शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

कंटेनरमुक्त शहराकडे वाटचाल

By admin | Updated: August 10, 2016 01:53 IST

कचरा ओसंडून वाहणारे शहर अशी ओळख झालेल्या पुण्याची कंटेनरमुक्त शहर होण्याकडे वाटचाल सुरू आहे.

पुणे : कचरा ओसंडून वाहणारे शहर अशी ओळख झालेल्या पुण्याची कंटेनरमुक्त शहर होण्याकडे वाटचाल सुरू आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांची वाढती संख्या व स्वयंसेवी संस्थांच्या साह्याने केलेली जनजागृती यामुळे शहरातील ३ हजार कंटेनरची (लोखंडी कचराकुंड्या) संख्या आता फक्त ७५० वर आली आहे. झोपडपट्टीसारख्या परिसरात असलेले हे कंटेनरही काढून टाकण्यासाठी पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रयत्नशील आहे.घनकचरा व्यवस्थापन विभागाने या सर्व उपायांचा प्रभावी पाठपुरावा केल्यामुळे आता शहरातील कंटेनर वेगाने कमी होण्यास सुरुवात झाली आहे. नगरसेवकांकडून होणाऱ्या कंटेनरच्या मागणीत घट झाली आहे. पालिकेने खासगी संस्थांच्या साह्याने शहरात सुरू केलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांमुळे हे शक्य झाले आहे. नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करण्याची, तो कचरावेचकांजवळच जमा करण्याची सवय लावण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. कचरा रस्त्यावर जमा होण्याचे प्रमाण वेगाने घटत चालले आहे. शहराच्या विविध भागांमध्ये सध्या प्रत्येकी ५ टन कचऱ्यावर दररोज प्रक्रिया करणारे एकूण २० प्रकल्प सुरू आहेत. त्याशिवाय मोठे म्हणजे ७०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारा १ व प्रत्येकी १०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारे ३ प्रकल्प सुरू आहेत.शहरातून जमा झालेला कचरा या प्रकल्पांना देण्यात येतो. कचरा जमा करण्यासाठी प्रशासनाने स्वयंसेवी संस्थांबरोबरच पालिकेच्या स्वत:च्या कर्मचाऱ्यांचेही व्यवस्थित नियोजन केले आहे. त्यामुळे त्या त्या भागातील कंटेनरमध्ये कचरा जमा होण्याचे प्रमाण कमी झाले. गाडी नियमितपणे येऊ लागल्यावर नागरिकांनाही कचरा इतस्तत: टाकण्याऐवजी तो गाडीतच देण्याची सवय लागली. कचरा जमा करण्यासाठी घनकचरा विभागाने प्लॅस्टिकचे दोन स्वतंत्र डबे दिले. त्यात ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे देण्याची सवय लागल्यानंतर त्या भागातून कंटेनर काढून घेण्यात आले.परिसरात कचरा जमा करण्यासाठी नागरिकांच्या मागणीनुसार घंटागाडी, मोठी गाडी पाठवण्याचे स्वतंत्र वेळापत्रकच घनकचरा व्यवस्थापन विभागाने तयार केले आहे. त्याची अंमलबजावणी होईल, याकडे खास लक्ष दिले जाते. काही ठिकाणी कंटेनर काढून घेतल्यानंतरही तिथे कचरा टाकला जात होता. त्यावर उपाय म्हणून तिथे रांगोळी काढण्याचा उपक्रम राबविण्यात आला. काही ठिकाणी दिवसभर व रात्रीही कर्मचारी बसवून ठेवण्यात आले. (प्रतिनिधी)