थित करावा,अशी विनंती लोकप्रतिनिधींना केली जाणार आहे. सर्व परीक्षा एमपीएससीकडून घेण्याचे शासनाने येत्या १ मार्चपर्यंत जाहीर न केल्यास २ मार्च रोजी आंदोलन केले जाणार आहे.

  किरण निंभोरे,विद्यार्थी,स्पर्धा परीक्षा :महापरीक्षा पोर्टल बंद करून शासनाने विभागस्तरावर परीक्षा घेण्याचे निश्चित केले.मात्र,त्यामुळे अधिक गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे.एमपीएससीकडून घेतल्या जाणा-या परीक्षेत अधिक पारदर्शकता आहे.त्यामुळे शासनाने सर्व परीक्षा एमपीएससीकडे द्याव्यात. 

  माधव कल्लाळे, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा : शासनाकडून ऑनलाईन पध्दतीने घेतल्या जाणा-या परीक्षा अधिक वेळ चालतात.तसेच ऑनलाईन परीक्षेत पारदर्शकता नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.एमपीएससीकडून पारदर्शकपणे व जलद गतीने परीक्षा होतात.त्यामुळे सर्व परीक्षा एमपीएससीने घेणे गरजेचे आहे.  नागेश भालेराव, विद्यार्थी,स्पर्धा परीक्षा : एमपीएससी एवढी पारदर्शकता कुठेही नाही.त्यामुळे सर्व परीक्षा एमपीएससीकडे द्याव्यात.महापरीक्षा पोर्टल बंद करून विभागवार परीक्षा घेवून भरती करण्याचा निर्णय योग्य नाही. ऑनलाईन परीक्षांना अधिक वेळ जातो.तर ऑफलाईन परीक्षा लवकर होतात.त्यामुळे शासनाने आपल्या पुनर्विचार करावा.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीEducationशिक्षणTwitterट्विटरSocial Mediaसोशल मीडिया