शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

दीड लाखांपेक्षा अधिक शेतकरी मदतीपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 11:10 IST

राज्यासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसाने माजवला हाहाकार

ठळक मुद्देराष्ट्रपती राजवटीत आलेले ४० कोटींचेच वाटप  नवीन सरकारकडून अद्याप मदतीची प्रतीक्षाजिल्ह्यातील तब्बल १ लाख २६ हजार ३४४ हेक्टरवरील शेतपिके पूर्णपणे उद्ध्वस्त पंचनामे करून सुमारे १३८ कोटी रुपयांचे अनुदान आवश्यक असल्याचा अहवाल शासनाला सादर

सुषमा नेहरकर-शिंदे - पुणे : शेतकऱ्यांचे हितासाठी, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी बैठकांवर बैठका घेत असल्याचे सांगणाऱ्या महाशिव आघाडी सरकार सत्तेवर येऊन दहा दिवसांचा कालावधी लोटला. मात्र, अद्यापही शेतकरी मदतीपासून वंचितच आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल २ लाख ६० हजार ८९३ शेतकऱ्यांचे १ लाख २६ हजार ३४४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी राष्ट्रपती राजवटीत आलेल्या ४० कोटींचे प्रशासनाने शेतकऱ्यांना वाटप केले आहे. राज्यासह जिल्ह्यामध्ये सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. यामुळे जिल्ह्यातील तब्बल १ लाख २६ हजार ३४४ हेक्टरवरील शेतपिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. पुणे जिल्ह्यातील २ लाख ६० हजार ८९३ शेतकºयांना मोठा फटका बसला. याबाबत जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करून सुमारे १३८ कोटी रुपयांचे अनुदान आवश्यक असल्याचा अहवाल शासनाला सादर केला. दरम्यानच्या काळामध्ये राज्यात सत्तांतर नाटक सुरू होते. शिवसेना-भाजप युतीमध्ये निवडणुकीनंतर बिघाड झाल्याने राष्ट्रवादी काँगे्रसने, शिवसेना-काँग्रेससह राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या खरिपाच्या पिकांसोबतच द्राक्ष बागायतदार, कांदा उत्पादक शेतकरी आणि फळपिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिकांसोबतच शेतांचे बांध वाहून केले, जनावरे पाण्यात वाहून गेली, विहिरी, शेततळ्यांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असताना राज्यपालांनी तातडीने ४० कोटी रुपयांचा जिल्हा प्रशासनाला मदतनिधी पाठवला. या ४० कोटी रुपयांमध्ये ९५ हजार १४७ शेतकऱ्यांना मदत केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांनी दिली.

जिल्ह्यातील तालुकानिहाय वाटप झालेल्या शेतकऱ्यांची माहिती तालुका                                            वाटप झालेला                       मदत मिळालेले                                                          निधी                                    शेतकरीहवेली                                            १ कोटी ५१ लाख                          ४६००मावळ                                          १ कोटी ६९ लाख                          ५९२८मुळशी                                          ६५ लाख                                     २४००शिरूर                                           २ कोटी ३ लाख                           १२०९८भोर                                             ४२ लाख                                    २०५८पुरंदर                                          ५ कोटी ७ लाख                          १०३५८वेल्हा                                           २४ लाख                                   १४००जुन्नर                                        ९ कोटी १८ लाख                       १५१२६खेड                                            १ कोटी ६० लाख                       ४१४१आंबेगाव                                    ५ कोटी ३ लाख                         ११५८०दौंड                                           २ कोटी ५५ लाख                      ६७०३इंदापूर                                       ३ कोटी ७३ लाख                     ८५९१बारामती                                   ५ कोटी ७८ लाख                     १०१६३एकूण                                       ३९ कोटी ५४ लाख                  ९५१४७.........- अवकाळी पावसाने एकूण बांधित शेतकरी :  २ लाख ६० हजार ८९३- एकूण कृषी क्षेत्राचे नुकसान : १ लाख २६ हजार ३३४ हेक्टर- आता पर्यंत आलेली मदत (राष्ट्रपती राजवटतीत) : ४० कोटी रुपये- मदत वाटप करण्यात आलेले शेतकरी : ९५ हजार १४७- अद्याप शासनाकडून मदतीची अपेक्षा : ९५ कोटी रुपये---

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीRainपाऊसGovernmentसरकारfloodपूर