शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पर्यावरणाला घातक थर्माकोल पत्रावळीचा सर्रास वापर; पळसाची पत्रावळी होतेय नामशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 13:00 IST

ग्रामीण भागात विवाह आणि अन्य समारंभात जेवणासाठी थर्माकोलच्या पत्रावळी वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. समारंभानंतर त्यांची योग्य विल्हेवाट न लावता परिसरात फेकून, जाळून टाकल्या जातात. त्यामुळे निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे.

ठळक मुद्देपानांच्या पत्रावळीऐवजी थर्माकोलच्या पत्रावळी व प्लॅस्टिकचे ग्लास वापरण्यावर भरझाडांच्या पानांपासून केलेलं पात्र रुची वाढवणारे, भूक वाढविणारे

भूगाव : विज्ञानाच्या प्रगतीसोबतच पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी आता प्रत्येक नागरिकावर आली आहे. पर्यावरणाचे संतुलन न राखल्यास मानवाला त्याची भविष्यात प्रचंड मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. ग्रामीण भागात विवाह आणि अन्य समारंभात जेवणासाठी थर्माकोलच्या पत्रावळी वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. समारंभानंतर त्यांची योग्य विल्हेवाट न लावता परिसरात फेकून, जाळून टाकल्या जातात. त्यामुळे निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे.गावात होणाऱ्या भोजनावळीतून भांडी हद्दपार होऊ लागली आहे. पानांच्या पत्रावळीऐवजी थर्माकोलच्या पत्रावळी व प्लॅस्टिकचे ग्लास वापरण्यावर भर दिला जात आहे. हा सर्व कचरा मोकळ्या जागेत किंवा रस्त्यावर फेकला जातो. त्याचे विघटन होत नसल्याने हवेमार्फत हा हलका कचरा सर्वत्र पसरतो. तसेच या पत्रावळ्यांतील अन्न गाय, बैल, कुत्रे यांसारखे पाळीव जनावरे खाता खाता थर्माकोलचा अंशही त्यांच्या पोटात जातो. हे खाऊन जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. तसेच या पत्रावळी जाळल्याने निर्माण होणारा वायू सजिवांच्या जीवनाला घातक ठरतो.भारतात वर्षानुवर्षे, पिढ्यान्पिढ्या चालत आलेले पळसाच्या पानांच्या पत्रावळी, द्रोण आणि केळीची पाने जेवणावळीमधून इतिहासजमा झाली आहेत. यांच्यावर उपजीविका करणारे हजारो कुटुंब या व्यवसायापासून कोसो दूर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे. ग्रामीण भागात विवाह आणि अन्य समारंभात जेवणासाठी थर्माकोलच्या पत्रावळी वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. समारंभानंतर त्यांची योग्य विल्हेवाट न लावता परिसरात फेकून दिल्या जातात. पर्यावरणासाठी नुकसानकारक ठरणाºया कॅरीबॅगच्या बंदीच्या अंमलबजावणीचे आव्हान कायम असताना या पत्रावळींचे नवे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या संयोजकांनी पत्रावळींची योग्य विल्हेवाट लावण्याची काळजी घेतली पाहिजे. 

पळसाची पत्रावळी रुची व भूक वाढवणारीझाडांच्या पानांपासून केलेलं पात्र रुची वाढवणारे, भूक वाढविणारे आहे. आपल्याकडे पळसाच्या पानांपासून पत्रावळी तयार केल्या जातात. काही वेळा जेवण्याकरिता केळीच्या किंवा कर्दळीच्या पानांचाही वापर केला जातो. बंगालमध्येही हीच पद्धत रुढ आहे. आपण मात्र मागासलेली, जुनाट म्हणून या पत्रावळी हळूहळू बाद करत आणल्या आहेत. व्यावहारिकदृष्ट्या खर्चही कमी येतो आणि ती सवय निसर्गाच्या अधिक जवळ आणणारी आहे.

टॅग्स :environmentवातावरणPuneपुणे