शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

कंटेनरमुक्त शहराकडे वाटचाल

By admin | Updated: August 10, 2016 01:53 IST

कचरा ओसंडून वाहणारे शहर अशी ओळख झालेल्या पुण्याची कंटेनरमुक्त शहर होण्याकडे वाटचाल सुरू आहे.

पुणे : कचरा ओसंडून वाहणारे शहर अशी ओळख झालेल्या पुण्याची कंटेनरमुक्त शहर होण्याकडे वाटचाल सुरू आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांची वाढती संख्या व स्वयंसेवी संस्थांच्या साह्याने केलेली जनजागृती यामुळे शहरातील ३ हजार कंटेनरची (लोखंडी कचराकुंड्या) संख्या आता फक्त ७५० वर आली आहे. झोपडपट्टीसारख्या परिसरात असलेले हे कंटेनरही काढून टाकण्यासाठी पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रयत्नशील आहे.घनकचरा व्यवस्थापन विभागाने या सर्व उपायांचा प्रभावी पाठपुरावा केल्यामुळे आता शहरातील कंटेनर वेगाने कमी होण्यास सुरुवात झाली आहे. नगरसेवकांकडून होणाऱ्या कंटेनरच्या मागणीत घट झाली आहे. पालिकेने खासगी संस्थांच्या साह्याने शहरात सुरू केलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांमुळे हे शक्य झाले आहे. नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करण्याची, तो कचरावेचकांजवळच जमा करण्याची सवय लावण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. कचरा रस्त्यावर जमा होण्याचे प्रमाण वेगाने घटत चालले आहे. शहराच्या विविध भागांमध्ये सध्या प्रत्येकी ५ टन कचऱ्यावर दररोज प्रक्रिया करणारे एकूण २० प्रकल्प सुरू आहेत. त्याशिवाय मोठे म्हणजे ७०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारा १ व प्रत्येकी १०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारे ३ प्रकल्प सुरू आहेत.शहरातून जमा झालेला कचरा या प्रकल्पांना देण्यात येतो. कचरा जमा करण्यासाठी प्रशासनाने स्वयंसेवी संस्थांबरोबरच पालिकेच्या स्वत:च्या कर्मचाऱ्यांचेही व्यवस्थित नियोजन केले आहे. त्यामुळे त्या त्या भागातील कंटेनरमध्ये कचरा जमा होण्याचे प्रमाण कमी झाले. गाडी नियमितपणे येऊ लागल्यावर नागरिकांनाही कचरा इतस्तत: टाकण्याऐवजी तो गाडीतच देण्याची सवय लागली. कचरा जमा करण्यासाठी घनकचरा विभागाने प्लॅस्टिकचे दोन स्वतंत्र डबे दिले. त्यात ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे देण्याची सवय लागल्यानंतर त्या भागातून कंटेनर काढून घेण्यात आले.परिसरात कचरा जमा करण्यासाठी नागरिकांच्या मागणीनुसार घंटागाडी, मोठी गाडी पाठवण्याचे स्वतंत्र वेळापत्रकच घनकचरा व्यवस्थापन विभागाने तयार केले आहे. त्याची अंमलबजावणी होईल, याकडे खास लक्ष दिले जाते. काही ठिकाणी कंटेनर काढून घेतल्यानंतरही तिथे कचरा टाकला जात होता. त्यावर उपाय म्हणून तिथे रांगोळी काढण्याचा उपक्रम राबविण्यात आला. काही ठिकाणी दिवसभर व रात्रीही कर्मचारी बसवून ठेवण्यात आले. (प्रतिनिधी)