शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra | महाराष्ट्रात पूर्व मोसमी पावसाची शेतकऱ्यांना हुलकावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 13:24 IST

भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट...

नितीन चौधरी

पुणे : यंदाचा उन्हाळा गेल्या १२२ वर्षांतील सर्वाधिक उष्ण तर ठरलाच मात्र, त्याचा परिणाम अवकाळी पावसावरही झाला. राज्यात मार्च ते एप्रिल या तीन महिन्यांच्या काळात तब्बल ११ जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा एकही थेंब पडला नाही. त्यामुळे खरीप हंगामासाठी पूर्वमशागतीची तयारी करणारे शेतकरी मात्र, हवालदिल झाले आहेत. गेल्या काही वर्षांत असे पहिल्यांदाच होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे.

मार्च ते मे हा काळ म्हणजे अवकाळी पावसाचा काळ. यामुळे शेतातील उभ्या पिकांना फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होते. मात्र, मे महिन्यात येणाऱ्या पावसाचा फायदा काही प्रमाणात खरीप पिकांच्या पूर्वमशागतीसाठी होतो. यंदा मात्र, राज्यात तसेच देशातही वेगळी परिस्थिती दिसून आली आहे. राज्यातील तब्बल ११ जिल्ह्यांत अवकाळी पाऊस झालाच नाही. त्यात ठाणे, नंदूरबार, जालना, बीड, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच नागपूर, चंद्रपूर व वर्धा या विदर्भातील, तर लातूर, परभणी, नांदेड या मराठवाड्यातील व रायगड जिल्ह्यांत अवकाळी पावसात सुमारे ९३ ते ९६ टक्क्यांची घट झाली आहे.

पुणे जिल्ह्यातील घट ही ७६ टक्के आहे. पालघर व नाशिकमध्ये ८५, नगरमध्ये ८३, साताऱ्यात ६८ व गडचिरोलीत ६३ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांची मोठी घट (६० ते ९९ टक्क्यांची घट) अशी वर्गवारी केली आहे. तर घट असलेल्या जिल्ह्यांत जळगाव (३०), धुळे (२४), औरंगाबाद (५८), सोलापूर (२६) व उस्मानाबाद (४०) यांचा समावेश आहे. तसेच सामान्य पाऊस झालेल्या (अधिक १९ ते उणे १९ टक्के) जिल्ह्यांमध्ये सांगली (उणे १९), रत्नागिरी (उणे ११) व सिंधुदुर्ग (अधिक १६) यांचा समावेश आहे. केवळ कोल्हापूर जिल्ह्यात ६६ टक्के जादा पाऊस झाला आहे.

देशातील ९ टक्के म्हणजेच तब्बल ६६ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झालेला नाही. त्यात गुजरातमधील २५, उत्तर प्रदेशातील १४ व महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांचा समावेश आहे. याबाबत भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कृष्णानंद होसाळीकर म्हणाले, “यंदाचा उन्हाळा गेल्या १२२ वर्षांनंतरचा सर्वात उष्ण ठरला. त्यामुळे वातावरणात आर्द्रता शिल्लकच नव्हती. पश्चिमी वारेसुद्धा अतिशय कोरडे वाहत होते. भूपृष्ठीय तापमानही सुमारे ६० अंशांपर्यंत पोचले होते. याच काळात अवकाळी पावसासाठी अनुकूल स्थिती नव्हती. या अवकाळी पावसाचा शेतीला फायदा होण्याऐवजी तोटाच जास्त होतो. तर मे महिन्यात होणाऱ्या अवकाळी किंवा मान्सूनपूर्व पावसामुळे कोकणातील भाताच्या रोपांना किंवा उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील पूर्वहंगामी कापूस लागवडीला फायदा होतो. तो अगदीच थोडा असतो.”

गेल्या मेमध्ये चांगला पाऊस

कृषी विभागाच्या पावसाच्या आकडेवारीवरूनही हे स्पष्ट होत आहे. राज्यात गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये ७.७ मिलिमीटर पाऊस झाला होता, तर यंदा तो केवळ २.८ मिमी. झाला आहे. एप्रिल २०२१मध्ये १०.२, तर यंदाच्या एप्रिलमध्ये ८.८ मिमी. तसेच मे २०२१मध्ये अवकाळीचे प्रमाण ५९.५ मिमी. होते. यंदा मात्र ते १३.४ मिमी.इतकेच आहे. यावरून अवकाळी पाऊस कमी झाल्याचे दिसून येत आहे.

खरिपाची पूर्व मशागत करण्यासाठी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पडणाऱ्या अवकाळी पावसाचा फायदा होतो. त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन नांगरणी किंवा वखरणी करणे सोपे होते. यंदा मात्र, विदर्भात अवकाळी पाऊस झाला नाही.

- संजय गाढे, वरिष्ठ व्यवस्थापक, अजित सीड्स, अकोला

यंदा अवकाळी पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्याचा फारसा फायदा होत नसला तरी पूर्वमशागतीच्या कामांचा खोळंबा झाला आहे.

- दिलीप झेंडे, कृषी संचालक, बियाणे व निविष्ठा

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रMonsoon Specialमानसून स्पेशल