शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

पर्यावरणाला घातक थर्माकोल पत्रावळीचा सर्रास वापर; पळसाची पत्रावळी होतेय नामशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 13:00 IST

ग्रामीण भागात विवाह आणि अन्य समारंभात जेवणासाठी थर्माकोलच्या पत्रावळी वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. समारंभानंतर त्यांची योग्य विल्हेवाट न लावता परिसरात फेकून, जाळून टाकल्या जातात. त्यामुळे निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे.

ठळक मुद्देपानांच्या पत्रावळीऐवजी थर्माकोलच्या पत्रावळी व प्लॅस्टिकचे ग्लास वापरण्यावर भरझाडांच्या पानांपासून केलेलं पात्र रुची वाढवणारे, भूक वाढविणारे

भूगाव : विज्ञानाच्या प्रगतीसोबतच पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी आता प्रत्येक नागरिकावर आली आहे. पर्यावरणाचे संतुलन न राखल्यास मानवाला त्याची भविष्यात प्रचंड मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. ग्रामीण भागात विवाह आणि अन्य समारंभात जेवणासाठी थर्माकोलच्या पत्रावळी वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. समारंभानंतर त्यांची योग्य विल्हेवाट न लावता परिसरात फेकून, जाळून टाकल्या जातात. त्यामुळे निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे.गावात होणाऱ्या भोजनावळीतून भांडी हद्दपार होऊ लागली आहे. पानांच्या पत्रावळीऐवजी थर्माकोलच्या पत्रावळी व प्लॅस्टिकचे ग्लास वापरण्यावर भर दिला जात आहे. हा सर्व कचरा मोकळ्या जागेत किंवा रस्त्यावर फेकला जातो. त्याचे विघटन होत नसल्याने हवेमार्फत हा हलका कचरा सर्वत्र पसरतो. तसेच या पत्रावळ्यांतील अन्न गाय, बैल, कुत्रे यांसारखे पाळीव जनावरे खाता खाता थर्माकोलचा अंशही त्यांच्या पोटात जातो. हे खाऊन जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. तसेच या पत्रावळी जाळल्याने निर्माण होणारा वायू सजिवांच्या जीवनाला घातक ठरतो.भारतात वर्षानुवर्षे, पिढ्यान्पिढ्या चालत आलेले पळसाच्या पानांच्या पत्रावळी, द्रोण आणि केळीची पाने जेवणावळीमधून इतिहासजमा झाली आहेत. यांच्यावर उपजीविका करणारे हजारो कुटुंब या व्यवसायापासून कोसो दूर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे. ग्रामीण भागात विवाह आणि अन्य समारंभात जेवणासाठी थर्माकोलच्या पत्रावळी वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. समारंभानंतर त्यांची योग्य विल्हेवाट न लावता परिसरात फेकून दिल्या जातात. पर्यावरणासाठी नुकसानकारक ठरणाºया कॅरीबॅगच्या बंदीच्या अंमलबजावणीचे आव्हान कायम असताना या पत्रावळींचे नवे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या संयोजकांनी पत्रावळींची योग्य विल्हेवाट लावण्याची काळजी घेतली पाहिजे. 

पळसाची पत्रावळी रुची व भूक वाढवणारीझाडांच्या पानांपासून केलेलं पात्र रुची वाढवणारे, भूक वाढविणारे आहे. आपल्याकडे पळसाच्या पानांपासून पत्रावळी तयार केल्या जातात. काही वेळा जेवण्याकरिता केळीच्या किंवा कर्दळीच्या पानांचाही वापर केला जातो. बंगालमध्येही हीच पद्धत रुढ आहे. आपण मात्र मागासलेली, जुनाट म्हणून या पत्रावळी हळूहळू बाद करत आणल्या आहेत. व्यावहारिकदृष्ट्या खर्चही कमी येतो आणि ती सवय निसर्गाच्या अधिक जवळ आणणारी आहे.

टॅग्स :environmentवातावरणPuneपुणे