शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट जनावरांचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:10 IST

-- घोटवडे : घोटवडे, रिहे, मुगावडे या गावांना जोडलेला डोंगर भाग परिसरातील शेतजमिनीवर मोकाट जनावरांनी धुडघूस घातला आहे. त्यामुळे ...

--

घोटवडे : घोटवडे, रिहे, मुगावडे या गावांना जोडलेला डोंगर भाग परिसरातील शेतजमिनीवर मोकाट जनावरांनी धुडघूस घातला आहे. त्यामुळे शेतकरी घाबरला आहे. मात्र वनक्षेत्रातून येणाऱ्या या जनवारांची तक्रार वनखात्याकडे केली, तर ते महसूल व पोलिसांकडे बोट दाखवता व महसूल-पोलीस खात्याकडे तक्रार केली तर ते वनखात्याकडे बोट दाखवितात त्यामुळे तक्रार कोणाकडे करावी, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

त्यावर शेकडो एकर वनखात्याची जमीन, तर शेकडो एकर शेतकऱ्यांची जमीन असून भरपूर पाऊस-मातीची जमीन व न होणारी जंगलतोड यामुळे भरपूर झाडी व गवत वाढते. गेली ७ ते ८ वर्षे त्या जंगलात चरावयास गेलेली काही जनावरे तेथेच वस्ती करून रााहिली. त्यानंतर त्यांच्यातून प्रजनन होऊन तब्बल ३५ ते ४० मोकाट जनावरांचा कळप तयार झाला. त्यात धष्टपुष्ट गाई, बैल, वासरे तयार झाली व ती मानव वस्तीपासून दूर राहिल्यामुळे रानटी झाली. जनावरे माणसांना मारू लागली व शेतकरी घाबरू लागले मोकाट जनावरे जुलै ते ऑक्टोबर पावसाळ्यात डोंगरात राहतात कारण भरपूर हिरवा चारा मुबलक पाणी मिळते परंतु नोव्हेंबर ते जून डोंगरातील चारापाणी कमी होते व ती जनावरे चारा पाण्याच्या शोधत गावातील बागायत जमिनीमधील पिकावर ताव मारतात. विशेषत: ही जनावरे दिवसा जंगलात राहतात व रात्री शेतात नुकसान करतात त्यामुळे त्यांना हुसकावून लावताना अनेक अडचणी येतात.

मोकाट जनावरे असल्यामुळे वनखाते लक्ष देत नाही, महसूल खाते किंवा पोलीस प्रशासन तक्रार करायची कुठे, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे कोण वाली या संकटाला व कोण सोडविल हा प्रश्न, या विवंचनेत ३ गावांचे शेतकरी आहेत.

--

तीन गावांत शेकडो एकर पिकांची नासाडी

शेतातील गहू, बाजरी, ज्वारी, हरभरा, कांदे-भाजीपाला पिकाची एक रात्रीत ३ एकरांपर्यंत नासाडी करतात. गेल्या चार-पाच वर्षांत या मोकाट जनावरांनी शेकडो एकर पिकांचे नुकसान केले आहे. त्याची झळ शेतकरी सहन करीत आहेत. डोंगराळ व वन्यक्षेत्र असल्यामुळे या परिसरात कामगार मिळत नाहीत, खते व बियाणांचे भाव शेतीमालाला हमी भाव नाही अशा परिस्थितीत मोकाट जनावराचा त्रासामुळे तीन गावचे शेतकरी हैराण झाले आहेत.

--