शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Maharashtra | महाराष्ट्रात पूर्व मोसमी पावसाची शेतकऱ्यांना हुलकावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 13:24 IST

भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट...

नितीन चौधरी

पुणे : यंदाचा उन्हाळा गेल्या १२२ वर्षांतील सर्वाधिक उष्ण तर ठरलाच मात्र, त्याचा परिणाम अवकाळी पावसावरही झाला. राज्यात मार्च ते एप्रिल या तीन महिन्यांच्या काळात तब्बल ११ जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा एकही थेंब पडला नाही. त्यामुळे खरीप हंगामासाठी पूर्वमशागतीची तयारी करणारे शेतकरी मात्र, हवालदिल झाले आहेत. गेल्या काही वर्षांत असे पहिल्यांदाच होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे.

मार्च ते मे हा काळ म्हणजे अवकाळी पावसाचा काळ. यामुळे शेतातील उभ्या पिकांना फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होते. मात्र, मे महिन्यात येणाऱ्या पावसाचा फायदा काही प्रमाणात खरीप पिकांच्या पूर्वमशागतीसाठी होतो. यंदा मात्र, राज्यात तसेच देशातही वेगळी परिस्थिती दिसून आली आहे. राज्यातील तब्बल ११ जिल्ह्यांत अवकाळी पाऊस झालाच नाही. त्यात ठाणे, नंदूरबार, जालना, बीड, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच नागपूर, चंद्रपूर व वर्धा या विदर्भातील, तर लातूर, परभणी, नांदेड या मराठवाड्यातील व रायगड जिल्ह्यांत अवकाळी पावसात सुमारे ९३ ते ९६ टक्क्यांची घट झाली आहे.

पुणे जिल्ह्यातील घट ही ७६ टक्के आहे. पालघर व नाशिकमध्ये ८५, नगरमध्ये ८३, साताऱ्यात ६८ व गडचिरोलीत ६३ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांची मोठी घट (६० ते ९९ टक्क्यांची घट) अशी वर्गवारी केली आहे. तर घट असलेल्या जिल्ह्यांत जळगाव (३०), धुळे (२४), औरंगाबाद (५८), सोलापूर (२६) व उस्मानाबाद (४०) यांचा समावेश आहे. तसेच सामान्य पाऊस झालेल्या (अधिक १९ ते उणे १९ टक्के) जिल्ह्यांमध्ये सांगली (उणे १९), रत्नागिरी (उणे ११) व सिंधुदुर्ग (अधिक १६) यांचा समावेश आहे. केवळ कोल्हापूर जिल्ह्यात ६६ टक्के जादा पाऊस झाला आहे.

देशातील ९ टक्के म्हणजेच तब्बल ६६ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झालेला नाही. त्यात गुजरातमधील २५, उत्तर प्रदेशातील १४ व महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांचा समावेश आहे. याबाबत भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कृष्णानंद होसाळीकर म्हणाले, “यंदाचा उन्हाळा गेल्या १२२ वर्षांनंतरचा सर्वात उष्ण ठरला. त्यामुळे वातावरणात आर्द्रता शिल्लकच नव्हती. पश्चिमी वारेसुद्धा अतिशय कोरडे वाहत होते. भूपृष्ठीय तापमानही सुमारे ६० अंशांपर्यंत पोचले होते. याच काळात अवकाळी पावसासाठी अनुकूल स्थिती नव्हती. या अवकाळी पावसाचा शेतीला फायदा होण्याऐवजी तोटाच जास्त होतो. तर मे महिन्यात होणाऱ्या अवकाळी किंवा मान्सूनपूर्व पावसामुळे कोकणातील भाताच्या रोपांना किंवा उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील पूर्वहंगामी कापूस लागवडीला फायदा होतो. तो अगदीच थोडा असतो.”

गेल्या मेमध्ये चांगला पाऊस

कृषी विभागाच्या पावसाच्या आकडेवारीवरूनही हे स्पष्ट होत आहे. राज्यात गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये ७.७ मिलिमीटर पाऊस झाला होता, तर यंदा तो केवळ २.८ मिमी. झाला आहे. एप्रिल २०२१मध्ये १०.२, तर यंदाच्या एप्रिलमध्ये ८.८ मिमी. तसेच मे २०२१मध्ये अवकाळीचे प्रमाण ५९.५ मिमी. होते. यंदा मात्र ते १३.४ मिमी.इतकेच आहे. यावरून अवकाळी पाऊस कमी झाल्याचे दिसून येत आहे.

खरिपाची पूर्व मशागत करण्यासाठी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पडणाऱ्या अवकाळी पावसाचा फायदा होतो. त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन नांगरणी किंवा वखरणी करणे सोपे होते. यंदा मात्र, विदर्भात अवकाळी पाऊस झाला नाही.

- संजय गाढे, वरिष्ठ व्यवस्थापक, अजित सीड्स, अकोला

यंदा अवकाळी पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्याचा फारसा फायदा होत नसला तरी पूर्वमशागतीच्या कामांचा खोळंबा झाला आहे.

- दिलीप झेंडे, कृषी संचालक, बियाणे व निविष्ठा

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रMonsoon Specialमानसून स्पेशल