शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाखांपेक्षा अधिक शेतकरी मदतीपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 11:10 IST

राज्यासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसाने माजवला हाहाकार

ठळक मुद्देराष्ट्रपती राजवटीत आलेले ४० कोटींचेच वाटप  नवीन सरकारकडून अद्याप मदतीची प्रतीक्षाजिल्ह्यातील तब्बल १ लाख २६ हजार ३४४ हेक्टरवरील शेतपिके पूर्णपणे उद्ध्वस्त पंचनामे करून सुमारे १३८ कोटी रुपयांचे अनुदान आवश्यक असल्याचा अहवाल शासनाला सादर

सुषमा नेहरकर-शिंदे - पुणे : शेतकऱ्यांचे हितासाठी, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी बैठकांवर बैठका घेत असल्याचे सांगणाऱ्या महाशिव आघाडी सरकार सत्तेवर येऊन दहा दिवसांचा कालावधी लोटला. मात्र, अद्यापही शेतकरी मदतीपासून वंचितच आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल २ लाख ६० हजार ८९३ शेतकऱ्यांचे १ लाख २६ हजार ३४४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी राष्ट्रपती राजवटीत आलेल्या ४० कोटींचे प्रशासनाने शेतकऱ्यांना वाटप केले आहे. राज्यासह जिल्ह्यामध्ये सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. यामुळे जिल्ह्यातील तब्बल १ लाख २६ हजार ३४४ हेक्टरवरील शेतपिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. पुणे जिल्ह्यातील २ लाख ६० हजार ८९३ शेतकºयांना मोठा फटका बसला. याबाबत जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करून सुमारे १३८ कोटी रुपयांचे अनुदान आवश्यक असल्याचा अहवाल शासनाला सादर केला. दरम्यानच्या काळामध्ये राज्यात सत्तांतर नाटक सुरू होते. शिवसेना-भाजप युतीमध्ये निवडणुकीनंतर बिघाड झाल्याने राष्ट्रवादी काँगे्रसने, शिवसेना-काँग्रेससह राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या खरिपाच्या पिकांसोबतच द्राक्ष बागायतदार, कांदा उत्पादक शेतकरी आणि फळपिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिकांसोबतच शेतांचे बांध वाहून केले, जनावरे पाण्यात वाहून गेली, विहिरी, शेततळ्यांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असताना राज्यपालांनी तातडीने ४० कोटी रुपयांचा जिल्हा प्रशासनाला मदतनिधी पाठवला. या ४० कोटी रुपयांमध्ये ९५ हजार १४७ शेतकऱ्यांना मदत केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांनी दिली.

जिल्ह्यातील तालुकानिहाय वाटप झालेल्या शेतकऱ्यांची माहिती तालुका                                            वाटप झालेला                       मदत मिळालेले                                                          निधी                                    शेतकरीहवेली                                            १ कोटी ५१ लाख                          ४६००मावळ                                          १ कोटी ६९ लाख                          ५९२८मुळशी                                          ६५ लाख                                     २४००शिरूर                                           २ कोटी ३ लाख                           १२०९८भोर                                             ४२ लाख                                    २०५८पुरंदर                                          ५ कोटी ७ लाख                          १०३५८वेल्हा                                           २४ लाख                                   १४००जुन्नर                                        ९ कोटी १८ लाख                       १५१२६खेड                                            १ कोटी ६० लाख                       ४१४१आंबेगाव                                    ५ कोटी ३ लाख                         ११५८०दौंड                                           २ कोटी ५५ लाख                      ६७०३इंदापूर                                       ३ कोटी ७३ लाख                     ८५९१बारामती                                   ५ कोटी ७८ लाख                     १०१६३एकूण                                       ३९ कोटी ५४ लाख                  ९५१४७.........- अवकाळी पावसाने एकूण बांधित शेतकरी :  २ लाख ६० हजार ८९३- एकूण कृषी क्षेत्राचे नुकसान : १ लाख २६ हजार ३३४ हेक्टर- आता पर्यंत आलेली मदत (राष्ट्रपती राजवटतीत) : ४० कोटी रुपये- मदत वाटप करण्यात आलेले शेतकरी : ९५ हजार १४७- अद्याप शासनाकडून मदतीची अपेक्षा : ९५ कोटी रुपये---

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीRainपाऊसGovernmentसरकारfloodपूर